शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

वनोपजांमुळे महिलांना रोजगार

By admin | Updated: April 9, 2015 01:55 IST

जिल्ह्यात वनक्षेत्र सर्वाधिक असल्याने येथील जंगलात विविध प्रकारच्या वनस्पती आहेत.

गडचिरोली : जिल्ह्यात वनक्षेत्र सर्वाधिक असल्याने येथील जंगलात विविध प्रकारच्या वनस्पती आहेत. या वनस्पतींपासून अनेक प्रकारची फळे, औषधी तसेच इतर कामांसाठी लाकूड उपलब्ध होतो. सध्या दुर्गम भागात भरपूर प्रमाणात असलेल्या टेंभू वनस्पतीची फळे, चारोळ्या विक्रीसाठी बाजारात आणल्या जात आहे. त्यामुळे दुर्गम भागातील महिलांना रोजगार उपलब्ध होत आहे. जिल्ह्यात सध्या मोहफूल वेचणीचा हंगाम सुरू आहे. शिवाय अनेक गावातील महिला व पुरूष पहाटेपासून मोहफूल वेचण्याकरिता शेतात तसेच जंगलात जात आहेत. पहाटेपासून मोहफूल पडण्यास सुरूवात होते. त्यानंतर जवळपास दुपारी तीन वाजेपर्यंत मोहफूल पडत असल्याने अनेक महिला व पुरूष दुपारपर्यंत शेत शिवारातच असतात. याशिवाय सकाळी दुर्गम भागातील महिला टेंभू फळ, चारोळी वेचण्याकरिता जातात. फळे गोळा करून ते जिल्हा व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी विक्रीसाठी ठेवत आहेत. चार शेर टेंभू फळांना ४० ते ५० रूपये किंमत आकारली जात आहे. ग्राहकांचीही फळांना अधिक पसंती असल्याने मागणीही बऱ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यातील सिरोंचा, धानोरा, एटापल्ली तालुक्यातून महिला जिल्हा व तालुका मुख्यालयात फळ विक्रीसाठी येत आहेत. या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध होत असल्याने दुर्गम भागात एक उपजीविकेचे साधन निर्माण झाले आहे. (शहर प्रतिनिधी)