शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
5
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
6
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
7
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
8
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
9
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
10
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
11
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
12
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
13
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
14
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
15
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
16
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
17
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
18
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
19
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
20
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  

सव्वा दोन हजार कुटुंबांना रोजगार

By admin | Updated: December 13, 2014 22:37 IST

चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या ८ महिन्यांच्या कालावधीत रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ हजार २५३ कुटुंबाना १०० दिवसांचे रोजगार प्राप्त झाले. विशेष म्हणजे, रोजगार

आठ महिन्यात १०० दिवस मिळाले मजुरांना कामगडचिरोली : चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या ८ महिन्यांच्या कालावधीत रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ हजार २५३ कुटुंबाना १०० दिवसांचे रोजगार प्राप्त झाले. विशेष म्हणजे, रोजगार पुरविण्यात गडचिरोली जिल्ह्याचा राज्यात चौथा क्रमांक असून १ लाख ८ हजार ३६५ नागरिकांना रोजगार पुरविला आहे. ग्रामीण भागातील रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी केंद्र शासनाने २००५ साली महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून कृषी व इतर विकासाची कामे केली जातात. गडचिरोली जिल्ह्यात चार महिने धानाची शेती सोडल्यानंतर आठ महिने बसूनच राहावे लागते. त्यामुळे रोहयोवर काम करण्यास मजूर मिळतात. त्याचबरोबर नक्षलप्रभावित जिल्हा असल्याने रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी केंद्र शासनाकडून अतिरिक्त निधी गडचिरोली जिल्ह्याला प्राप्त होतो. सदर निधीतून रोहयोची कामे वर्षभर राबविली जात असल्याने गडचिरोली जिल्हा रोहयोच्या माध्यमातून रोजगार पुरविण्यात चौथ्या स्थानावर आहे. चालू आर्थिक वर्षात गडचिरोली जिल्हा प्रशासनाने २ हजार २५३ कुटुंबांना १०० दिवस रोजगार उपलब्ध करून दिले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये ७ लाख ४९ हजार ३११ दिवसांचा रोजगार महिलांना प्राप्त झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात उद्योग नसल्याने नियमित रोजगाराची नेहमीच चणचण भासते. येथील मजुरांना नेहमीच कामाची शोधाशोध करावी लागते. मिळेल ते काम करावे लागते. तरीही रोजगार मिळत नसल्याने येथील मजुरांना दुसऱ्या जिल्ह्यात रोजगारासाठी भटकावे लागते. अशा परिस्थितीत रोहयोची कामे जवळपास वर्षभर चालत असल्याने नागरिकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. रोहयोचे पैसे आता सरळ लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जात आहेत. त्यामुळे या योजनेत असलेला गैरव्यवहार फार कमी झाला असून लाभार्थ्यांला त्याच्या कामाचा मोबदला मिळू लागला आहे. त्यामुळेही रोजगार हमी मजुरांमध्ये उत्साह दिसून येत आहे. थोडाफार उशीरा पैसा मिळत असला तरी सदर पैसा बुडत नाही. याची शाश्वती मजुरांना असल्याने रोहयो कामावर जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. (नगर प्रतिनिधी)