शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी रोजगार हमीची कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:20 IST

मागील चार महिन्यांपासून कुशल कामाचा निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे रोहयोची कामे ठप्प पडली आहेत. काही कामे अर्धवट स्थितीत आहेत. प्रशासनाच्या चुकीमुळे अकुशल कामांचाही निधी मिळाला नाही.

ठळक मुद्देकामासाठी मजुरांची वणवण : बहुतांश कामे अर्धवटच; मजुरीही थकली

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : मागील चार महिन्यांपासून कुशल कामाचा निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे रोहयोची कामे ठप्प पडली आहेत. काही कामे अर्धवट स्थितीत आहेत. प्रशासनाच्या चुकीमुळे अकुशल कामांचाही निधी मिळाला नाही.गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराची साधने उपलब्ध नाहीत. जेमतेम शेतीच्या भरवशावर चार महिने रोजगार उपलब्ध होते. त्यानंतर मात्र बेरोजगारीचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतीचा हंगाम संपताच रोहयो कामांची प्रचंड प्रमाणात मागणी वाढते. रोहयोच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्याबरोबरच विकासाचीही कामेही होतात. रोहयोचा निधी खर्च करताना ४० टक्के कुशल व ६० टक्के अकुशल हे प्रमाण जिल्हास्तरावर पाळणे आवश्यक आहे. अकुशल कामे मजुरांच्या माध्यमातून केली जातात. मजुरांचा प्रपंच दैनंदिन मिळणाऱ्या मजुरीवर अवलंबून राहतो. त्यामुळे आठवडा संपताच त्यांना मजुरी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शासन अकुशल कामाचा निधी कधीच कमी पडू देत नाही. पंचायत समिती स्तरावरून सॉफ्टवेअरमध्ये एन्ट्री केल्याबरोबर संबंधित मजुरांच्या बँक खात्यात मजुरीची रक्कम जमा होते. मात्र प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी मस्टर बनविण्यास तसेच त्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिकबाबी पूर्ण करण्यास उशिर करतात. त्यांच्या चुकीमुळेच रोहयो मजुरांची मजुरी थकते. सध्यास्थितीत १ कोटी ५३ लाख २५ हजार रूपये मजुरी थकली आहे.रोहयोच्या माध्यमातून मजगी, बोडी, शेततळे, सिंचन विहीर, सिमेंट बंधारा, खोदतळे, वर्मी, कंपोस्ट, पांदन रस्ते आदी कामे केली जातात. ही कामे करण्यासाठी साहित्याची गरज भासते. सदर साहित्य ग्राम पंचायत आपल्या स्तरावर खरेदी करते. याला रोहयोच्या भाषेत अकुशल निधी असे संबोधल्या जाते. अकुशल निधीचा मात्र मागील दोन वर्षांपासून सातत्त्याने तुटवडा पडतो.चालू आर्थिक वर्षातही मागील चार महिन्यांपासून कुशल कामांचा निधी उपलब्ध झाला नाही. सुमारे ६ कोटी ८० लाख ७२ हजार रूपयांचा निधी थकला आहे. कुशलचा निधी मिळत नसल्याने याचा परिणाम अकुशल कामावरही होत असल्याचे दिसून येत आहे. मागील चार महिन्यांपासून जिल्हाभरातील रोहयोची कामे ठप्प पडली आहेत. धानाचा हंगाम संपला असल्याने मजूरवर्ग रोहयोच्या कामांच्या प्रतीक्षेत आहे. ेकामे ठप्प असल्याने रोजगारासाठी वनवन करावी लागत आहे.चार महिन्यांपासून ५ कोटींचा कुशल निधी थकलारोजगार हमी योजनेत अकुशल निधीचा अपवाद वगळता कधीच टंचाई जाणवत नाही. मात्र कुशल निधी बºयाच वेळा उपलब्ध होत नाही. मागील चार महिन्यांपासून कुशल कामांचा निधी उपलब्ध झाला नाही. सुमारे ५ कोटी २२ लाख ७८ हजार रूपयांचा निधी थकला आहे. यामध्ये अहेरी तालुक्यात ५१ लाख २४ हजार, आरमोरी तालुक्यातील १५ लाख ६५ हजार, भामरागड तालुक्यातील १३ लाख ६६ हजार, चामोर्शी तालुक्यातील २६ लाख ७१ हजार, देसाईगंज तालुक्यातील ४३ लाख ६५ हजार, धानोरा तालुक्यातील ८४ लाख ६२ हजार, एटापल्ली तालुक्यातील ११ लाख ५४ हजार, गडचिरोली ४० लाख १५ हजार, कोरची ५८ लाख ७४ हजार कुरखेडा ७९ लाख ४ हजार, मुलचेरा १९ लाख ६५ हजार व सिरोंचा तालुक्यातील ७८ लाख १३ हजार रूपयांचा निधी रखडला आहे.