शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

रोजगार हमी योजनेमुळे सिंचन वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:21 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हाभरात सिंचनाची विविध कामे करण्यात आली. मागील पाच वर्षात जवळपास ५०० कामे करण्यात आली असून यामुळे हजारो हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आली आहे.

ठळक मुद्देशेततळे, बोडी दुरूस्तीला अधिक प्राधान्य : भात खाचर निर्मितीमुळे धानाचे क्षेत्र वाढण्यास मदत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हाभरात सिंचनाची विविध कामे करण्यात आली. मागील पाच वर्षात जवळपास ५०० कामे करण्यात आली असून यामुळे हजारो हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आली आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्याचबरोबर शेतीचा विकास व्हावा, या उद्देशाने केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराची अत्यंत कमी साधने उपलब्ध असल्याने वर्षभर रोजगार हमी योजनेच्या कामांची मागणी होते. रोजगार हमी योजनेचा निधी विशेष करून सिंचनाची कामे, पांदन रस्ता, धान बांध्या तयार करणे, बोडी, मामा तलावाची दुरूस्ती करणे आदी बाबींवर खर्च केला जातो. मागील पाच वर्षांत रोजगार हमी योजनेतून जी कामे करण्यात आली, त्यामध्ये सिंचनाची सुविधा उपलब्ध होणाऱ्या बाबींवर विशेष खर्च करण्यात आला आहे. २०१३-१४ या वर्षात एकूण ३६ शेततळे बांधण्यात आले. त्यावर १९ लाख रूपये खर्च झाले. २५ बोड्यांची दुरूस्ती करण्यात आली. त्यावर १२ लाख ७६ हजार रूपये खर्च झाले. सात मातीचे बंधारे बांधण्यात आले. त्यावर १७ लाख रूपये खर्च झाले. २३ शेतकºयांच्या शेतात धानाच्या बांध्या तयार करण्यात आल्या. त्यावर २३ लाख रूपये खर्च झाले. तर २१ जुन्या धानाच्या बांध्यांची दुरूस्ती करण्यात आली. २०१३-१४ या वर्षात एकूण ११२ सिंचनाची कामे करण्यात आली. त्यावर ८७ लाख ३६ हजार रूपये खर्च झाले आहे. २०१४-१५ या वर्षात ७९ कामे करण्यात आली. त्यावर १ कोटी ५ लाख रूपये खर्च झाले. २०१५-१६ या वर्षात ११५ कामे करण्यात आली. त्यावर दीड कोटी रूपये खर्च झाले. सन २०१६-१७ या वर्षात एकूण १२६ कामे करण्यात आली. त्यावर १ कोटी ४१ लाख रूपये खर्च झालेत. २०१७-१८ या वर्षात एकूण १३१ कामे पूर्ण झाली. झालेल्या कामांमध्ये चार शेततळे, सहा बोड्या, एक नाला, ९१ धानाच्या बांध्यांची निर्मिती व २९ जुन्या धानाच्या बांध्यांची दुरूस्ती करण्यात आली.धान शेतीला लाभदायकगडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. या पिकाला अगदी सुरूवातीपासून ते पीक निघेपर्यंत पाणी द्यावे लागते. त्यामुळे हे पीक घेताना सिंचनाची सुविधा उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. सिंचनासाठी मामा तलाव व बोड्या आहेत. मात्र सदर मामा तलाव व बोड्या अत्यंत जुन्या आहेत. काही बोड्यांची पाळ फुटली आहे. त्याचबरोबर बोडींमध्ये गाळ साचल्याने बोडींची पाणी साठवण क्षमता कमी होती. या बोड्या दुरूस्त करणे आवश्यक होते. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून बोड्यांची दुरूस्ती झाल्याने पाणी साठवण क्षमता वाढण्यास मदत झाली आहे.

टॅग्स :agricultureशेती