शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१३ हजार मजुरांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ५० टक्के ग्रामपंचायत स्तर व ५० टक्के यंत्रणा स्तरावर विविध कामे सुरू करण्यात आली आहेत. डिसेंबर अखेरपासून रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांची संख्या सातत्त्याने वाढत आहे. सध्यास्थितीत १३ हजारवर मजुरांना रोहयोच्या कामातून रोजगार उपलब्ध झाला असल्याची माहिती जि. प. ...

ठळक मुद्देदर दिवशी मजूरसंख्येत वाढ : १९२ ग्रामपंचायतीमार्फत रोहयोची कामे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ५० टक्के ग्रामपंचायत स्तर व ५० टक्के यंत्रणा स्तरावर विविध कामे सुरू करण्यात आली आहेत. डिसेंबर अखेरपासून रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांची संख्या सातत्त्याने वाढत आहे. सध्यास्थितीत १३ हजारवर मजुरांना रोहयोच्या कामातून रोजगार उपलब्ध झाला असल्याची माहिती जि. प. नरेगाच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात एकूण १९२ ग्राम पंचायतीमार्फत सिंचन विहीर, शेततळे, तलाव खोलीकरण व इतर कामे सुरू आहेत. यंत्रणा स्तरावरही अनेक कामे सुरू आहेत. ग्राम पंचायत व यंत्रणा स्तरावरील मिळून सध्या १३ हजारवर मजूर रोहयोच्या कामावर कार्यरत आहेत.ग्राम पंचायत स्तरावरील कामांवर सध्यास्थितीत ६ हजार २७८ मजूर कार्यरत आहेत. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील कामांवर ३६९, धानोरा ९५३, चामोर्शी ६६८, मुलचेरा १ हजार ४८, देसाईगंज ७१, आरमोरी ६३७, कुरखेडा ५७५, कोरची ९८३, अहेरी २९४, एटापल्ली १११, भामरागड ३२८ व सिरोंचा तालुक्यातील कामांवर १८१ मजुरांची उपस्थिती आहे. काम सुरू नसलेल्या भागांमधील अनेक नोंदणीकृत मजुरांच्या हाताला काम नसल्याने रोहयोची कामे सुरू करण्याची मागणी होत आहे.पावणे तीनशे ग्राम पंचायती उदासीनरोजगार हमी योजनेच्या कामाचा आराखडा ग्राम पंचायत स्तरावर तयार केला जातो. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाकडे कामांची यादी पाठवून कामे मंजूर करण्याचा प्रस्ताव पाठविला जातो. ही सर्व प्रक्रिया पार पाडून बहुतांश ग्राम पंचायतींमध्ये नरेगाची कामे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र नव्या वर्षातील जानेवारी महिना येऊनही अनेक ग्राम पंचायतींनी संबंधित गावात मंजूर असलेली रोहयोची कामे सुरूच केली नाही. अशा ग्राम पंचायतीची संख्या पावणे तीनशेच्या आसपास आहे. मजुरांना १०० दिवसांचा रोजगार देण्यात या पावणे तीनशे ग्राम पंचायती उदासीन असल्याचे दिसून येते. त्यामुळे या ग्राम पंचायतीच्या गावातील शेकडो नोंदणीकृत मजूर रिकाम्या हाताने पडून आहेत.