शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

१३ हजार मजुरांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ५० टक्के ग्रामपंचायत स्तर व ५० टक्के यंत्रणा स्तरावर विविध कामे सुरू करण्यात आली आहेत. डिसेंबर अखेरपासून रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांची संख्या सातत्त्याने वाढत आहे. सध्यास्थितीत १३ हजारवर मजुरांना रोहयोच्या कामातून रोजगार उपलब्ध झाला असल्याची माहिती जि. प. ...

ठळक मुद्देदर दिवशी मजूरसंख्येत वाढ : १९२ ग्रामपंचायतीमार्फत रोहयोची कामे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ५० टक्के ग्रामपंचायत स्तर व ५० टक्के यंत्रणा स्तरावर विविध कामे सुरू करण्यात आली आहेत. डिसेंबर अखेरपासून रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांची संख्या सातत्त्याने वाढत आहे. सध्यास्थितीत १३ हजारवर मजुरांना रोहयोच्या कामातून रोजगार उपलब्ध झाला असल्याची माहिती जि. प. नरेगाच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात एकूण १९२ ग्राम पंचायतीमार्फत सिंचन विहीर, शेततळे, तलाव खोलीकरण व इतर कामे सुरू आहेत. यंत्रणा स्तरावरही अनेक कामे सुरू आहेत. ग्राम पंचायत व यंत्रणा स्तरावरील मिळून सध्या १३ हजारवर मजूर रोहयोच्या कामावर कार्यरत आहेत.ग्राम पंचायत स्तरावरील कामांवर सध्यास्थितीत ६ हजार २७८ मजूर कार्यरत आहेत. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील कामांवर ३६९, धानोरा ९५३, चामोर्शी ६६८, मुलचेरा १ हजार ४८, देसाईगंज ७१, आरमोरी ६३७, कुरखेडा ५७५, कोरची ९८३, अहेरी २९४, एटापल्ली १११, भामरागड ३२८ व सिरोंचा तालुक्यातील कामांवर १८१ मजुरांची उपस्थिती आहे. काम सुरू नसलेल्या भागांमधील अनेक नोंदणीकृत मजुरांच्या हाताला काम नसल्याने रोहयोची कामे सुरू करण्याची मागणी होत आहे.पावणे तीनशे ग्राम पंचायती उदासीनरोजगार हमी योजनेच्या कामाचा आराखडा ग्राम पंचायत स्तरावर तयार केला जातो. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाकडे कामांची यादी पाठवून कामे मंजूर करण्याचा प्रस्ताव पाठविला जातो. ही सर्व प्रक्रिया पार पाडून बहुतांश ग्राम पंचायतींमध्ये नरेगाची कामे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र नव्या वर्षातील जानेवारी महिना येऊनही अनेक ग्राम पंचायतींनी संबंधित गावात मंजूर असलेली रोहयोची कामे सुरूच केली नाही. अशा ग्राम पंचायतीची संख्या पावणे तीनशेच्या आसपास आहे. मजुरांना १०० दिवसांचा रोजगार देण्यात या पावणे तीनशे ग्राम पंचायती उदासीन असल्याचे दिसून येते. त्यामुळे या ग्राम पंचायतीच्या गावातील शेकडो नोंदणीकृत मजूर रिकाम्या हाताने पडून आहेत.