शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

१३ हजार मजुरांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ५० टक्के ग्रामपंचायत स्तर व ५० टक्के यंत्रणा स्तरावर विविध कामे सुरू करण्यात आली आहेत. डिसेंबर अखेरपासून रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांची संख्या सातत्त्याने वाढत आहे. सध्यास्थितीत १३ हजारवर मजुरांना रोहयोच्या कामातून रोजगार उपलब्ध झाला असल्याची माहिती जि. प. ...

ठळक मुद्देदर दिवशी मजूरसंख्येत वाढ : १९२ ग्रामपंचायतीमार्फत रोहयोची कामे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ५० टक्के ग्रामपंचायत स्तर व ५० टक्के यंत्रणा स्तरावर विविध कामे सुरू करण्यात आली आहेत. डिसेंबर अखेरपासून रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांची संख्या सातत्त्याने वाढत आहे. सध्यास्थितीत १३ हजारवर मजुरांना रोहयोच्या कामातून रोजगार उपलब्ध झाला असल्याची माहिती जि. प. नरेगाच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात एकूण १९२ ग्राम पंचायतीमार्फत सिंचन विहीर, शेततळे, तलाव खोलीकरण व इतर कामे सुरू आहेत. यंत्रणा स्तरावरही अनेक कामे सुरू आहेत. ग्राम पंचायत व यंत्रणा स्तरावरील मिळून सध्या १३ हजारवर मजूर रोहयोच्या कामावर कार्यरत आहेत.ग्राम पंचायत स्तरावरील कामांवर सध्यास्थितीत ६ हजार २७८ मजूर कार्यरत आहेत. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील कामांवर ३६९, धानोरा ९५३, चामोर्शी ६६८, मुलचेरा १ हजार ४८, देसाईगंज ७१, आरमोरी ६३७, कुरखेडा ५७५, कोरची ९८३, अहेरी २९४, एटापल्ली १११, भामरागड ३२८ व सिरोंचा तालुक्यातील कामांवर १८१ मजुरांची उपस्थिती आहे. काम सुरू नसलेल्या भागांमधील अनेक नोंदणीकृत मजुरांच्या हाताला काम नसल्याने रोहयोची कामे सुरू करण्याची मागणी होत आहे.पावणे तीनशे ग्राम पंचायती उदासीनरोजगार हमी योजनेच्या कामाचा आराखडा ग्राम पंचायत स्तरावर तयार केला जातो. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाकडे कामांची यादी पाठवून कामे मंजूर करण्याचा प्रस्ताव पाठविला जातो. ही सर्व प्रक्रिया पार पाडून बहुतांश ग्राम पंचायतींमध्ये नरेगाची कामे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र नव्या वर्षातील जानेवारी महिना येऊनही अनेक ग्राम पंचायतींनी संबंधित गावात मंजूर असलेली रोहयोची कामे सुरूच केली नाही. अशा ग्राम पंचायतीची संख्या पावणे तीनशेच्या आसपास आहे. मजुरांना १०० दिवसांचा रोजगार देण्यात या पावणे तीनशे ग्राम पंचायती उदासीन असल्याचे दिसून येते. त्यामुळे या ग्राम पंचायतीच्या गावातील शेकडो नोंदणीकृत मजूर रिकाम्या हाताने पडून आहेत.