शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

‘महात्मा’च्या कर्मचाऱ्यांना आठ महिन्यांचा पगार मिळाला

By admin | Updated: March 10, 2015 23:59 IST

शिष्यवृत्ती घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर आलापल्ली गावातून रातोरात गायब झालेल्या महात्मा गांधी कॉलेजने मागील आठ महिन्यांपासून थकविलेला पगार अखेर कर्मचाऱ्यांना अदा केला.

दणका लोकमतचाप्रशांत ठेपाले आलापल्लीशिष्यवृत्ती घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर आलापल्ली गावातून रातोरात गायब झालेल्या महात्मा गांधी कॉलेजने मागील आठ महिन्यांपासून थकविलेला पगार अखेर कर्मचाऱ्यांना अदा केला. गडचिरोली जिल्ह्यात शिष्यवृत्ती घोटाळा उजेडात आला आहे. या शिष्यवृत्ती घोटाळ्याची अहेरी व भामरागड प्रकल्प कार्यालयांतर्गतही चौकशी सुरू झाली आहे. अहेरी प्रकल्पाचे चौकशी पथक महात्मा गांधी कॉलेज आलापल्ली येथे पोहोचले. त्यावेळी कॉलेजचा सारा गाशा गुंडाळलेला होता. कॉलेजने येथून रातोरात पलायन केल्याची बातमी लोकमतने सर्व प्रथम प्रकाशित केली. या बातमीत या कॉलेजमध्ये काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांचे मागील आठ महिन्यांपासूनचे वेतनही देण्यात आले नाही, असेही नमूद केले होते.त्यानंतर या महाविद्यालयाच्या संचालकाने आपल्या जवळचा व्यक्ती ९ मार्च रोजी सोमवारला सायंकाळी ५ वाजता आलापल्ली येथे पाठवून चारही कर्मचाऱ्यांचे ७० हजार रूपयाचे नगदी वेतन अदा केले. लोकमतने आम्हाला वेतन काढून देण्यासाठी तत्परतेने मदत केली, अशी भावना या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच ज्या विजय गुप्ता यांच्या घरी हे महाविद्यालय सुरू होते, त्यांनाही आॅगस्ट २०१४ पासूनचे भाडे मिळालेले नाही. त्यांनाही सोमवारी या संस्थाचालकच्या जवळच्या व्यक्तीने हिशोब विचारला. त्यामुळे आपल्यालाही भाडे मिळेल, असा विश्वास गुप्ता यांनी व्यक्त केला आहे. महाविद्यालय अचानकच गायब झाल्यामुळे आलापल्लीत प्रचंड खळबळ उडाली होती.