शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
२३ वर्षांनी अमेरिकन पत्रकाराला मिळाला न्याय; भारतानं पाकिस्तानवर हल्ला करत घेतला बदला
3
सीमेपासून समुद्रापर्यंत... भारताचे नियोजन पाहून पाकिस्तानला भरली धडकी!
4
"शत्रूला त्याची जागा दाखवण्याची वेळ आली...", मधुगंधा कुलकर्णीची देशभक्तीवरील पोस्ट चर्चेत
5
टीव्ही अभिनेत्याचं कुटुंब जम्मूमध्ये; रात्री घाबरुन पोस्ट करत म्हणाला, "मी देशाबाहेर..."
6
मोठी बातमी! ट्रान्स-हार्बर लोकल ट्रेन सेवा अनिश्चित काळासाठी बंद, तुर्भेजवळ गर्डर पडण्याचा धोका
7
“पाकचा खात्मा करण्यास भारतीय सैन्याला यश मिळो”; गुवाहाटीत कामाख्या देवीला साकडे, विशेष पूजा
8
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची मित्रराष्ट्रांकडे मदतीची याचना, अधिकचं कर्ज मागितलं
9
Stock Market Today: मोठ्या घसरणीसह उघडल्यानंतर शेअर बाजार स्थिरावला, निफ्टीमध्येही २०० अंकांची घसरण
10
IMF Bailout Package to Pakistan : रात्रभर मिसाईल्सनं ठोकलं, आता पाकिस्तानला उपाशी मारण्याची तयारी; ११ हजार कोटींची खैरात मिळणार नाही?
11
India Pakistan: पाकिस्तानच्या कुरघोड्यांमुळे सीमेवर तणाव वाढला, भारतातील २४ विमानतळे बंद
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
13
Operation Sindoor : राजनाथ सिंह घेणार मोठी बैठक, तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएस राहणार उपस्थित!
14
India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाला! भारताच्या कारवाईदरम्यान मोठा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी
15
४१ वर्षीय मराठमोळा अभिनेता करतोय परिक्षेची तयारी, काही दिवसांनी आहेत पेपर, म्हणतो - "मला चांगलं करायचं आहे…"
16
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
17
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
18
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
19
Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना!
20
Mother's Day 2025: आईला द्या ५ स्कीममध्ये गुंतवणूक करुन गिफ्ट; लोकही म्हणतील, मुल असावं तर असं!

कर्मचाऱ्यांच्या मनमानीने पेट्रोेलपंप बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:07 IST

एटापल्ली पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यासोबत एका ग्राहकाचा वाद झाल्याच्या कारणावरून एटापल्ली येथील पेट्रोलपंप ६ एप्रिलपासून अचानक बंद ठेवण्यात आला आहे. या पेट्रोलपंपाव्यतीरिक्त एटापल्ली तालुक्यात दुसरा पेट्रोलपंप नसल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत.

ठळक मुद्देएटापल्ली तालुक्यातील वाहनधारक त्रस्त : कर्मचाºयांसोबत ग्राहकांचा वाद झाल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : एटापल्ली पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यासोबत एका ग्राहकाचा वाद झाल्याच्या कारणावरून एटापल्ली येथील पेट्रोलपंप ६ एप्रिलपासून अचानक बंद ठेवण्यात आला आहे. या पेट्रोलपंपाव्यतीरिक्त एटापल्ली तालुक्यात दुसरा पेट्रोलपंप नसल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत. पंचायत समितीच्या या मनमानी कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.एटापल्ली हा दुर्गम व नक्षलग्रस्त भागात मोडतो. त्यामुळे या ठिकाणी पेट्रोलपंप टाकण्यास खासगी व्यावसायिक तयार नव्हते. वाहनधारकांची मागणी लक्षात घेऊन २००५ मध्ये तत्कालीन पंचायत समितीचे उपसभापती केवल अतकमवार, सभापती सपना कोडापे, संवर्ग विकास अधिकारी शालिकराम पडघन यांनी पुढाकार घेतला. तत्कालीन पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रामालो जैन व जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर शासनाने पंचायत समितीला पेट्रोलपंप टाकण्याची परवानगी दिली. पंचायत समितीच्या वतीने चालविला जाणारा हा राज्यातील एकमेव पेट्रोलपंप आहे.एटापल्ली तालुक्याचा विस्तार १०० किमीचा आहे. यातील ९० टक्के गावे नक्षलग्रस्त व दुर्गम भागात आहेत. एटापल्लीवगळता तालुक्यात एकही पेट्रोलपंप नाही. एटापल्लीमध्ये सुद्धा पंचायत समितीच्या पेट्रोलपंपाव्यतीरिक्त दुसरे पेट्रोलपंप नाही. त्यामुळे तालुकाभरातील व भामरागड तालुक्याच्या सीमावर्ती भागातील नागरिक याच पेट्रोलपंपावर पेट्रोल भरत होते.२००५ ते २०१८ पर्यंत पेट्रोलपंप नियमित सुरू होता. पेट्रोलपंपाची मालकी पंचायत समितीकडे असल्याने या ठिकाणी पंचायत समितीचा लिपीक नेमल्या जातो. ६ एप्रिल रोजी पंचायत समितीचा लिपीक साळुंकी यांचा ग्राहकांसोबत वाद झाला. या वादातून पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पेट्रोल व डिझेल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. सदर पेट्रोेलपंप पंचायत समितीचा आहे. मात्र येथील अधिकारी व कर्मचारी हा पेट्रोलपंप स्वत:च्या मालकीचा असल्याच्या अविर्भावात वागतात. पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे वाहनधारकही कमालीचे त्रस्त झाले आहेत. मात्र या पेट्रोलपंपाशिवाय दुसरा पर्याय नसल्याने कर्मचाºयांची मनमानी खपवत पेट्रोल व डिझेल भरावे लागत आहे.पेट्रोलपंपाला बाहेरूनच कुलूप ठोकून दरवाजाच्या बाजूला पेट्रोलपंप बंद आहे, असा फलक लावण्यात आला आहे. याबाबत लिपीक साळुंकी यांना विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तर दिले. तर संवर्ग विकास अधिकारी अनिल वाघमारे यांनी माझी प्रकृती बरी नाही, मी आल्यानंतर सुरू करू, असे सांगून वेळ मारून नेली.एटापल्ली येथील पेट्रोलपंप बंद असल्याने वाहनधारकांना आलापल्ली, अहेरी, भामरागड येथून पेट्रोल व डिझेल भरून आणावे लागत आहे. या तिन्ही गावांचे अंतर एटापल्लीपासून ५० किमीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पेट्रोलपंप सुरू करावा, अशी मागणी तालुक्यातील वाहनधारकांकडून होत आहे.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंप