शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कर्मचाऱ्यांच्या मनमानीने पेट्रोेलपंप बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:07 IST

एटापल्ली पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यासोबत एका ग्राहकाचा वाद झाल्याच्या कारणावरून एटापल्ली येथील पेट्रोलपंप ६ एप्रिलपासून अचानक बंद ठेवण्यात आला आहे. या पेट्रोलपंपाव्यतीरिक्त एटापल्ली तालुक्यात दुसरा पेट्रोलपंप नसल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत.

ठळक मुद्देएटापल्ली तालुक्यातील वाहनधारक त्रस्त : कर्मचाºयांसोबत ग्राहकांचा वाद झाल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : एटापल्ली पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यासोबत एका ग्राहकाचा वाद झाल्याच्या कारणावरून एटापल्ली येथील पेट्रोलपंप ६ एप्रिलपासून अचानक बंद ठेवण्यात आला आहे. या पेट्रोलपंपाव्यतीरिक्त एटापल्ली तालुक्यात दुसरा पेट्रोलपंप नसल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत. पंचायत समितीच्या या मनमानी कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.एटापल्ली हा दुर्गम व नक्षलग्रस्त भागात मोडतो. त्यामुळे या ठिकाणी पेट्रोलपंप टाकण्यास खासगी व्यावसायिक तयार नव्हते. वाहनधारकांची मागणी लक्षात घेऊन २००५ मध्ये तत्कालीन पंचायत समितीचे उपसभापती केवल अतकमवार, सभापती सपना कोडापे, संवर्ग विकास अधिकारी शालिकराम पडघन यांनी पुढाकार घेतला. तत्कालीन पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रामालो जैन व जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर शासनाने पंचायत समितीला पेट्रोलपंप टाकण्याची परवानगी दिली. पंचायत समितीच्या वतीने चालविला जाणारा हा राज्यातील एकमेव पेट्रोलपंप आहे.एटापल्ली तालुक्याचा विस्तार १०० किमीचा आहे. यातील ९० टक्के गावे नक्षलग्रस्त व दुर्गम भागात आहेत. एटापल्लीवगळता तालुक्यात एकही पेट्रोलपंप नाही. एटापल्लीमध्ये सुद्धा पंचायत समितीच्या पेट्रोलपंपाव्यतीरिक्त दुसरे पेट्रोलपंप नाही. त्यामुळे तालुकाभरातील व भामरागड तालुक्याच्या सीमावर्ती भागातील नागरिक याच पेट्रोलपंपावर पेट्रोल भरत होते.२००५ ते २०१८ पर्यंत पेट्रोलपंप नियमित सुरू होता. पेट्रोलपंपाची मालकी पंचायत समितीकडे असल्याने या ठिकाणी पंचायत समितीचा लिपीक नेमल्या जातो. ६ एप्रिल रोजी पंचायत समितीचा लिपीक साळुंकी यांचा ग्राहकांसोबत वाद झाला. या वादातून पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पेट्रोल व डिझेल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. सदर पेट्रोेलपंप पंचायत समितीचा आहे. मात्र येथील अधिकारी व कर्मचारी हा पेट्रोलपंप स्वत:च्या मालकीचा असल्याच्या अविर्भावात वागतात. पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे वाहनधारकही कमालीचे त्रस्त झाले आहेत. मात्र या पेट्रोलपंपाशिवाय दुसरा पर्याय नसल्याने कर्मचाºयांची मनमानी खपवत पेट्रोल व डिझेल भरावे लागत आहे.पेट्रोलपंपाला बाहेरूनच कुलूप ठोकून दरवाजाच्या बाजूला पेट्रोलपंप बंद आहे, असा फलक लावण्यात आला आहे. याबाबत लिपीक साळुंकी यांना विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तर दिले. तर संवर्ग विकास अधिकारी अनिल वाघमारे यांनी माझी प्रकृती बरी नाही, मी आल्यानंतर सुरू करू, असे सांगून वेळ मारून नेली.एटापल्ली येथील पेट्रोलपंप बंद असल्याने वाहनधारकांना आलापल्ली, अहेरी, भामरागड येथून पेट्रोल व डिझेल भरून आणावे लागत आहे. या तिन्ही गावांचे अंतर एटापल्लीपासून ५० किमीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पेट्रोलपंप सुरू करावा, अशी मागणी तालुक्यातील वाहनधारकांकडून होत आहे.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंप