शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

आलापल्ली ग्रा.पं.च्या कर्मचाऱ्यांचे पगार चार महिन्यांपासून थकले

By admin | Updated: March 31, 2017 01:01 IST

गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या आलापल्ली ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात मागील आठ महिन्यांपासून पाणीपुरवठा व्यवस्था बंद आहे.

नागरिक त्रस्त : आठ महिन्यांपासून पाणी पुरवठा बंदआलापल्ली : गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या आलापल्ली ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात मागील आठ महिन्यांपासून पाणीपुरवठा व्यवस्था बंद आहे. ऐन उन्हाळाच्या तोंडावर नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांपासून वेतन थकीत आहे. याबाबत सरपंच व सचिव एकमेकांचे नाव सांगून वेळ मारून नेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या संदर्भात ग्रामपंचायत सदस्यांनी आता एल्गार पुकारला असून लोकमतला माहिती देताना ग्रामपंचायत सदस्य रवींद्र मुप्पीडवार, सुधाकर पेद्दिवार, संतोष तोडसाम, सतीश आत्राम, विनोद अकनपल्लीवार, आशीष झाडे, अल्का सोनुले, चंद्रकला तलांडे, शकुंतला दुर्गम, संगीता तावाडे, अर्चना कोडापे, संगीता इष्टाम, सलीम शेख, कैलाश कोरेत यांनी म्हटले आहे की, ग्रामपंचायतीला गृहकर, सामान्य पाणीपट्टी कर, सामान्य पावती, दैनिक गुजरी व आठवडी बाजाराच्या लिलावातून उत्पन्न मिळते. मात्र हे कुणीकडे जाते हे सरपंच व सचिवांनाच ठावूक आहे. लाखो रूपयांची आवक ग्रामपंचायतीला असताना मागील चार महिन्यांपासून कर्मचाऱ्याचे वेतन थकलेले आहे. वसुली करीत नाही म्हणून कर्मचाऱ्यांमागे तगादा लावला जात आहे. अत्यल्प कमी वेतनात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना राबवून घेऊन चार-चार महिने पगार दिले जात नाही. याची ग्रामपंचायत प्रशासनाला लाज वाटली पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया या सदस्यांनी दिली आहे. आठ महिन्यांपासून नळ पाणी पुरवठा बंद झाल्याने नागरिकांवर उन्हाळ्याच्या तोंडावरच पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. सन २०१५ पासून ग्रामपंचायत कार्यालयातील जमा खर्चाचे हिशोब जोपर्यंत सरपंच आणि सचिव सादर करणार नाही, तोपर्यंत प्रत्येक सदस्याचा मासिक सभेवर बहिष्कार राहणार असल्याचे सदर सदस्यांनी लोकमतला पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. ३० मार्च २०१७ ला मासिक सभेत सर्व सदस्य उपस्थित होते. त्यांनी पूर्ण हिशोब जोपर्यंत सादर करणार नाही तोपर्यंत बहिष्कार राहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे पेसांतर्गत आलेला निधी हा पेसा क्षेत्रातच खर्च करावा लागतो. मात्र आलापल्ली ग्रामपंचायतमध्ये हा पैसा इतरत्र खर्च करण्यात आला. याची चौकशीही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने करावी, अशी मागणी या सदस्यांनी केली आहे.