शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आलापल्ली ग्रा.पं.च्या कर्मचाऱ्यांचे पगार चार महिन्यांपासून थकले

By admin | Updated: March 31, 2017 01:01 IST

गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या आलापल्ली ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात मागील आठ महिन्यांपासून पाणीपुरवठा व्यवस्था बंद आहे.

नागरिक त्रस्त : आठ महिन्यांपासून पाणी पुरवठा बंदआलापल्ली : गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या आलापल्ली ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात मागील आठ महिन्यांपासून पाणीपुरवठा व्यवस्था बंद आहे. ऐन उन्हाळाच्या तोंडावर नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांपासून वेतन थकीत आहे. याबाबत सरपंच व सचिव एकमेकांचे नाव सांगून वेळ मारून नेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या संदर्भात ग्रामपंचायत सदस्यांनी आता एल्गार पुकारला असून लोकमतला माहिती देताना ग्रामपंचायत सदस्य रवींद्र मुप्पीडवार, सुधाकर पेद्दिवार, संतोष तोडसाम, सतीश आत्राम, विनोद अकनपल्लीवार, आशीष झाडे, अल्का सोनुले, चंद्रकला तलांडे, शकुंतला दुर्गम, संगीता तावाडे, अर्चना कोडापे, संगीता इष्टाम, सलीम शेख, कैलाश कोरेत यांनी म्हटले आहे की, ग्रामपंचायतीला गृहकर, सामान्य पाणीपट्टी कर, सामान्य पावती, दैनिक गुजरी व आठवडी बाजाराच्या लिलावातून उत्पन्न मिळते. मात्र हे कुणीकडे जाते हे सरपंच व सचिवांनाच ठावूक आहे. लाखो रूपयांची आवक ग्रामपंचायतीला असताना मागील चार महिन्यांपासून कर्मचाऱ्याचे वेतन थकलेले आहे. वसुली करीत नाही म्हणून कर्मचाऱ्यांमागे तगादा लावला जात आहे. अत्यल्प कमी वेतनात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना राबवून घेऊन चार-चार महिने पगार दिले जात नाही. याची ग्रामपंचायत प्रशासनाला लाज वाटली पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया या सदस्यांनी दिली आहे. आठ महिन्यांपासून नळ पाणी पुरवठा बंद झाल्याने नागरिकांवर उन्हाळ्याच्या तोंडावरच पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. सन २०१५ पासून ग्रामपंचायत कार्यालयातील जमा खर्चाचे हिशोब जोपर्यंत सरपंच आणि सचिव सादर करणार नाही, तोपर्यंत प्रत्येक सदस्याचा मासिक सभेवर बहिष्कार राहणार असल्याचे सदर सदस्यांनी लोकमतला पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. ३० मार्च २०१७ ला मासिक सभेत सर्व सदस्य उपस्थित होते. त्यांनी पूर्ण हिशोब जोपर्यंत सादर करणार नाही तोपर्यंत बहिष्कार राहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे पेसांतर्गत आलेला निधी हा पेसा क्षेत्रातच खर्च करावा लागतो. मात्र आलापल्ली ग्रामपंचायतमध्ये हा पैसा इतरत्र खर्च करण्यात आला. याची चौकशीही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने करावी, अशी मागणी या सदस्यांनी केली आहे.