शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

कर्मचाऱ्यांचे समायोजन रखडले

By admin | Updated: July 14, 2017 02:17 IST

तालुकास्तरावरील ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर करण्यात आले. मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूनही

असुरक्षिततेची भावना : आकृतीबंध तयार केला मात्र भरतीचा पत्ता नाहीलोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुकास्तरावरील ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर करण्यात आले. मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूनही ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे नगर पंचायतीत समायोजन करण्यात आले नाही. समायोजन तत्काळ करावे, अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी आरमोरी यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.दोन वर्षांपूर्वी राज्यातील ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीत केले. ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी शासनाने यादी मागितली होती. त्यानुसार शासनाला माहिती पुरविण्यात आली. ५ जुलै २०१६ रोजी नगर पंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधास मान्यता देण्यात आली. यास आता एक वर्षाचा कालावधी झाला असतानाही पदभरती झाली नाही. त्यामुळे आकृतीबंध तयार होऊन एक वर्षांचा कालावधी उलटून नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे समायोजन रखडले आहे. त्यांच्या समायोजनाची कोणतीही प्रक्रिया सुरू झाली नाही. त्यांना वेतनश्रेणीसुद्धा लागू झाली नाही. या कर्मचाऱ्यांना नगर पंचायतीचा कारभार सांभाळण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षणसुद्धा देण्यात आले नाही. त्यामुळे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष घालून या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे, अशी मागणी नगर पंचायतमधील कर्मचाऱ्यांनी निवेदनातून केली आहे. अन्यथा कामबंद आंदोलन करण्याचा इशारा नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. असुरक्षिततेची भावना असल्याने याचा विपरित परिणाम कामावर पडत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वीही कर्मचाऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून पदभरती करण्याची मागणी केली आहे. मात्र याकडे नगर विकास विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या असंतोषाचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यापूर्वी नगर पंचायत कार्यालयात पदभरती होणे गरजेचे आहे.