शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

कर्मचाऱ्यांचे समायोजन रखडले

By admin | Updated: July 14, 2017 02:17 IST

तालुकास्तरावरील ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर करण्यात आले. मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूनही

असुरक्षिततेची भावना : आकृतीबंध तयार केला मात्र भरतीचा पत्ता नाहीलोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुकास्तरावरील ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर करण्यात आले. मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूनही ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे नगर पंचायतीत समायोजन करण्यात आले नाही. समायोजन तत्काळ करावे, अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी आरमोरी यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.दोन वर्षांपूर्वी राज्यातील ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीत केले. ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी शासनाने यादी मागितली होती. त्यानुसार शासनाला माहिती पुरविण्यात आली. ५ जुलै २०१६ रोजी नगर पंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधास मान्यता देण्यात आली. यास आता एक वर्षाचा कालावधी झाला असतानाही पदभरती झाली नाही. त्यामुळे आकृतीबंध तयार होऊन एक वर्षांचा कालावधी उलटून नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे समायोजन रखडले आहे. त्यांच्या समायोजनाची कोणतीही प्रक्रिया सुरू झाली नाही. त्यांना वेतनश्रेणीसुद्धा लागू झाली नाही. या कर्मचाऱ्यांना नगर पंचायतीचा कारभार सांभाळण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षणसुद्धा देण्यात आले नाही. त्यामुळे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष घालून या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे, अशी मागणी नगर पंचायतमधील कर्मचाऱ्यांनी निवेदनातून केली आहे. अन्यथा कामबंद आंदोलन करण्याचा इशारा नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. असुरक्षिततेची भावना असल्याने याचा विपरित परिणाम कामावर पडत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वीही कर्मचाऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून पदभरती करण्याची मागणी केली आहे. मात्र याकडे नगर विकास विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या असंतोषाचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यापूर्वी नगर पंचायत कार्यालयात पदभरती होणे गरजेचे आहे.