शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांचे समायोजन रखडले

By admin | Updated: July 14, 2017 02:17 IST

तालुकास्तरावरील ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर करण्यात आले. मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूनही

असुरक्षिततेची भावना : आकृतीबंध तयार केला मात्र भरतीचा पत्ता नाहीलोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुकास्तरावरील ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर करण्यात आले. मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूनही ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे नगर पंचायतीत समायोजन करण्यात आले नाही. समायोजन तत्काळ करावे, अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी आरमोरी यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.दोन वर्षांपूर्वी राज्यातील ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीत केले. ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी शासनाने यादी मागितली होती. त्यानुसार शासनाला माहिती पुरविण्यात आली. ५ जुलै २०१६ रोजी नगर पंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधास मान्यता देण्यात आली. यास आता एक वर्षाचा कालावधी झाला असतानाही पदभरती झाली नाही. त्यामुळे आकृतीबंध तयार होऊन एक वर्षांचा कालावधी उलटून नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे समायोजन रखडले आहे. त्यांच्या समायोजनाची कोणतीही प्रक्रिया सुरू झाली नाही. त्यांना वेतनश्रेणीसुद्धा लागू झाली नाही. या कर्मचाऱ्यांना नगर पंचायतीचा कारभार सांभाळण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षणसुद्धा देण्यात आले नाही. त्यामुळे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष घालून या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे, अशी मागणी नगर पंचायतमधील कर्मचाऱ्यांनी निवेदनातून केली आहे. अन्यथा कामबंद आंदोलन करण्याचा इशारा नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. असुरक्षिततेची भावना असल्याने याचा विपरित परिणाम कामावर पडत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वीही कर्मचाऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून पदभरती करण्याची मागणी केली आहे. मात्र याकडे नगर विकास विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या असंतोषाचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यापूर्वी नगर पंचायत कार्यालयात पदभरती होणे गरजेचे आहे.