शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

रोजगार निर्मितीमधील सर्व अडथळे दूर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:00 IST

सर्वप्रथम गृहमंत्र्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील शहीद स्मारकावर पुष्पचक्र वाहून आदरांजली व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी पोलीस विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील नक्षलविरोधी अभियान आणि पोलिसांकडून राबविल्या जात असलेल्या योजनांची माहिती अधिकाऱ्यांनी गृहमंत्र्यांना दिली. त्यानंतर ना.शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ठळक मुद्देगृहमंत्र्यांची ग्वाही : प्रतिकूल परिस्थितीतही प्रशासनाचे काम स्तुत्य असल्याची पावती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या खनिज संपत्तीतून उद्योगाला चालना मिळण्यासोबतच रोजगार निर्मिती होण्यास वाव आहे. मुख्यमंत्र्यांनी आधीच त्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. तरीही आपण त्यांच्याशी चर्चा करणार असून या कामातील सर्व अडथळे लवकरात लवकर दूर करून रोजगार निर्मितीचा मार्ग मोकळा केला जाईल, अशी ग्वाही राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.गृहमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ना.शिंदे रविवारी (दि.२२) पहिल्यांदाच गडचिरोलीत आले. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस उपमहानिरीक्षक महादेव तांबडे उपस्थित होते. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त पो.अधीक्षक मोहीत गर्ग, अजय बंसल, सुदर्शन या अधिकाऱ्यांनी त्यांचे हेलिपॅडवर स्वागत केले.सर्वप्रथम गृहमंत्र्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील शहीद स्मारकावर पुष्पचक्र वाहून आदरांजली व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी पोलीस विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील नक्षलविरोधी अभियान आणि पोलिसांकडून राबविल्या जात असलेल्या योजनांची माहिती अधिकाऱ्यांनी गृहमंत्र्यांना दिली. त्यानंतर ना.शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.गृहमंत्री शिंदे म्हणाले, नक्षल चळवळीमुळे जिल्ह्यातील विकास कामांना फार मोठा अडथळा निर्माण झाला होता. आता अशा प्रतिकुल परिस्थितीतही जिल्हा प्रशासन सर्वंकष योजनांची अंमलबजावणी करुन विकास कामे गतीने करीत आहे. नक्षल चळवळीत येथील स्थानिक युवकांचा समावेश आहे. अशा भरकटलेल्या युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जनजागरण मेळाव्याव्दारे प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केल्या जात आहेत. नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा पुरवून त्यांना दैनंदिन जीवनात कोणत्याही बाबींची कमतरता राहणार नाही, याचीही दक्षता घेण्यात येत आहे. जिल्ह्यात प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल यासाठी रोजगाराची निर्मिती करणे काळाची गरज असून याशिवाय युवक मुख्य प्रवाहात येणार नाही. शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, विद्युत, कृषीवर आधारित उद्योग यावर भर देण्यात येईल, असेही शिंदे म्हणाले.जिल्ह्यात सिंचनाच्या सोयी उपलब्ध करुन देताना मोठ्या प्रकल्पाऐवजी लहान प्रकल्प तयार करण्याचा शासन विचार करीत आहे. शेतीला आधुनिकतेची जोड देऊन आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जाईल. सोबतच शेतात उत्पन्न झालेल्या धानाला योग्य भाव मिळेल अशा आधारभूत किमती निश्चित करण्यात येतील, असे गृहमंत्री म्हणाले.जिल्ह्यात रस्त्यांची वाईट अवस्था आहे. कंत्राटदारांच्या कामाचा दर्जा चांगला असावा आणि कामाचा वेग वाढावा, यावर आपला भर राहणार असल्याचे ते म्हणाले. गडचिरोली जिल्ह्यात बीआरओच्या कामाप्रमाणे प्रलंबित राहीलेल्या रस्त्यांची, पुलांची कामे प्राधान्याने पुर्ण करुन दळणवळण व्यवस्था चांगली करुन देणार असल्याचे ते म्हणाले.पदभरतीमधील अडचणींसाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणारजिल्ह्यात सुधारित बिंदूनामावलीचा आदेश आणि त्याला लगेच दिलेली स्थागिती यामुळे पदभरतीबाबत गोंधळ सुरू आहे. तो दूर करून पोलीस व इतर पदभरतीचा मार्ग दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलण्याचे आश्वासन ना.शिंदे यांनी दिले. पोलीस विभागाला जे हवं ते देण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे गृहमंत्री म्हणाले.शहीद जवानांना आदरांजलीगृह मंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात असलेल्या शहीद पोलिसांच्या स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करु न शहीद जवानांना आदरांजली वाहीली. बैठकीनंतर गृहमंत्र्यांनी हेलिकॉप्टरने गोडलवाही येथील उपपोलीस ठाण्याला भेट दिली. त्यानंतर ते नागपूरकडे रवाना झाले. हेलिपॅडवर त्यांचे स्वागत करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारीही आले होते.

टॅग्स :Unemploymentबेरोजगारी