शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १ जुलैपासून हत्तीरोग निर्मूलन मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:25 IST

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत वेगवेगळ्या विभागांचा समावेश असणारी जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली. हा ...

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत वेगवेगळ्या विभागांचा समावेश असणारी जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली. हा कार्यक्रम हा जिल्ह्यातील प्रत्येक गावपातळीपर्यंत राबविला जाणार आहे. त्यासाठी आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व इतर स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. त्याचबरोबर तालुकास्तरावर वैद्यकीय अधिकारी यांची चमू नेमण्यात आली आहे. गोळ्या सेवन केल्यानंतर काही गुंतागुंत निर्माण झाल्यास वैद्यकीय चमू तत्काळ औषधोपचार करण्यासाठी येईल, असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी बैठकीत सांगितले.

यावेळी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील मडावी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा साथरोग अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक, जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे डॉ. अमरदीप नंदेश्वर, जिल्हा नोडल अधिकारी डॉ. पंकज हेमके, डॉ. बागराज धुर्वे यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

(बॉक्स)

जिल्ह्यात हत्तीरोगाचे ३८६२ रुग्ण

- हत्तीरोग हा आजार फॉयलेरिया कृमीमुळे होतो. ही कृमी दूषित क्युलेक्स मादी डासापासून माणसाच्या शरीरात प्रवेश करते. क्युलेक्स डासाची उत्पत्ती घाण पाण्यात होते. पायावर सूज येणे, हत्तीच्या पायासारखे पाय होणे, अंडवृद्धी होणे ही हत्तीरोगाची लक्षणे आहेत.

- जिल्ह्यात आजपर्यंत हत्तीरोगाचे ३८६२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर नियमित औषधोपचार करण्यात येत आहे. तसेच एकूण १९३० अंडवृद्धी रुग्ण असून, त्यापैकी ३८९ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

- हत्तीरोगाच्या गोळ्यांच्या सेवनामुळे हत्तीरोगाच्या कृमींचा पूर्ण नायनाट होतो. ही केवळ गोळ्या वाटपाची मोहीम नसून लाभार्थ्यांला प्रत्यक्ष त्या गोळ्या खाऊ घातल्या जाणार आहे. या औषधाने कोणताही दुष्परिणाम होत नाही.