शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

प्राथमिक शाळांना वर्ग ५ व ८ जोडू नये

By admin | Updated: May 15, 2014 23:33 IST

नवीन शैक्षणिक सत्राकरिता इयत्ता ५ वी व ८ वी तील विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना इयत्ता ५ वी व ८ वी चे वर्ग जोडण्यात येणार आहे.

गडचिरोली : नवीन शैक्षणिक सत्राकरिता इयत्ता ५ वी व ८ वी तील विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना इयत्ता ५ वी व ८ वी चे वर्ग जोडण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवेशाकरिता सगळीकडे धावपळीची अवस्था निर्माण झाली आहे. प्राथमिक शाळांना वर्ग ५ व ८ जोडले तर त्याचा परिणाम अशासकीय शाळांच्या तुकड्या बंद होण्यावर होणार आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना इयत्ता ५ व ८ वीच्या तुकड्या जोडू नये, अशी मागणी जिल्हा मुख्याध्यापक संघाने केली आहे.

काही संघटनांनी गडचिरोली जिल्ह्यात आरटीईच्या कलमामध्ये शिथिलता आणून इयत्ता ५ व ८ वा वर्ग सुरू करण्याची अनुक्रमे १ किमी व ३ किमी अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे अशासकीय माध्यमिक शाळेवर प्रतिकूल परिणाम होईल व विद्यार्थ्यांच्या अभावी तुकड्या बंद होण्याची नामुश्की येईल. पर्यायाने अनेक शिक्षकांच्या समायोजनाचा गंभीर प्रश्न शिक्षण विभागासमोर निर्माण होईल. त्यामुळे गडचिरोली जिल्हा मुख्याध्यापक संघाने या मागणीला तीव्र विरोध दर्शविला आहे. आरटीईच्या अटीमध्ये कोणत्याही प्रकारे शिथिलता आणू नये, अशी भूमिका जिल्हा मुख्याध्यापक संघाने घेतली आहे. प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना शाळा सोडण्याचे दाखले देऊ नये, शिक्षण विभागाच्या मौखिक सूचनेनुसार दाखले देणे सुरू झालेले नाहीत तरीही काही संघटना आरटीईच्या कलमामध्ये शिथिलता आणून इयत्ता ५ व ८ चा वर्ग सुरू करण्याची १ व ३ किमीची अट रद्द करण्याची मागणी करीत आहेत. त्यामुळे अशासकीय शाळांवर विपरित परिणाम होण्याची भीती मुख्याध्यापक संघाने व्यक्त केली आहे. शाळा सोडण्याचा दाखला मिळण्याकरिता पालकाने शाळेशी संपर्क केल्यास तो त्वरित देण्यात यावा. त्यात कसल्याही प्रकारचा वेळकाढूपणा करण्यात येऊ नये, अशा सूचना संबंधित विभागाने प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना त्वरित निर्गमित कराव्यात, अशी मागणी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य संजय नार्लावार, सचिव प्राचार्य टी. के. बोरकर, उपाध्यक्ष प्राचार्य महेश तुम्पल्लीवार, प्राचार्य सी. एल. डोंगरवार, प्राचार्य संजय भांडारकर, प्राचार्य मनिष शेटे, प्राचार्य जयंत येलमुले यांनी केली आहे.