शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

विद्युतीकरण घोटाळा थंडबस्त्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 23:07 IST

देसाईगंज शहरातील चार रस्त्यांवरील विद्युतीकरण कामात घोटाळा झाल्याचे चौकशी समितीच्या अहवालात स्पष्ट झाले असताना अद्याप कोणावरही कारवाई झाली नाही. जवळपास दोन कोटींच्या या कामात तत्कालीन अधिकाऱ्यांसह पदाधिकारीही दोषी आहेत.

ठळक मुद्देदेसाईगंजमधील प्रकार : समितीने ठपका ठेवला तरी गुन्हे दाखल नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देसाईगंज शहरातील चार रस्त्यांवरील विद्युतीकरण कामात घोटाळा झाल्याचे चौकशी समितीच्या अहवालात स्पष्ट झाले असताना अद्याप कोणावरही कारवाई झाली नाही. जवळपास दोन कोटींच्या या कामात तत्कालीन अधिकाऱ्यांसह पदाधिकारीही दोषी आहेत. त्यामुळे नगर विकास विभागाच्या आयुक्तांनी कारवाईचे निर्देश दिले. मात्र तीन महिने लोटले तरी हे प्रकरण थंडबस्त्यात आहे. त्यामुळे या प्रकरणात कुठे पाणी मुरतेय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.यासंदर्भात देसाईगंजच्या माजी नगरसेविका कल्पना अशोक माडावार यांनीही बुधवारी जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. नगरोत्थान जिल्हा वार्षिक योजनेतून २०१४-१५ या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या या कामासाठी १ कोटी ९९ लाख ७८ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकाला मुख्य अभियंता (तांत्रिक), सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून तांत्रिक मान्यता मिळाली होती. मात्र खांबांच्या उभारणीपासून तर दिवे लावण्यापर्यंत सर्वच ठिकाणी घोळ झाल्याचे समोर आले आहे.देसाईगंज नगर परिषदेने सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार ८ आॅगस्ट २०१३ रोजी रस्ता दुभाजक एलईडी लाईट फिटींगसह विद्युत खांब उभारणीच्या कामास आर्थिक व प्रशासकीय मान्यता दिली होती. जिल्हा नियोजन समितीत ६ सप्टेंबर २०१४ रोजी सदर कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला. मात्र कामातील घोळाच्या तक्रारी मिळाल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या चमुने केलेल्या चौकशीत काम न करताच कंत्राटदारास देयकांची रक्कम प्रदान करणे, तांत्रिक मंजुरीनुसार फिलीप्स कंपनीचे दिवे लावायचे असताना त्याऐवजी दुसºयाच कंपनीचे दिवे खरेदी करणे, तांत्रिक तपासणी न करताच ८० टक्के अग्रीम देणे, सा.बां. विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त न करणे आदी बाबी घडल्याचे दिसून आले. या प्रकरणात कंत्राटदार-पुरवठादार, तत्कालीन मुख्याधिकारी सुद्धा दोषी आढळले आहेत.आयुक्तांच्या आदेशाला प्रशासनाकडून खोया घोटाळ्याला तीन वर्षांचा कालावधी लोटला आहे. विभागीय आयुक्तांच्या चौकशीनंतर नगर पालिका प्रशासन विभागाच्या आयुक्तांनी दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांना दिले. परंतू प्रत्यक्ष अजूनपर्यंत कोणावरही कारवाई झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणात कारवाई होऊ नये म्हणून प्रशासनावर राजकीय दडपण तर येत नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे.