शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

१०० गावांची वीज समस्या सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:00 IST

गडचिरोली जिल्ह्याचा ७८ टक्के भाग घनदाट जंगलाने व्यापला आहे. बहुतांश गावांना विद्युत पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्या जंगलातून गेल्या आहेत. वादळ, वारा, पाऊस झाल्यानंतर जंगलातील झाडे किंवा फांद्या विद्युत वाहिन्यांवर पडून वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार अधिक आहेत. तसेच कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचीही समस्या गंभीर आहे.

ठळक मुद्दे३३ केव्ही उपकेंद्र : कोटगूल, अहेरी, कमलापूर, पेरमिली व कसनसूर येथे बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरची तालुक्यातील कोटगूल, अहेरी तालुक्यातील कमलापूर, पेरमिली, अहेरी व एटापल्ली तालुक्यातील कसनसूर येथे ३३ केव्ही वीज उपकेंद्र निर्माण केले जाणार आहे. सदर उपकेंद्र निर्माण करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने निधी उपलब्ध करून दिला आहे. या वीज उपकेंद्रांचे बांधकाम झाल्यास दुर्गम भागातील जवळपास १०० गावांची समस्या सुटणार आहे.गडचिरोली जिल्ह्याचा ७८ टक्के भाग घनदाट जंगलाने व्यापला आहे. बहुतांश गावांना विद्युत पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्या जंगलातून गेल्या आहेत. वादळ, वारा, पाऊस झाल्यानंतर जंगलातील झाडे किंवा फांद्या विद्युत वाहिन्यांवर पडून वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार अधिक आहेत. तसेच कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचीही समस्या गंभीर आहे.जिल्ह्याच्या विस्ताराच्या तुलनेत वीज उपकेंद्रांची संख्या कमी आहे. ३३ केव्ही वीज उपकेंद्र निर्माण केल्यास कमी दाब व वीज पुरवठा खंडीत होण्याची समस्या दूर होईल, ही बाब लक्षात घेऊन वीज विभागाने कोटगूल, कमलापूर, पेरमिली, अहेरी व सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा येथे ३३ केव्ही वीज उपकेंद्र निर्मितीचा प्रस्ताव पाठविला होता.अहेरी उपकेंद्राला यापूर्वीच मंजुरी व निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोटगूल, कमलापूर, पेरमिली व रेगुंठा येथील वीज केंद्रांना निधी व मंजुरी प्रदान करण्याचा शासन निर्णय उद्योग, उर्जा व कामगार विभागाने १६ नोव्हेंबर रोजी घेतला आहे. कोटगूल उपकेंद्रासाठी ८ कोटी १७ लाख, कमलापूर उपकेंद्रासाठी ८ कोटी ७३ लाख, पेरमिली उपकेंद्रासाठी १९ कोटी, ३९ लाख, रेगुंठा उपकेंद्रासाठी ८.६३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. महावितरणने प्रस्ताव सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा उपकेंद्रासाठी पाठविला होता. मात्र काही तांत्रिक कारणामुळे या ठिकाणी वीज केंद्र न उभारता ते एटापल्ली तालुक्यातील कसनसूर येथे उभारले जाणार आहे, अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांनी दिली आहे.आदिवासी विकास विभागाचा निधीगडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये वीजेची समस्या आहे. या परिसरातील विजेची समस्या सोडविण्यासाठी आदिवासी विकास विभागाने निधी उपलब्ध करून दिला आहे. वीज उपकेंद्र नसल्याने दुर्गम भागातील टोल्यांवर विजेची समस्या अतिशय गंभीर होती. बऱ्याच गावांमध्ये अतिशय कमी दाबाचा वीज पुरवठा होत होता. यामुळे वीज उपकरणेही व्यवस्थित काम करीत नव्हती. वीज उपकेंद्रांचे बांधकाम झाल्याने वीजेची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्या विरळ असली तरी प्रत्येक गावाला वीज पुरवठा करणे ही शासनाची जबाबदारी आहे.

टॅग्स :electricityवीज