शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सीमावर्ती भागात वीज गळती अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 01:28 IST

छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या त्याचबरोबर दुर्गम भागात अधिक प्रमाणात विजेची गळती (वाणिज्य वितरण हानी) होत असल्याचे वीज विभागाने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.

ठळक मुद्देमहावितरणचे सर्वेक्षण : गळतीनुसार फिडरची श्रेणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या त्याचबरोबर दुर्गम भागात अधिक प्रमाणात विजेची गळती (वाणिज्य वितरण हानी) होत असल्याचे वीज विभागाने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.वीज विभागाच्या मार्फत जेवढी वीज निर्माण केली जाते, तेवढीच वीज ग्राहकापर्यंत पोहोचून तेवढ्या विजेचे पैसे महावितरणकडे जमा होणे आवश्यक आहे. जेवढे जास्त अंतर तेवढी वीजेची हानी अधिक होते. त्याचबरोबर काही नागरिक आकोडे टाकून विजेची चोरी करतात. तर काही ठिकाणी नियमितपणे वीज बिल भरल्या जात नाही. या सर्व नैसर्गिक व मानव निर्मित कारणांमुळे जेवढी वीज निर्मिती होते, तेवढ्या विजेचे पैसे महावितरणला मिळत नाही. याला त्याला वाणिज्य वितरण हानी असे संबोधल्या जाते.गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात अधिक प्रमाणात वीज गळती होत असल्याचे दिसून आले आहे. दुर्गम भागात वीज कर्मचारी सहजासहजी पोहोचत नाही. परिणामी नागरिक खुलेआम आकोडे टाकून विजेची चोरी करतात. वाणिज्य वितरण हानीनुसार वीज विभागाने ‘ए’ ते ‘जी’ पर्यंत ग्रुप पाडले आहेत. त्यापैकी सीमावर्ती भागात असलेल्या तसेच ग्रामीण भागातील काही फिडरवरून सर्वाधिक गळती होत असल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली तालुक्यातील पोर्ला, आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा, देसाईगंज, कुरखेडा तालुक्यातील घाटी, सुरसुंडी, अंगारा, कोरची तालुक्यातील कोटरा, बिहिटेकला, धानोरा तालुक्यातील मुरूमगाव, पेंढरी या फिडरवरून अधिक प्रमाणात वीज गळती होत असून यातील बरेचसे फिडर ‘बी’ ग्रुपमध्ये व काही फिडर ‘सी’ ग्रुपमध्ये आहेत.जिल्ह्यातील बहुतांश फिडर ‘ए’ ग्रुपमध्येचवाणिज्य वितरण हानीनुसार वीज विभागाने ‘ए’ ते ‘जी’ पर्यंतचे ग्रुप पाडले आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये एकूण वीज निर्मितीच्या ५० टक्के वाणिज्य वितरण हानी असल्याचे दिसून येते. त्यामुळे सदर फिडर ‘एफ’, ‘जी-१’, ‘जी-२’, ‘जी-३’ यासारख्या श्रेणीमध्ये मोडतात. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील ९० टक्के फिडर ‘ए’ ग्रुपमध्ये आहेत. म्हणजेच गडचिरोली जिल्ह्यात वाणिज्य वितरण हानी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असल्याचे स्पष्ट होत आहे. काही फिडर ‘बी’ व ‘सी’ मध्ये आहेत. याचा अर्थ गडचिरोली जिल्ह्यात विजेची चोरी कमी प्रमाणात होत असून नागरिक वीज बिलाचा भरणा वेळेवर करीत असल्याचे स्पष्ट होत आहे.वीज गळतीनुसार भारनियमनज्या भागात अधिक वीज गळती तेथे अधिक भारनियमनाचा नियम वीज विभागाने सुरू केला आहे. सद्य:स्थितीत ‘ए’ स्थितीतील गळतीच्या फिडरवर ३.१५ तास, ‘बी’ स्थितीतील फिडरवर ४ तास, ‘सी’ श्रेणीतील फिडरवर ४.४५ तास, ‘डी’ श्रेणीतील फिडरसाठी ५.३० तास, ‘ई’ श्रेणीसाठी ६.१५ तास, ‘एफ’ ७ तास, ‘जी-१’ ७.४५ तास, ‘जी-२’ साठी ८.३० तास व ‘जी-३’ श्रेणीसाठी ९.१५ तास भारनियमन केले जात आहे.वीज गळतीनुसार भारनियमनाचे तास ठरविण्यात आले आहेत. अधिक वीज गळती असल्यास अधिक भारनियमन केले जाते. त्यामुळे भारनियमन टाळण्यासाठी नागरिकांनी विजेची चोरी करू नये. चोरी वीज कर्मचाºयांच्या लक्षात आणून द्यावी, त्याचबरोबर बिलाचा भरणा नियमित करावा.- अशोक म्हस्के, अधीक्षक अभियंता,महावितरण, गडचिरोली