शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

कमी मनुष्यबळावर वीज विभागाचा डोलारा

By admin | Updated: July 11, 2016 01:15 IST

गडचिरोली शहरात एकूण १७ हजार वीज ग्राहक आहेत. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या नियमानुसार

गडचिरोलीतील २५ टक्के पदे रिक्त : कार्यालय व कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना वाढल्यागडचिरोली : गडचिरोली शहरात एकूण १७ हजार वीज ग्राहक आहेत. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या नियमानुसार २५ कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना गडचिरोली शहरात सहायक अभियंत्यासह केवळ १८ वीज कर्मचारी कार्यरत आहेत. तर सात पदे रिक्त आहेत. कार्यरत कर्मचाऱ्यांना रात्रंदिवस राबावे लागत आहे. वीज खंडीत होण्याच्या समस्याही वाढल्या आहेत. त्यामुळे वीज विभागाने गडचिरोली शहरासाठी आवश्यक तेवढे वीज कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. गडचिरोली शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने या शहराचा विस्तार मागील चार ते पाच वर्षांपासून झपाट्याने होत चालला आहे. नवीन वस्त्यांची संख्या वाढत चालली आहे. त्याचबरोबर वीजेचे ग्राहकसुध्दा वाढत चालले आहेत. गडचिरोली शहराची सद्य:स्थितीत लोकसंख्या ५० हजार एवढी आहे. तर १७ हजार वीज ग्राहक आहेत. या ग्राहकांना विजेची सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी वीज विभागावर आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या नियमानुसार १२ हजार ५०० ग्राहकांसाठी २० कर्मचारी व त्यापुढील एक हजार ग्राहकांसाठी प्रत्येकी एक अतिरिक्त वीज कर्मचारी असणे आवश्यक आहे. या नियमाप्रमाणे गडचिरोली शहरात एकूण २५ वीज कर्मचारी असणे गरजेचे आहे. मात्र केवळ १८ च कर्मचारी कार्यरत आहेत. सुमारे सात कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांना अधिकचे काम करावे लागत आहे. शहरी भागातील ग्राहक ग्रामीण भागातील ग्राहकांच्या तुलनेत जागरूक आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत होताच वीज विभागाचा दूरध्वनी खनखनायला लागतो. त्यामुळे त्यांच्या तक्रारीचे त्याचवेळी निरसन करणे आवश्यक आहे. एक-दोन तास जरी विज पुरवठा सुरळीत झाला नाही तर वीज ग्राहकांच्या रोशाचा सामना वीज कर्मचाऱ्यांना करावा लागतो. गडचिरोली शहरात वीज कार्यालय व वीज कर्मचाऱ्यांवर हल्ला होण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. वीज ग्राहकांसाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांमध्येही अशा घटनांमुळे नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. वीज विभागाने गडचिरोली शहरासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)मेंटनन्सपेक्षा वसुलीवरच भरवीज बिलाची वसुली थकल्यास वीज कंपनी अडचणीत येण्याची शक्यता असल्याने वीज कंपनी वीज बिलाच्या वसुलीवरच अधिक भर देते. वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्याबरोबरच वसुली करण्याचे कामही वीज कर्मचाऱ्यांनाच करावे लागते. किंबहुना वसुलीला अधिक प्राधान्य दिले जाते. दोन्ही कामे एकावेळी सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गडचिरोली शहरात कार्यरत बहुतांश कर्मचारी वयस्क आहेत. त्यांच्याकडे वीज दुरूस्तीचा अनुभव असला तरी त्यांची कार्यक्षमता कमी झाली आहे. तरीही ते रात्रंदिवस काम करीत आहेत. शहरी भागासाठी नव्या दमाचे कर्मचारी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.