शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

मीटर न लावताच वीज बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 22:43 IST

तळोधी येथील एका शेतकऱ्याने कृषी पंपासाठी दीड वर्षापूर्वी डिमांड भरला होता.

ठळक मुद्देवीज विभागाचा कारभार : तळोधीतील शेतकऱ्यांची अडचण

आॅनलाईन लोकमततळोधी (मोकासा) : तळोधी येथील एका शेतकऱ्याने कृषी पंपासाठी दीड वर्षापूर्वी डिमांड भरला होता. परंतु या शेतकऱ्याला महावितरण कंपनीच्या वतीने मीटर उपलब्ध करून देण्यात आले नाही. परंतु मीटर न लावताच वीज बिल पाठविल्याने विद्युत विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.तळोधी (मोकासा) येथील शेतकरी विश्वनाथ लहानू कुनघाडकर यांनी सर्वे नं. ४६३ मध्ये पौर नदीकडील शेतीत पिकाला पाणी करण्यासाठी वीज मीटर घ्यायचे ठरविले. कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज सादर केला. त्यांनी ६ हजार २०० रूपयांची डिमांड रक्कम २३ फेब्रुवारी २०१६ ला भरली. जेथून विद्युत पोल टाकून प्रवाह घ्यायचा आहे तो सर्वे नजीकचे शेतकरी बंडू कुनघाडकर यांच्या शेतातून टाकण्याची परवानगी घेऊन तसा सर्वेही विद्युत विभागास दीड वर्षापूर्वीच झाला. परंतु चुकीच्या ठिकाणातून विद्युत पोल टाकण्यात आले. याबाबत विद्युत अभियंता सचिन महल्ले यांना ३० नोव्हेंबर रोजी या संदर्भात विचारणा केली असता, तडकाफडकी मीटर लावल्याचे सांगितले. तसेच ही बाब छोटी आहे, अशा बातम्या आपल्याकडे खुप आहेत, असे उत्तर दिले. सर्वे नं. ४६३ मध्ये पौर नदीकाठावरील शेतात डिमांड भरून दीड वर्षापासून मीटरची वाट पाहावी लागली. परंतु पोल उभे करून काम लाभार्थी शेतकऱ्यास न विचारताच ठेकेदाराने आपल्याच मताने यामावार व बोलगमवार यांच्या शेतातून पोल उभे केले. या संदर्भात लोकमत प्रतिनिधीने विचारले असता, तडकाफडकी त्या लाईनवरील एका पोलला फक्त लावून ठेवले. प्रत्यक्षात याची माहितीच संबंधित शेतकऱ्याला दिली गेली नाही. प्रतिनिधीने संबंधित शेतकऱ्यांसमवेत प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करतेवेळी दीड तासाने मीटर लावलेले ठिकाण दिसले. परंतु लांबविलेल्या लाईनवर विद्युत प्रवाह अजुनपर्यंत सुरू केला नाही. ठेकेदाराने काम पूर्ण दाखवून मीटर लावल्याचे ठेक्यानुसार पूर्णता दाखवून बिल उचलले, अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत.चुकीच्या ठिकाणी लावलेल्या मीटरमध्ये १ हजार ८६० रूपये वीज बिल यासह पुरवठा दिनांक, मागील रिडिंग व मीटर क्रमांकाची नोंद आहे.कारवाई करण्याची शेतकऱ्याची मागणीडिमांड भरून दीड वर्ष उलटला, सर्वेक्षही झाला. परंतु ठेकेदाराने सर्वेनुसार पोल न टाकता दूरवर पोल टाकले. प्रकरण अंगलट येईल म्हणून विद्युत अभियंत्यांनी तडकाफडकी मीटर एका पोलला टेकून दिले. या शेतकऱ्यांनी अटकाव केल्यावर मला त्या ठिकाणातून विद्युत प्रवाह सुरू करणे अडचणीचे होणार आहे. प्रत्यक्षात मला अन्य विद्युत साहित्य घ्यावे लागणार ते कसे घेणार. त्यामुळे पोल टाकण्याच्या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी विश्वनाथ कुनघाडकर यांनी केली आहे.