शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

पथदिव्यांचे वीज बिल शासनाने स्वत: भरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:25 IST

काेराेनामुळे कर वसुलीत घट झाली आहे. ग्रामपंचायतीचे सार्वजनिक वीज बिल, पाणीपुरवठा योजनांचे बिल, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगार थकित आहे. वीज ...

काेराेनामुळे कर वसुलीत घट झाली आहे. ग्रामपंचायतीचे सार्वजनिक वीज बिल, पाणीपुरवठा योजनांचे बिल, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगार थकित आहे. वीज कनेक्शन खंडित होत असल्याने अनेक अडचणी येत आहेत. यावर उपाययोजना म्हणून राज्याचे ग्रामविकास मंत्री यांनी यापुढे पथ दिव्यांची आणि पाणीपुरवठा योजनांची देयके पंधराव्या वित्त आयोगाच्या अबंधित अनुदानातून आणि बंधित अनुदानातून पाणीपुरवठा योजनांची देयके अदा करण्याकरिता शासन परिपत्रकान्वये मान्यता देण्यात आली आहे. ग्रामपंचायतींना प्राप्त झालेले १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ही देयके अदा करावयाची आहेत. या शासन निर्णयामुळे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी या निर्णयामुळे गावच्या विकासाला खीळ बसणार आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून हा खर्च होत असल्याने उर्वरित विकासकामे करण्याकरिता मात्र निधी कमी पडत असल्यामुळे गावांतील विविध विकास योजना मर्यादित स्वरुपात राबवाव्या लागणार आहेत. यापूर्वीच्या वेगवेगळ्या योजनांची बिल देयके खर्च करण्याकरिता कर सल्लागार एजन्सी नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. जयोस्तुते मॅनेजमेंट कंपनीचे १ जुलैपासून काम सुरू झाले आहे. त्यामुळे करसल्लागारकरिता ५ ते ६ हजारांऐवजी ५० ते ६० हजार रुपये द्यावे लागणार आहेत. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून वीज बिल व पाणीपुरवठा योजनांची देयके भरण्याचे परिपत्रक रद्द करावे व त्यात बदल करून १५ व्या वित्त आयोगातून न भरता त्याला अतिरिक्त निधी देण्यात यावा यासाठी भेंडाळा येथे ग्रामपंचायतसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी सरपंच कुंदा जुवारे, उपसरपंच विठ्ठल सातपुते, सदस्य संजय चलाख, निखिल उंदीरवाडे, ज्योती नंदेश्वर, कुसुम उंदीरवाडे, गीता तुमडे, वर्षा सातपुते व ग्रामपंचायत कर्मचारी आणि अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.

बाॅक्स

कमी निधीत विकासकामे कशी करणार?

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून लहान ग्रामपंचायतींना ३ ते ४ लाख रुपये मिळतात. त्यामध्ये वार्षिक दीड लाख रुपये मानधन ऑपरेटरचे जाते. आणखी वीज बिल भरणा जर या पैशांतून केला तर सार्वजनिक योजनांकरिता काही प्रमाणातच निधी शिल्लक राहणार. काही गावांना ९ ते १० लाख रुपये बिल आले आहे. त्यांनी गावाचा विकास कसा करायचा. कमी निधीत पथदिवे वीज बिल कसे भरायचे व विकासकामे कशी करायची, असा प्रश्न ग्रामपंचायतींसमाेर आहे.

010721\img-20210701-wa0151.jpg

राज्य सरकार विरुद्ध आंदोलन करतांना ग्रामपंचायत भेंडाळा चे पदाधिकारी