शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पुण्याच्या मेळाव्यावर निवडणुकीने पाणी फेरले

By admin | Updated: April 18, 2015 01:30 IST

अनुसूचित क्षेत्रात (पेसा) मोडणाऱ्या ग्राम पंचायतींना आदिवासी उपयोजनेंतर्गत पाच टक्के निधी थेट अनुदान म्हणून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

गडचिरोली : अनुसूचित क्षेत्रात (पेसा) मोडणाऱ्या ग्राम पंचायतींना आदिवासी उपयोजनेंतर्गत पाच टक्के निधी थेट अनुदान म्हणून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निधीचा चांगल्या पद्धतीने वापर व्हावा, यासाठी २३ एप्रिल रोजी या भागातील लोकप्रतिनिधींचा मेळावा पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र गडचिरोली जिल्ह्यात २४ व ३० एप्रिल रोजी निवडणूक आहे. या मेळाव्यामुळे विद्यमान ग्रा.पं. सदस्य निवडणुकीपासून वंचित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन या मेळाव्यामधून गडचिरोली जिल्ह्याचे नाव ऐनवेळेवर वगळण्यात आले आहे. त्यामुळे या मेळाव्यापासून वंचित राहण्याची पाळी येथील सदस्यांवर आली आहे.पेसा अंतर्गत मोडत असलेल्या बहुतांश ग्राम पंचायती दुर्गम भागात आहेत व या ग्राम पंचायतीमध्ये ५० टक्के पेक्षा अधिक लोकसंख्या आदिवासींची आहे. केंद्र व राज्य शासनाकडून या ग्राम पंचायतीच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या मार्फतीने शेकडो कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात असला तरी जिल्हा परिषद प्रशासन सदर निधी दुसऱ्या ग्राम पंचायतींसाठी वळवत असल्याचे अनेकदा लक्षात आले आहे. त्यामुळे या ग्राम पंचायतींना सरळ निधी देण्याचे धोरण राज्य शासनाने अवलंबिले आहे.शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीच्या खर्चाचे नियोजन करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामसभेवर सोपविण्यात आली आहे. या निधीचा चांगल्या कार्यासाठी उपयोग होऊन या गावांचा जलदगतीने विकास व्हावा, यासाठी पुणे येथे २३ एप्रिल रोजी या भागातील ग्राम पंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, ग्राम पंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आदिवासी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष यांचा पुणे येथे जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा उपस्थित राहणार होते. या मेळाव्याला राज्यभरातील १६ हजार सदस्य उपस्थित ठेवण्याचे उद्दिष्ट प्रत्येक प्रकल्प कार्यालयाला देण्यात आले होते. गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली प्रकल्पातून ३०० व अहेरी व भामरागड प्रकल्पातून प्रत्येकी २०० सदस्य उपस्थित राहण्याचे उद्दिष्ट होते. मात्र नेमक्या याच कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात ग्राम पंचायतीच्या निवडणुका आहेत. ग्रामीण भागातील वातावरण निवडणूकमय झाले आहे. २३ एप्रिलच्या मेळाव्याला उपस्थित राहिल्यास सदर सदस्य निवडणुकीपासून वंचित राहण्याची शक्यता होती. त्यामुळे ऐन वेळेवर तिन्ही प्रकल्प कार्यालयांना पत्र पाठवून गडचिरोली जिल्ह्यातील सदस्यांना मेळाव्याला घेऊन येऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मेळाव्यातील मार्गदर्शनापासून येथील सदस्यांना वंचित राहण्याची पाळी आली आहे. (नगर प्रतिनिधी)