शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

वडेट्टीवार-कोवासेंच्या नेतृत्वात निवडणुका लढा

By admin | Updated: October 2, 2016 01:56 IST

आगामी नगर परिषद व जिल्हा परिषदेची निवडणूक विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते व प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष

शिष्टमंडळ भेटले : प्रदेशाध्यक्षांकडे जिल्ह्यातील काँग्रेसजणांची मागणी गडचिरोली : आगामी नगर परिषद व जिल्हा परिषदेची निवडणूक विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते व प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आ.विजय वडेट्टीवार व माजी खा. मारोतराव कोवासे यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात लढवावी, अशी मागणी गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याकडे केली.दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्याशी जिल्ह्यातील पक्ष संघटनेच्या कामाविषयी चर्चा केली. या शिष्टमंडळात प्रदेश कॉग्रेसचे सचिव रवींद्र दरेकर, सगुणा तलांडी, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, पी. आर. आकरे, बंडू ऊर्फ विनोद शनिवारे, कुरखेडा नगर पंचायत उपाध्यक्षा जयश्री धाबेकर, एटापल्ली नगर पंचायत उपाध्यक्ष रमेश गंपावार, युवक काँग्रेस प्रदेश सचिव लता पेदापल्ली, नवनाथ धाबेकर, नगरसेवक नंदू कायरकर, निलोफर शेख, एटापल्ली तालुका अध्यक्ष मनोहर हिचामी, कुरखेडा पं. स. सदस्या गीता धाबेकर, मंगला कोवे, अहेरीच्या उषा ठाकरे, शहजाद शेख, नंदू खानदेशकर, माजी नगरसेवक विलास सूर्यवंशी, इश्वर कुमरे, जिल्हा काँग्रेसचे महासचिव नरेंद्र भरडकर आदींचा समावेश होता.यावेळी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी खा. अशोक चव्हाण यांना २००९ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुका आ. विजय वडेट्टीवार व मारोतराव कोवासे यांच्या नेतृत्वात लढविण्यात आल्या होत्या. तेव्हा पक्षाला गडचिरोली जिल्ह्यात १०० टक्के यश मिळाले होते. याकडे प्रदेशाध्यक्षांचे लक्ष वेधले. जिल्ह्यातील निष्ठेने वर्षानुवर्षे काम करणाऱ्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना सन्मान मिळावा, पक्ष संघटनेचे काम समन्वयाने व सर्वांना घेऊन करण्यात यावे, अशी मागणी खा. चव्हाण यांच्याकडे करण्यात आली. तसेच धानोरा नगर पंचायतीच्या निवडणुकीत आ. वडेट्टीवार व माजी खा. कोवासे यांनी ललीत बरछा यांच्या नेतृत्वात काँग्रेसने निवडणूक लढावी, अशी सूचना केलीे होती. परंतु एका नेत्याच्या हट्टापायी काँग्रेसच्या जिल्हा नेतृत्वाने ही बाब मान्य केली नाही. काँग्रेसचा या निवडणुकीत दारूण पराभव झाला. ही बाब अनेक नेत्यांना खा. चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली. कोरची, कुरखेडा नगर पंचायतीच्या पराभवाचीही पक्षाने उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी, अशी मागणी प्रदेशाध्यक्षांकडे करण्यात आली. जिल्ह्यातील ओबीसी कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेचे नेतृत्व दिल्या गेले पाहिजे, जिल्ह्यात सर्वच पद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने ओबीसी कार्यकर्त्यांची प्रचंड कुचंबना संघटनास्तरावर होत आहे. महिला कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जिल्ह्याचे नेतृत्व काम करीत नाही, अशी भावनाही काही नेत्यांनी बोलून दाखविली. या सगळ्यांच्या भावनांचा आपण विचार करू, असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिष्टमंडळाला सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)