शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

वडेट्टीवार-कोवासेंच्या नेतृत्वात निवडणुका लढा

By admin | Updated: October 2, 2016 01:56 IST

आगामी नगर परिषद व जिल्हा परिषदेची निवडणूक विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते व प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष

शिष्टमंडळ भेटले : प्रदेशाध्यक्षांकडे जिल्ह्यातील काँग्रेसजणांची मागणी गडचिरोली : आगामी नगर परिषद व जिल्हा परिषदेची निवडणूक विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते व प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आ.विजय वडेट्टीवार व माजी खा. मारोतराव कोवासे यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात लढवावी, अशी मागणी गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याकडे केली.दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्याशी जिल्ह्यातील पक्ष संघटनेच्या कामाविषयी चर्चा केली. या शिष्टमंडळात प्रदेश कॉग्रेसचे सचिव रवींद्र दरेकर, सगुणा तलांडी, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, पी. आर. आकरे, बंडू ऊर्फ विनोद शनिवारे, कुरखेडा नगर पंचायत उपाध्यक्षा जयश्री धाबेकर, एटापल्ली नगर पंचायत उपाध्यक्ष रमेश गंपावार, युवक काँग्रेस प्रदेश सचिव लता पेदापल्ली, नवनाथ धाबेकर, नगरसेवक नंदू कायरकर, निलोफर शेख, एटापल्ली तालुका अध्यक्ष मनोहर हिचामी, कुरखेडा पं. स. सदस्या गीता धाबेकर, मंगला कोवे, अहेरीच्या उषा ठाकरे, शहजाद शेख, नंदू खानदेशकर, माजी नगरसेवक विलास सूर्यवंशी, इश्वर कुमरे, जिल्हा काँग्रेसचे महासचिव नरेंद्र भरडकर आदींचा समावेश होता.यावेळी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी खा. अशोक चव्हाण यांना २००९ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुका आ. विजय वडेट्टीवार व मारोतराव कोवासे यांच्या नेतृत्वात लढविण्यात आल्या होत्या. तेव्हा पक्षाला गडचिरोली जिल्ह्यात १०० टक्के यश मिळाले होते. याकडे प्रदेशाध्यक्षांचे लक्ष वेधले. जिल्ह्यातील निष्ठेने वर्षानुवर्षे काम करणाऱ्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना सन्मान मिळावा, पक्ष संघटनेचे काम समन्वयाने व सर्वांना घेऊन करण्यात यावे, अशी मागणी खा. चव्हाण यांच्याकडे करण्यात आली. तसेच धानोरा नगर पंचायतीच्या निवडणुकीत आ. वडेट्टीवार व माजी खा. कोवासे यांनी ललीत बरछा यांच्या नेतृत्वात काँग्रेसने निवडणूक लढावी, अशी सूचना केलीे होती. परंतु एका नेत्याच्या हट्टापायी काँग्रेसच्या जिल्हा नेतृत्वाने ही बाब मान्य केली नाही. काँग्रेसचा या निवडणुकीत दारूण पराभव झाला. ही बाब अनेक नेत्यांना खा. चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली. कोरची, कुरखेडा नगर पंचायतीच्या पराभवाचीही पक्षाने उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी, अशी मागणी प्रदेशाध्यक्षांकडे करण्यात आली. जिल्ह्यातील ओबीसी कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेचे नेतृत्व दिल्या गेले पाहिजे, जिल्ह्यात सर्वच पद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने ओबीसी कार्यकर्त्यांची प्रचंड कुचंबना संघटनास्तरावर होत आहे. महिला कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जिल्ह्याचे नेतृत्व काम करीत नाही, अशी भावनाही काही नेत्यांनी बोलून दाखविली. या सगळ्यांच्या भावनांचा आपण विचार करू, असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिष्टमंडळाला सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)