शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका एप्रिल महिन्यात

By admin | Updated: February 11, 2015 01:58 IST

कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका येत्या ३ महिन्यांच्या आत पूर्ण कराव्यात असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

गडचिरोली : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका येत्या ३ महिन्यांच्या आत पूर्ण कराव्यात असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे.राज्यभरात ३0५ कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. त्यापैकी १५३बाजार समित्याचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे तर उर्वरित कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकाही सहा महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात उर्वरित बाजार समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होणार असल्यामुळे पुढील सहा महिने या सहकारातील निवडणुकीची धामधूम सुरू राहणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूका आघाडी शासनाने डिसेंबर २0१४ पर्यंत पुढे ढकलल्या होत्या त्यामुळे अनेक बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या मुदती संपल्यानंतरही आघाडी सरकारमुळे जादा कार्यकाळ मिळाला होता तर इच्छुकांमध्ये अगोदरच नाराजी पसरली होती. मात्र न्यायालयाच्या दणक्यानंतर आता या समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत पणन विभागाने संचालक दिनेश ओऊळकर यांनी बाजार समित्याचे निवडणुकांचे परिपत्रक जारी केले आहे. राज्यातील सर्व जिल्हा उपनिबंधकांना त्या अन्वये कारवाई करण्याविषयी कळविले आहे.याबाबत काढलेल्या परिपत्रकानुसार कृषी सहकार संस्थावर संचालक मंडळ आहे.तसेच ज्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे त्यांच्या निवडणूका घेण्याचे आदेश आहेत. राज्यातील १५३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका घेणे क्रमप्राप्त आहे. त्यातील सुमारे १४0 बाजार समित्यावर प्रशासक आहेत. एप्रिल महिन्याच्या पहिल्या टप्प्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका पूर्ण होण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या आदेशावरून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)