शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

१९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा बिगुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 01:16 IST

आॅक्टोबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या १९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला आहे. त्यामुळे या गावांमध्ये राजकीय वातावरण तापायला लागले आहे.

ठळक मुद्दे२६ सप्टेंबरला मतदान : कोरची, धानोरा, अहेरी, एटापल्लीतील गावे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आॅक्टोबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या १९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला आहे. त्यामुळे या गावांमध्ये राजकीय वातावरण तापायला लागले आहे.कोरची तालुक्यातील पिटेसूर, मोठाझेलिया, धानोरा तालुक्यातील मुंगनेर, अहेरी तालुक्यातील आवलमरी, एटापल्ली तालुक्यातील सेवारी, सरखेडा, वडसा खुर्द, गर्देवाडा, वांगेतुरी, जवेली, मेंढरी बुज., भामरागड तालुक्यातील बोटणफुंडी कुव्वाकोडी, परायनार, फोदेवाडा, नेलगुंडा, धिरंगी, हेडरी व टेकल या १९ ग्रामपंचायींमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. एटापल्ली तालुक्यतील जांभिया येथे सरपंच पदाची थेट निवडणूक घेतली जाणार आहे. यासाठी निवडण्ूक विभागाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.सोमवारी २७ आॅगस्ट रोजी तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध केली. ५ ते ११ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत संबंधित तहसील कार्यालयात नामनिर्देशनपत्र सादर करता येतील. १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजतापासून नामनिर्देशन पत्राची छाननी केली जाईल. १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक चिन्हांचे वाटप करून उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेतले जाईल. २७ सप्टेंबर रोजी मतमोजणी होईल.लोकशाहीसाठी निवडणुका या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक व्यक्तीला मतदान करण्याचा अमूल्य अधिकार बहाल करण्यात आला आहे. गावाच्या विकासासाठी निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने कुणाच्याही दबावाला बळी न पडता मतदान करावे, तसेच ग्रामपंचायत सदस्यपदासाठी जास्तीत जास्त उमेदवारी अर्ज दाखल करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.बहुतांश ग्रामपंचायती दुर्गम भागातीलज्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे, त्यातील बहुतांश ग्रामपंचायती दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील आहेत. नक्षल चळवळीचा प्रभाव कमी झाला असल्याचे दिसून येत असले तरी नक्षल प्रभावित गावांमध्ये निवडणुका घेणे पोलीस व निवडणूक प्रशासनासमोरचे मोठे आवाहन आहे.निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच गावातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे जनतेतून सरपंचाची निवड करायची आहे. त्यामुळे या निवडणुकीबाबत मतदारांना विशेष उत्सुकता आहे. ग्रामपंचायत सदस्यांच्या तुलनेत सरपंच पदासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या वाढणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत