शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

आठ गावे चूलविरहित करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 01:20 IST

जिल्ह्यात उज्वला योजनेअंतर्गत दोन वर्षात ५७ हजार २३ कुटुंबांमध्ये गॅस कनेक्शन देण्यात आले आहेत. आता १४ एप्रिल ते ५ मे दरम्यान ग्रामस्वराज्य अभियान राबविले जाणार आहे. त्यात जिल्ह्याच्या दुर्गम भागातील ८ गावांमध्ये १०० टक्के गॅस कनेक्शन देऊन ही गावे चूलविरहित केली जातील,.....

ठळक मुद्देग्रामस्वराज्य अभियान : ‘उज्वला’ योजनेतून ५७ हजार कुटुंबांना गॅस

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात उज्वला योजनेअंतर्गत दोन वर्षात ५७ हजार २३ कुटुंबांमध्ये गॅस कनेक्शन देण्यात आले आहेत. आता १४ एप्रिल ते ५ मे दरम्यान ग्रामस्वराज्य अभियान राबविले जाणार आहे. त्यात जिल्ह्याच्या दुर्गम भागातील ८ गावांमध्ये १०० टक्के गॅस कनेक्शन देऊन ही गावे चूलविरहित केली जातील, अशी माहिती तेल कंपन्यांचे गडचिरोली जिल्ह्याचे नोडल आॅफिसर आशिषकुमार यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.२० एप्रिल हा दिवस उज्वला दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त जिल्ह्यात १६ ठिकाणी एलपीजी पंचायतचे आयोजन केले जाणार आहे. त्यात गॅस वापराच्या सुरक्षेसंबंधीच्या माहितीसोबत महिलांचे आरोग्य व इतर बाबींवर मार्गदर्शन केले जाईल, असे आशिषकुमार यांनी सांगितले. याशिवाय ५०० नवीन ग्राहकांची नोंदणी करून १०० जणांना त्याच दिवशी गॅस वाटप होणार असल्याचे देसाईगंजचे हिंदुस्थान पेट्रोलियमचे मुख्य वितरक मनिष समर्थ यांनी सांगितले.ग्रामस्वराज्य अभियानात समावेश केलेल्या ८ गावांमध्ये मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली चक, अहेरी तालुक्यातील महागाव बु., प्यारेपल्ली, छल्लेवाडा व गोविंदगाव तसेच सिरोंचा तालुक्यातील जफराबाद चक, गुमलकोंडा व ताडीकोंडा या गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या २ लाख ५१ हजार कुटुंबांपैकी ७६ टक्के कुटुंबांमध्ये एलपीजी गॅस कनेक्शन असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. १ एप्रिलपासून सुरू झालेल्या विस्तारित उज्वला योजनेत समावेश केलेल्या नवीन प्रवर्गांची माहितीही पत्रपरिषदेत दिली.