शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

वेलगूर फाट्यावर आठ तास चक्काजाम; वाहतूक ठप्प

By admin | Updated: September 15, 2016 01:52 IST

तालुक्यातील विविध मूलभूत समस्या तत्काळ मार्गी लावाव्यात, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम यांच्या नेतृत्वात वेलगूर, बोटलाचेरू,

हजारो नागरिक रस्त्यावर : बबलू हकीम यांनी केली एसडीओंशी चर्चाअहेरी : तालुक्यातील विविध मूलभूत समस्या तत्काळ मार्गी लावाव्यात, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम यांच्या नेतृत्वात वेलगूर, बोटलाचेरू, नवेगाव, वेलगूर टोला व किष्टापूर येथील हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून बुधवारी आलापल्ली-मुलचेरा मार्गावरील वेलगूर बायपास फाट्यावर तब्बल आठ तास चक्काजाम आंदोलन केले. यामुळे मुलचेरा-आलापल्ली, वेलगूर-किष्टापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.अहेरी तालुक्यातील विविध समस्यांसंदर्भात प्रशासनाकडे वारंवार निवेदन देऊनही समस्या सोडविण्यात आल्या नाही. त्यामुळे त्रस्त झालेले हजारो नागरिक, सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम यांच्या नेतृत्वात बुधवारी पहाटे ४.३० वाजता वेलगूर फाट्यावर गोळा झाले. येथे पहाटे ५ वाजतापासून दुपारी १ वाजेपर्यंत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळताच अहेरीचे उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ती, नायब तहसीलदार सत्यनारायण सिलमवार यांनी लागलीच आंदोलनस्थळ गाठले. यावेळी आंदोलनकर्त्या नागरिकांनी उपविभागीय अधिकारी राममूर्ती यांना रस्त्याची दुरवस्था दाखविली. त्यानंतर जिल्हा परिषदेचे अहेरी येथील उपविभागीय अभियंता मडावी, संवर्ग विकास अधिकारी सुनील तडस, अभियंता चिंतावार, गंपावार यांनीही आंदोलनस्थळी हजेरी लावली. १६ सप्टेंबर रोजी सर्व विभाग प्रमुखांशी आपण चर्चा करून वेलगूर परिसरातील रस्ता दुरूस्तीचे काम सुरू करून इतर समस्या मार्गी लावू, असे आश्वासन उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ती यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. त्यानंतर अहेरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, पोलीस उपनिरीक्षक नीलेश साळुंखे, चांगदेव कोळेकर, छाया तांबुसकर व पोलीस कर्मचाऱ्यांच्या मध्यस्तीने नागरिकांची समजूत काढण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. याप्रसंगी मुश्ताक हकीम, राजेश्वर उत्तरवार, पं. स. सदस्य आत्माराम गद्देकार, वेलगूरचे ग्रा. पं. सदस्य आदिल पठाण, इरफान पठाण, जि. प. सदस्य विजया विठ्ठलानी, लैजा चालुरकर, सलिम शेख, पुष्पा अलोणे, नागेश कर्मे, वेलगूरच्या सरपंच कुसूम दुधी, किष्टापूरच्या सरपंच अंजना पेंदाम, तंमुस अध्यक्ष रवींद्र उरेते, नागो कस्तुरे, लिंगा गोेलेटी, तुकाराम झोळे, विलास शेंडे, हरिचंद्र पोटरंगे, दिलीप दुर्गे, दीपक चुनारकर, श्यामराव कुमरे, देवराव माडावार, रवी गावतुरे, अरविंद खोब्रागडे, ऋषी सडमेक आदी उपस्थित होते. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चक्काजाम आंदोलनामुळे तब्बल आठ तास वाहतूक ठप्प झाल्याने आलापल्ली-मुलचेरा मार्गावर दोन्ही बाजुस शेकडो वाहनांची रांग लागली होती. वेलगूर भागातील समस्या मार्गी न लागल्यास पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्या नागरिकांनी प्रशासनाला यावेळी दिला. (प्रतिनिधी)