शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 01:24 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडून कोट्यवधी रूपयांचा निधी प्राप्त होत असतो. मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे विहीत वेळेत पूर्ण होत नाहीत.

ठळक मुद्देखासदारांच्या सूचना : जिल्हा विकास समन्वय समितीच्या सभेत घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडून कोट्यवधी रूपयांचा निधी प्राप्त होत असतो. मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे विहीत वेळेत पूर्ण होत नाहीत. अधिकाऱ्यांनी योग्यरित्या नियोजन केल्यास विकास कामाला गती येऊ शकते. मागास जिल्ह्याची ओळख पुसण्यासाठी अधिकाऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, अशा सूचना दिशा समितीचे अध्यक्ष खा.अशोक नेते यांनी दिल्या.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह, जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर, नगराध्यक्ष योगीता पिपरे, समिती सदस्य डी.के.मेश्राम, नगरसेवक प्रमोद पिपरे, बाबुराव कोहळे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, डीआरडीचे प्रकल्प संचालक सुनील पाठारे आदी उपस्थित होते.प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या मंजूर १० पैकी तीन कामे प्रगतीपथावर आहेत. उर्वरित प्रलंबित कामाची निविदा काढण्यात आली आहे. रस्त्याचीही कामे तत्काळ पूर्ण करावी, अशा सूचना खा.नेते यांनी अधिकाºयांना दिल्या. मुद्रा बँक कर्ज देण्यास बँकेचे अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. जाचक अटी घालून सर्वसामान्य लोकांची अडवणूक केली जात आहे. यामुळे नवे उद्योग निर्माण होण्यास अडचणीचे ठरत आहे. बँकेत येरझारा मारून पाच ते सहा महिने मुद्रा लोन मिळत नाही, अशा तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या आहेत. आता बँकेच्या अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्यास त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा खा.अशोक नेते यांनी दिला.नगर परिषद क्षेत्रातील अतिक्रमणधारकांना पट्टे मिळाले नाही. सदर पट्टे देण्याबाबतची कार्यवाही प्रशासनाने करावे, असे नेते यांनी सांगितले. न.प. क्षेत्रातील जमिनीची मोजणी करण्यासाठी चार कोटींचा खर्च लागणार असून याबाबतचा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी तयार करावा, असे निर्देश दिले. जिल्ह्यातील २३८ ग्रामपंचायती वायफाय सुविधेने जोडण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अनेक ठिकाणी शौचालयाचे बांधकाम अपूर्ण आहेत. निधी मंजूर असूनही कामात गती नाही. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकडे यंत्रणेने लक्ष द्यावे, ज्या लाभार्थ्यांचे शौचालय बांधकाम पूर्ण झाले आहे, अशा लाभार्थ्यांची अनुदानाची रक्कम तत्काळ बँक खात्यात जमा करावी, असे सांगितले.जिल्ह्यात अनेक पाणीपुरवठा योजनांचे काम अर्धवट आहेत. तसेच अनेक गावे पेयजल योजनेपासून वंचित आहेत. मेढामार्फत वीज नसलेल्या ३८ गावांम विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे, असे खा.नेते यांनी सांगितले. सदर बैठकीत जिल्ह्यातील विविध विकास कामे तसेच शासकीय योजनांच्या अंमलबाजवणीच्या अनुषंगाने अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

टॅग्स :government schemeसरकारी योजना