शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
4
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
5
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
6
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
7
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
8
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
9
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
10
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
11
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
12
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
13
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
14
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
15
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
16
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
17
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
18
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
19
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
20
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 01:24 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडून कोट्यवधी रूपयांचा निधी प्राप्त होत असतो. मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे विहीत वेळेत पूर्ण होत नाहीत.

ठळक मुद्देखासदारांच्या सूचना : जिल्हा विकास समन्वय समितीच्या सभेत घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडून कोट्यवधी रूपयांचा निधी प्राप्त होत असतो. मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे विहीत वेळेत पूर्ण होत नाहीत. अधिकाऱ्यांनी योग्यरित्या नियोजन केल्यास विकास कामाला गती येऊ शकते. मागास जिल्ह्याची ओळख पुसण्यासाठी अधिकाऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, अशा सूचना दिशा समितीचे अध्यक्ष खा.अशोक नेते यांनी दिल्या.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह, जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर, नगराध्यक्ष योगीता पिपरे, समिती सदस्य डी.के.मेश्राम, नगरसेवक प्रमोद पिपरे, बाबुराव कोहळे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, डीआरडीचे प्रकल्प संचालक सुनील पाठारे आदी उपस्थित होते.प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या मंजूर १० पैकी तीन कामे प्रगतीपथावर आहेत. उर्वरित प्रलंबित कामाची निविदा काढण्यात आली आहे. रस्त्याचीही कामे तत्काळ पूर्ण करावी, अशा सूचना खा.नेते यांनी अधिकाºयांना दिल्या. मुद्रा बँक कर्ज देण्यास बँकेचे अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. जाचक अटी घालून सर्वसामान्य लोकांची अडवणूक केली जात आहे. यामुळे नवे उद्योग निर्माण होण्यास अडचणीचे ठरत आहे. बँकेत येरझारा मारून पाच ते सहा महिने मुद्रा लोन मिळत नाही, अशा तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या आहेत. आता बँकेच्या अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्यास त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा खा.अशोक नेते यांनी दिला.नगर परिषद क्षेत्रातील अतिक्रमणधारकांना पट्टे मिळाले नाही. सदर पट्टे देण्याबाबतची कार्यवाही प्रशासनाने करावे, असे नेते यांनी सांगितले. न.प. क्षेत्रातील जमिनीची मोजणी करण्यासाठी चार कोटींचा खर्च लागणार असून याबाबतचा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी तयार करावा, असे निर्देश दिले. जिल्ह्यातील २३८ ग्रामपंचायती वायफाय सुविधेने जोडण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अनेक ठिकाणी शौचालयाचे बांधकाम अपूर्ण आहेत. निधी मंजूर असूनही कामात गती नाही. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकडे यंत्रणेने लक्ष द्यावे, ज्या लाभार्थ्यांचे शौचालय बांधकाम पूर्ण झाले आहे, अशा लाभार्थ्यांची अनुदानाची रक्कम तत्काळ बँक खात्यात जमा करावी, असे सांगितले.जिल्ह्यात अनेक पाणीपुरवठा योजनांचे काम अर्धवट आहेत. तसेच अनेक गावे पेयजल योजनेपासून वंचित आहेत. मेढामार्फत वीज नसलेल्या ३८ गावांम विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे, असे खा.नेते यांनी सांगितले. सदर बैठकीत जिल्ह्यातील विविध विकास कामे तसेच शासकीय योजनांच्या अंमलबाजवणीच्या अनुषंगाने अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

टॅग्स :government schemeसरकारी योजना