शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

लालपरीअभावी खोळंबले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:39 IST

भेंडाळा परिसरातील बोरी, कळमगाव, एकोडी, कान्होली, वेल्तूर तुकूम, सगनापूर, वाघोली, घारगाव, फराडा, मार्कंडा अशा अनेक गावांतून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज ...

भेंडाळा परिसरातील बोरी, कळमगाव, एकोडी, कान्होली, वेल्तूर तुकूम, सगनापूर, वाघोली, घारगाव, फराडा, मार्कंडा अशा अनेक गावांतून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज चामोर्शी, गडचिरोली व भेंडाळा येथे जावे लागते; परंतु शासन-प्रशासन यांच्या नियमानुसार एसटी महामंडळाने ज्या रस्त्यावर उत्पन्न जादा मिळते, अशाच ठिकाणी एसटी बसफेरी सुरू केली आहे. त्यामुळे लालपरीच्या प्रवासाविना आजही ग्रामीण भागात वर्ग ८ वी ते १२ वीचे शंभरवर विद्यार्थी शाळेत जात नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

बससुविधा नसल्याने शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. विद्यार्थ्यांबरोबर सर्वसामान्य नागरिक बस बंद असल्याने आपली कामे वेळेवर करू शकत नाहीत. ग्रामीण भागात राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करणे शक्य होत नाही. त्यामुळे भेंडाळा परिसरातील बसफेऱ्या लवकर सुरू कराव्यात, अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांमधून होत आहे. ग्रामीण भागात एसटी बस सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. खासगी वाहनातून विद्यार्थ्यांना ५० ते १०० रुपये खर्च करून प्रवास करावा लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ही गैरसोय दूर करून विद्यार्थ्यांना एसटी बसची सुविधा मिळवून द्यावी, अशी मागणी पालक व विद्यार्थी करीत आहेत.

(बॉक्स)

गोरगरीब विद्यार्थ्यांना बसतोय फटका

कोरोनाच्या संकटामध्ये गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. अशात कोरोनाची रुग्णसंख्या थोडी कमी झाल्याने शासनाने जेथे कोरोनामुक्त गावे आहेत व ग्रामपंचायतीने तसा ठराव दिला अशा ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळांमध्ये पाठविण्यास अडचणी निर्माण होत आहेत. काही पालक पाल्यांना शाळेत पाठवीत नाहीत, तर काही खासगी वाहनाने, तर काही स्वतःच्या वाहनाने मुलांना शाळेत सोडतात. मात्र, गरीब विद्यार्थी लालपरीविना शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे दिसून येत आहे.