शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांची लातूर येथे बदली

By admin | Updated: July 2, 2015 02:05 IST

गडचिरोली येथील शिक्षणाधिकारी (माध्यमिक) उल्हास नरड यांची गडचिरोली येथून लातूर येथे शिक्षणाधिकारी (निरंतर) या पदावर बदली झाली आहे.

बदलीमुळे जिल्ह्यात असंतोष : जिल्ह्यातील विविध संघटना आंदोलनाच्या पावित्र्यातगडचिरोली : गडचिरोली येथील शिक्षणाधिकारी (माध्यमिक) उल्हास नरड यांची गडचिरोली येथून लातूर येथे शिक्षणाधिकारी (निरंतर) या पदावर बदली झाली आहे. बुधवारी याबाबतचा बदली आदेश गडचिरोली जिल्हा परिषदेत धडकला. त्यांच्या जागी पुणे येथून आत्राम नावाचे नवे शिक्षणाधिकारी येत आहेत. आत्राम हे मागील दहा वर्षांपूर्वी जिल्ह्यात होते, अशी माहिती मिळाली आहे. उल्हास नरड हे मागील तीन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक या दोन्ही विभागाची जबाबदारी सांभाळत होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात विद्यार्थ्यांसाठी तीन तास टीव्ही बंद, एक झाड एक विद्यार्थी आदी उपक्रम राबवून जिल्ह्यात अतिशय चांगले काम केले होते. त्यांच्या बदलीमुळे जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी त्यांची बदली करण्यात आल्याने जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली असून त्यांची बदली करण्याच्या मागणीसाठी विविध संघटना रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती आहे. स्थानिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचे लातूर येथे निरंतर शिक्षणाधिकारी म्हणून स्थानांतरण करण्यात आल्याने जिल्ह्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (कवाडे गट) यांच्यासह विविध संघटना शिक्षणाधिकारी नरड यांचे स्थानांतरण रद्द करण्यासाठी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी भरीव कार्य केले आहे. गाव तिथे बंधारा निर्मितीचा उपक्रम राबवून जलसंधारणाचा संदेश प्रत्येक गावात पोहोचविला. त्यांच्या या कार्याची दखल राज्य शासनाने सुद्धा घेतली होती. कॉपीमुक्त अभियान, शैक्षणिक शिस्त, इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शन आदी उपक्रमातून नरड यांनी शिक्षण विभागात आमुलाग्र कार्य केले आहे. नरड यांच्या कार्यकाळात यंदा दहावी, बारावीचा जिल्ह्याचा निकालही अधिक लागला. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचे स्थांनातरण केल्याने जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला खिळ बसणार आहे.नरड यांनी संपूर्ण जिल्हाभर राबविलेल्या उपक्रमामुळे राज्यात जिल्ह्याचा नावलौकीक झाला आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी नरड यांची बदली रद्द करून त्यांना जिल्ह्यातच कार्यरत ठेवावे, अशी मागणी पिरीपाचे जिल्हाध्यक्ष मुनीश्वर बोरकर, युवाशक्ती संघटनेचे नेते तथा नगर पालिकेचे गटनेते प्रा. राजेश कात्रटवार, नं. प. चे उपाध्यक्ष प्रा. रमेश चौधरी, नगरसेवक नंदू कायरकर आदींनी केली आहे. शिक्षणाधिकारी नरड यांची बदली रद्द न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. राजकीय, सामाजिक संघटनेसोबतच जिल्ह्यातील काही शिक्षक संघटना शिक्षणाधिकारी नरड यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणार आहेत. यासाठी शिक्षक संघटना तयारीही करीत आहेत. बदली रद्द करण्यासाठी प्रशासन व शासनस्तरावर विविध संघटनांकडून प्रयत्न होणार आहेत.