शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

कमाईचे पैसे लॉकडाऊनमध्ये संपले, आता करायचे? गडचिरोलीतील कष्टकऱ्यांची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 13:10 IST

आतापर्यंत मजुरीतून कमावलेले पैसे लॉकडाऊनमध्ये संपले. आता गावी जाण्यासाठीही पैसे नाहीत अशी व्यथा मुलचेरा तालुक्यातील लगाम येथील शाळेत क्वारंटाईन केलेल्या १७ मजुरांनी व्यक्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: आतापर्यंत मजुरीतून कमावलेले पैसे लॉकडाऊनमध्ये संपले. आता गावी जाण्यासाठीही पैसे नाहीत अशी व्यथा मुलचेरा तालुक्यातील लगाम येथील शाळेत क्वारंटाईन केलेल्या १७ मजुरांनी व्यक्त केली आहे. तेलंगणा राज्यातील खम्मम जिल्ह्यातील भद्रीतांडा येथे दोन महिन्याआधी लगाम येथील मजुर मिरची तोडायला गेले होते. तिथे गेल्यानंतर तीन दिवसानंतर लॉकडाऊन झाले. तरी पण गावाच्या बाहेर शेतात काही दिवस काम केले. प्रत्येक मजुरांनी जवळपास सहा हजार रुपये कमावले मात्र, एक महिना रिकामे बसून होते. गावाकडे येण्यासाठी शेतमालकने ट्रक करून दिला. भाडे मात्र मजुरांनी दिले 13 तास सिरपूर (कागजनगर) पर्यंत 67 मजुरांनी प्रवास केला. शिरपुर पासून 30 कि.मी. पायी चालत मजुरांनी कवटाला गाठले. या मजुरांमध्ये 36 मजुर चंद्रपूर जिल्ह्यातील होते. कवटाला पोलिसांनी गाडी करून दिली दिली. भुरेपल्ली पर्यंत 24 लगामच्या मजुरांचा प्रवास झाला. नंतर नदीमध्ये स्वयंपाक करून पायी लगामला आले. यात चुटुगुंटा येथील पाच मजुर, काकरगट्टा येथील दोन मजुर होते. ते आपआपल्या गावी शाळेत क्वारंटाइन झाले आहेत. लगाम येथील राजे धर्मराव शाळेत 9 महिला व 8 पुरुष असे एकूण 17 मजुर गेल्या दोन दिवसापासून आहेत. लगाम ग्रामपंचायततर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून साबण, बिस्किट पुडे, सहा मास्क देण्यात आले. विशेष म्हणजे आरोग्य विभागतर्फे एकाही मजुरांची तपासणी करण्यात आलेली नाही. हातावर शिक्के मारून क्वारंटाइन केल्यामुळे या मजुरांना भाजीपाला किंवा किराणा सामान घेण्यासाठी बाहेर जाता येत नाही .त्यामुळे प्रशासनाने व्यवस्था करावी अशी मागणी या मजुरांनी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस