शहरं
Join us  
Trending Stories
1
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
2
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
3
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
4
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
5
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
6
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
7
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
8
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
9
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
10
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
11
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
12
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
13
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
14
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
15
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
16
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
17
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
18
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
19
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
20
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

ई-पंचायतपासून अनेक सरपंच अनभिज्ञ!

By admin | Updated: October 6, 2014 23:12 IST

शासकीय कामकाजात गती यावी, पारदर्शकता यावी यासाठी राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात ई-पंचायत सुरू केली आहे. मात्र बहुतांश ग्रामपंचायतीच्या सरपंचाना ई-पंचायत,

गडचिरोली : शासकीय कामकाजात गती यावी, पारदर्शकता यावी यासाठी राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात ई-पंचायत सुरू केली आहे. मात्र बहुतांश ग्रामपंचायतीच्या सरपंचाना ई-पंचायत, ई-टेंडरींग आदी बाबी कळत नाही. त्यामुळे या मागील शासनाचा मूळ उद्देश यशस्वी होत नसल्याचे दिसून येत आहे.ई-पंचायतमुळे राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतींचा व गावांचा कारभार पारदर्शक होण्यास मदत झाली आहे. यामुळे कामानाही काही प्रमाणात गती मिळाली आहे. परंतु अद्यापही ई-पंचायतचा अपेक्षीत असा निकाल पहायला मिळत नाही. याचे कारण म्हणजे, शासनाच्या ग्रामीण भागातील यंत्रणेमध्ये याबाबत असलेले अज्ञान होय! याच कारणामुळे काही ठिकाणी या योजनेचा बट्ट्याबोळ उडाला असून नागरिकांना अपेक्षीत सहकार्य अद्यापही शासकीय यंत्रणेकडून प्राप्त होत नाही. ई-पंचायत या संकल्पनेची गावकरी तर सोडाच परंतु पदाधिकाऱ्यांनाही माहिती नाही. शासनाच्या ई-पंचायत संकल्पनेतून सद्य:स्थितीत जिल्ह्यातील जवळपास ५० टक्क्यापेक्ष्या अधिक सरपंच व ग्रामपंचायत सदस्य अनभिज्ञ असल्याचे चित्र दिसून येते. राज्याच्या ग्राम विकास विभागाच्यावतीने स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार अधिक गतीमान व पारदर्शक व्हावा यासाठी ई-पंचायत ही संकल्पना शासनाच्यावतीने राबविण्यात येत आहे. मात्र ग्रामीण भागात ग्रामपंचायतीमध्ये ही संकल्पना योग्यरित्या पोहोचली नसल्याचे दिसून येते. ग्रामपंचायतमधील संगणक कक्षामध्ये कार्यरत असलेल्या डेटा एन्ट्री आॅपरेटला हाताशी धरून एक समांतर ग्रामपंचायत चालविली जात आहे. ग्रामपंचायतीमधील शिपाई व लिपीक या नवीन तंत्रज्ञान व कार्यप्रणालीपासून दूर असल्याचेच सर्वत्र दिसून येते. ग्रामपंचायतच्या निधीतून लाखो रूपये खर्चाचे ई-टेंडर कसे काढण्यात येते. हे आजही बहूतांश सरपंचाना माहित नाही. ही नवीन कार्यप्रमाणाली शिकून घेण्यासाठीही सरपंचाकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही. एकाच कर्मचाऱ्यांवर म्हणजेच एका ग्रामसेवकाच्या भरवशावर अनेक ग्रामपंचायतीचा कारभार असल्यामुळे सर्वत्र गोंधळच दिसून येतो. त्यामुळे नागरिकांची कामे होत नाही. वेळेवर नागरिकांना विविध प्रकारचे दाखले मिळत नसल्याचे दिसून येते.(प्रतिनिधी)