शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

ई-पंचायतपासून अनेक सरपंच अनभिज्ञ!

By admin | Updated: October 6, 2014 23:12 IST

शासकीय कामकाजात गती यावी, पारदर्शकता यावी यासाठी राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात ई-पंचायत सुरू केली आहे. मात्र बहुतांश ग्रामपंचायतीच्या सरपंचाना ई-पंचायत,

गडचिरोली : शासकीय कामकाजात गती यावी, पारदर्शकता यावी यासाठी राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात ई-पंचायत सुरू केली आहे. मात्र बहुतांश ग्रामपंचायतीच्या सरपंचाना ई-पंचायत, ई-टेंडरींग आदी बाबी कळत नाही. त्यामुळे या मागील शासनाचा मूळ उद्देश यशस्वी होत नसल्याचे दिसून येत आहे.ई-पंचायतमुळे राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतींचा व गावांचा कारभार पारदर्शक होण्यास मदत झाली आहे. यामुळे कामानाही काही प्रमाणात गती मिळाली आहे. परंतु अद्यापही ई-पंचायतचा अपेक्षीत असा निकाल पहायला मिळत नाही. याचे कारण म्हणजे, शासनाच्या ग्रामीण भागातील यंत्रणेमध्ये याबाबत असलेले अज्ञान होय! याच कारणामुळे काही ठिकाणी या योजनेचा बट्ट्याबोळ उडाला असून नागरिकांना अपेक्षीत सहकार्य अद्यापही शासकीय यंत्रणेकडून प्राप्त होत नाही. ई-पंचायत या संकल्पनेची गावकरी तर सोडाच परंतु पदाधिकाऱ्यांनाही माहिती नाही. शासनाच्या ई-पंचायत संकल्पनेतून सद्य:स्थितीत जिल्ह्यातील जवळपास ५० टक्क्यापेक्ष्या अधिक सरपंच व ग्रामपंचायत सदस्य अनभिज्ञ असल्याचे चित्र दिसून येते. राज्याच्या ग्राम विकास विभागाच्यावतीने स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार अधिक गतीमान व पारदर्शक व्हावा यासाठी ई-पंचायत ही संकल्पना शासनाच्यावतीने राबविण्यात येत आहे. मात्र ग्रामीण भागात ग्रामपंचायतीमध्ये ही संकल्पना योग्यरित्या पोहोचली नसल्याचे दिसून येते. ग्रामपंचायतमधील संगणक कक्षामध्ये कार्यरत असलेल्या डेटा एन्ट्री आॅपरेटला हाताशी धरून एक समांतर ग्रामपंचायत चालविली जात आहे. ग्रामपंचायतीमधील शिपाई व लिपीक या नवीन तंत्रज्ञान व कार्यप्रणालीपासून दूर असल्याचेच सर्वत्र दिसून येते. ग्रामपंचायतच्या निधीतून लाखो रूपये खर्चाचे ई-टेंडर कसे काढण्यात येते. हे आजही बहूतांश सरपंचाना माहित नाही. ही नवीन कार्यप्रमाणाली शिकून घेण्यासाठीही सरपंचाकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही. एकाच कर्मचाऱ्यांवर म्हणजेच एका ग्रामसेवकाच्या भरवशावर अनेक ग्रामपंचायतीचा कारभार असल्यामुळे सर्वत्र गोंधळच दिसून येतो. त्यामुळे नागरिकांची कामे होत नाही. वेळेवर नागरिकांना विविध प्रकारचे दाखले मिळत नसल्याचे दिसून येते.(प्रतिनिधी)