शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

तेंदूपत्ता कंत्राटदारांकडून ग्रामसभांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : आचारसंहितेमुळे तेंदूपत्ता कंत्राटांच्या लिलावाची प्रक्रिया अपूर्ण राहिल्या आहेत. याचा गैरफायदा काही कंत्राटदारांकडून घेतला जात ...

ठळक मुद्देआचारसंहितेच्या नावावर लूट : कमी किमतीत केले जात आहेत करारनामे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आचारसंहितेमुळे तेंदूपत्ता कंत्राटांच्या लिलावाची प्रक्रिया अपूर्ण राहिल्या आहेत. याचा गैरफायदा काही कंत्राटदारांकडून घेतला जात असून गावातील दलालांना हाताशी धरून अत्यंत कमी किंमतीत करारनामे करून ग्रामसभांची दिशाभूल केली जात आहे.काही ग्रामपंचायतींनी आचारसंहितेपूर्वीच तेंदूपत्त्याचा लिलाव आयोजित केला होता. मात्र कंत्राटदारांनी या लिलावात सहभाग घेतला नाही. कंत्राटदारांनी संघटना तयार केली असून या संघटनेने सुरूवातीचे दोन ते तीन वेळा लिलावात सहभाग घ्यायचा नाही, असे ठरविले आहे. तेंदूपत्त्याला फारशी मागणी नाही व किंमतही नाही, असा आभास कंत्राटदारांकडून निर्माण केला जात आहे. त्याचप्रमाणे आचारसंहिता पुढे एक महिना कायम राहणार असल्याने या कालावधीत करारनाम्याची प्रक्रिया न झाल्यास ग्रामसभांचे नुकसान होईल, अशीही चुकीची माहिती ग्रामसभांना दिली जात आहे.दलाल व कंत्राटदाराच्या चुकीच्या माहितीला गावातील नागरिक बळी पडत आहेत. मागील वर्षीपेक्षाही कमी किंमतीने करारनामे केले जात आहेत. यामुळे ग्रामसभांचे मोठे नुकसान होत आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी ज्या कंत्राटदारांनी मजुरी व रॉयल्टीची रक्कम बुडविली, याच कंत्राटदारांनी आपल्या नातेवाईकांच्या नावाने कंपन्या स्थापन केल्या आहेत. आपल्या एखाद्या नातेवाईकाला किंवा दिवाणजीला पाठवून करारनामे केले जात आहेत. त्यामुळे यावर्षीही रॉयल्टीची रक्कम बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. ग्रामसभांनी कंत्राटदारांच्या या फसव्या धोरणापासून सावध राहण्याची गरज आहे.स्वत: तेंदूपत्ता संकलन करणे ठरणार फायद्याचेग्रामसभांनी स्वत: तेंदूपत्ता संकलन करून त्याची विक्री करावी, या मुख्य उद्देशानेच ग्रामसभांना शासनाने तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार दिले आहेत. मात्र काही ग्रामसभांनी यातून मार्ग काढत तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार कंत्राटदाराला देण्यास सुरूवात केली. यातून ग्रामसभांना थोडाफार निधी मिळत असला तरी कंत्राटदार मात्र कोट्यधीश झाले आहेत. तेंदूपत्ता व्यवसायात मंदी आहे, असे सांगून मागील वर्षी कंत्राटदारांनी तेंदूपत्ता लिलावात सहभाग घेतला नाही. त्यानंतर पडल्या किंमतीला तेंदूपत्ता खरेदी केला. हाच डाव याही वर्षी आखला जात आहे. मागील वर्षी कंत्राटदारांच्या भूलथापांना बळी न पडता काही ग्रामसभांनी स्वत:च तेंदूपत्ता संकलन केले होते. त्यांच्या तेंदूपत्त्याला चांगली किंमत मिळाल्याने लाखो रुपयांचे अधिकचे महसूल प्राप्त झाले. जिल्ह्यातील इतरही ग्रामसभांनी या ग्रामसभांचे अनुकरण करून स्वत: तेंदूपत्ता संकलन करणे फायद्याचे ठरणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतforest departmentवनविभाग