शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
2
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
3
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
4
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
5
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
6
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
7
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
8
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
9
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
10
अवकाशातून अत्यंत स्पष्ट फोटो मिळाले असते, पण...; पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपणाची मोहीम अयशस्वी
11
अबोल वेदना, गोंधळलेली मने : पुरुषांच्या मानसिक आरोग्याची वेळीच दखल घ्या! मानसोपचारतज्ज्ञांचे आवाहन
12
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
13
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
14
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
15
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
16
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
17
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
18
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
19
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
20
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा

पाणी टंचाईतून दिलासा

By admin | Updated: April 11, 2016 01:32 IST

जिल्हाभरात विशेष करून ग्रामीण तसेच दुर्गम भागात सौर ऊर्जेवर चालणाऱ्या ३३१ दुहेरी पंप नळ योजना बसविण्यात आल्या असून

मोठ्या योजनांना पर्याय : ३३१ दुहेरी पंप नळ योजना जिल्ह्यात कार्यान्वितगडचिरोली : जिल्हाभरात विशेष करून ग्रामीण तसेच दुर्गम भागात सौर ऊर्जेवर चालणाऱ्या ३३१ दुहेरी पंप नळ योजना बसविण्यात आल्या असून यातील बहुतांश योजना अजुनही सुस्थितीत सुरू आहेत. या योजनांमुळे ग्रामीण भागातील पाणी टंचाईची संकट कमी होण्यास फार मोठी मदत झाली आहे. जलस्वराज्य योजना, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने मोठ्या योजना बांधून दिल्या जातात. मात्र या योजनांचा खर्च ग्रामपंचायतीला झेपत नसल्याने त्यातील बहुतांश योजना अगदी दोन ते तीन वर्षातच बंद पडत असल्याचा अनुभव आहे. गडचिरोली जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. जंगलामुळे पाण्याचे भरण जास्त होते व त्या तुलनेत पाण्याचा उपसा कमी आहे. परिणामी ३० ते ४० फूट अंतरावरच पाणी लागते. त्यामुळे या गावांमध्ये सौर ऊर्जेवर चालणारी नळ योजना सुरू केल्यास ती यशस्वी होईल. असे प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात २०१०-११ पासून दुहेरी पंप नळ योजना बांधण्यास सुरूवात झाली. सौर ऊर्जेवर चालणारी योजना असल्याने या योजनेचा खर्चही कमी आहे. थोडीफार देखभालीची गरज असल्याने ग्रामपंचायतीकडून या योजनांची मागणी वाढली. पाच वर्षात सुमारे ३३१ योजना बांधून पूर्ण झाल्या आहेत. यातील बहुतांश योजना सुस्थितीत अजुनही सुरू आहेत. या योजनांमुळे दुर्गम भागातील पाणी टंचाईची समस्या कमी होण्यास मदत झाली आहे. (नगर प्रतिनिधी)ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ५० पेक्षा अधिक योजना बंदयोजनेचे बांधकाम झाल्यानंतर सदर योजना चालविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. मात्र योजना बंद पडल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासन याची दखल घेत नाही. त्यामुळे एकूण ३३१ योजनांपैकी ५० पेक्षा अधिक नळ योजना बंद असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पाच हजार लिटर क्षमतेच्या पाणी टाकीत पाणी साठविले जाते. यातून किमान २० ते ३० घरांना सहज नळाद्वारे पाणी पुरवठा होऊ शकतो. त्यांच्याकडून महिन्याकाठी पाणीपट्टी घेऊन त्यातील पैसे योजनेच्या देखभालीवर खर्च केल्यास सदर योजना अनेक वर्ष चालू शकते. मात्र ग्रामपंचायत प्रशासन या योजनेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, या योजनेतील सौर ऊर्जा सिस्टीमला बॅटऱ्या नाहीत. त्यामुळे देखभालीचा खर्च कमी झाला आहे.