शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

दोन अर्धवट पुलांमुळे ७० किमींच्या रहदारीस अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2016 01:24 IST

एटापल्ली ते भामरागड या दोन तालुकास्थळातील अंतर ७० किमीचे आहे. या ७० किमीच्या मार्गावर कोठी ते गट्टा या गावांच्या दरम्यान

कोठी व गट्टा दरम्यानचे पूल बांधकाम अर्ध्यावरच : एटापल्ली-भामरागड दरम्यान आवागमन कठीण भामरागड : एटापल्ली ते भामरागड या दोन तालुकास्थळातील अंतर ७० किमीचे आहे. या ७० किमीच्या मार्गावर कोठी ते गट्टा या गावांच्या दरम्यान केवळ दोन पुलांचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे दोन तालुक्यांदरम्यान वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे १८ वर्षांचा कालावधी उलटूनही या दोन्ही पुलांचे बांधकाम पूर्ण झाले नाही. भामरागड ते एटापल्लीदरम्यान कोठी व गट्टा ही दोन गावे येतात. भामरागडपासून कोठी हे गाव २० किमी अंतरावर आहे. या मार्गावर नियमितपणे भामरागडपासून बससेवा सुरू राहते. तर एटापल्लीवरून गट्टापर्यंत ३५ किमीच्या अंतरातही बससेवा नियमितपणे सुरू राहते. फक्त गट्टा ते कोठी या १५ किमीच्या अंतरात दोन पुलांचे बांधकाम रखडले असल्याने एटापल्ली ते भामरागड दरम्यान वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. कोठी व गट्टा या गावांदरम्यान असलेल्या दोन नाल्यांवरील पुलांच्या बांधकामाला सन १९९६-९७ च्या दरम्यान बीआरओच्या मार्फतीने सुरू करण्यात आली होती. पिल्लरपर्यंत कामही करण्यात आले. मात्र नक्षल्यांनी धमकी दिल्याने या पुलांचे बांधकाम अर्धवट सोडून बीआरओने पळ काढला. तेव्हापासून या पुलांचे बांधकामच हाती घेण्यात आले नाही. विकास रखडलापुलांअभावी भामरागड तालुक्यातील कोठी परिसरातील कारमपल्ली, हलवेर, कियर, पिडमिली तसेच एटापल्ली तालुक्यातील गट्टा परिसरातील गट्टा, जांभिया, अडेंगा, सूरजागड, मंगेर, हेडरी, नेंडेर, परसलगोंदी, आलदंडी, तुमरगुंडा या गावांचा विकास रखडला आहे. या गावांमध्ये चारचाकी वाहन जाण्यास अडथळा आहे.