शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वृक्षतोडीमुळे विदर्भातील रेशीम शेती धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 11:10 IST

: टसर रेशीम (कोसा) शेती करण्याचे तंत्र विकसित झाल्यामुळे या शेतीचा खर्च कमी होऊन उत्पादन वाढले असले तरी दिवसेंदिवस ही शेती करण्यासाठी जंगल मिळत नसल्याने या शेतीचा विस्तार थांबला आहे.

ठळक मुद्देहजारो कुटुंबांचा रोजगार हिरावणारतंत्र विकसित झाले मात्र झाडे घटली

प्रदीप बोडणे ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : टसर रेशीम (कोसा) शेती करण्याचे तंत्र विकसित झाल्यामुळे या शेतीचा खर्च कमी होऊन उत्पादन वाढले असले तरी दिवसेंदिवस ही शेती करण्यासाठी जंगल मिळत नसल्याने या शेतीचा विस्तार थांबला आहे. तसेच जुना जंगल नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने रेशीम शेतीच धोक्यात आली आहे.गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, कुरखेडा, देसाईगंज व गडचिरोली या चार तालुक्यांमध्ये जवळपास एक हजार हेक्टरवर रेशीम उत्पादनाची शेती केली जाते. रेशीम तयार करणाऱ्या किटकांचे संगोपन येन, आजन व तुती या झाडांवर केले जाते. गडचिरोली जिल्ह्यात या झाडांची संख्या पूर्वी मोठ्या प्रमाणात होती. रेशीम किड्याला हिरवा पाला पोषक राहत असल्याने दरवर्षी या झाडांच्या फांद्या तोडल्या जातात. त्यामुळे या झाडांची वाढ खुंटली आहे तर काही झाडे करपली आहेत. करपलेल्या झाडांच्या जागेवर नवीन झाडांची लागवड करणे आवश्यक असताना रेशीम उत्पादन करणाºया नागरिकांच्या संस्थांनी याकडे साफ दुर्लक्ष केले. त्याचबरोबर वनतस्करांकडूनही झाडांची तोड सुरूच आहे. परिणामी झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.मागील दहा वर्षात रेशीम शेतीमध्ये अनेक संशोधन होऊन शेती करण्याचे नवीन तंत्र उपलब्ध झाले आहे. शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी आरमोरी येथे टसर रिलिंग केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राच्या वतीने रेशीम शेतीसाठी आवश्यक असलेली नवीन यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली जात आहे. मात्र रेशीम उत्पादनात अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या झाडांची संख्या कमी होत चालल्याने रेशीम शेती धोक्यात येण्याची शक्यता आहे.या शेतीवर भोई समाजाच्या हजारो कुटुंबांचा प्रपंच चालत आहे. मात्र ही शेती बुडाल्यास हे सर्व कुटुंब उघड्यावर पडणार आहेत.

टॅग्स :agricultureशेती