शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

वृक्षतोडीमुळे विदर्भातील रेशीम शेती धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 11:10 IST

: टसर रेशीम (कोसा) शेती करण्याचे तंत्र विकसित झाल्यामुळे या शेतीचा खर्च कमी होऊन उत्पादन वाढले असले तरी दिवसेंदिवस ही शेती करण्यासाठी जंगल मिळत नसल्याने या शेतीचा विस्तार थांबला आहे.

ठळक मुद्देहजारो कुटुंबांचा रोजगार हिरावणारतंत्र विकसित झाले मात्र झाडे घटली

प्रदीप बोडणे ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : टसर रेशीम (कोसा) शेती करण्याचे तंत्र विकसित झाल्यामुळे या शेतीचा खर्च कमी होऊन उत्पादन वाढले असले तरी दिवसेंदिवस ही शेती करण्यासाठी जंगल मिळत नसल्याने या शेतीचा विस्तार थांबला आहे. तसेच जुना जंगल नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने रेशीम शेतीच धोक्यात आली आहे.गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, कुरखेडा, देसाईगंज व गडचिरोली या चार तालुक्यांमध्ये जवळपास एक हजार हेक्टरवर रेशीम उत्पादनाची शेती केली जाते. रेशीम तयार करणाऱ्या किटकांचे संगोपन येन, आजन व तुती या झाडांवर केले जाते. गडचिरोली जिल्ह्यात या झाडांची संख्या पूर्वी मोठ्या प्रमाणात होती. रेशीम किड्याला हिरवा पाला पोषक राहत असल्याने दरवर्षी या झाडांच्या फांद्या तोडल्या जातात. त्यामुळे या झाडांची वाढ खुंटली आहे तर काही झाडे करपली आहेत. करपलेल्या झाडांच्या जागेवर नवीन झाडांची लागवड करणे आवश्यक असताना रेशीम उत्पादन करणाºया नागरिकांच्या संस्थांनी याकडे साफ दुर्लक्ष केले. त्याचबरोबर वनतस्करांकडूनही झाडांची तोड सुरूच आहे. परिणामी झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.मागील दहा वर्षात रेशीम शेतीमध्ये अनेक संशोधन होऊन शेती करण्याचे नवीन तंत्र उपलब्ध झाले आहे. शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी आरमोरी येथे टसर रिलिंग केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राच्या वतीने रेशीम शेतीसाठी आवश्यक असलेली नवीन यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली जात आहे. मात्र रेशीम उत्पादनात अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या झाडांची संख्या कमी होत चालल्याने रेशीम शेती धोक्यात येण्याची शक्यता आहे.या शेतीवर भोई समाजाच्या हजारो कुटुंबांचा प्रपंच चालत आहे. मात्र ही शेती बुडाल्यास हे सर्व कुटुंब उघड्यावर पडणार आहेत.

टॅग्स :agricultureशेती