शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

वृक्षतोडीमुळे विदर्भातील रेशीम शेती धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 11:10 IST

: टसर रेशीम (कोसा) शेती करण्याचे तंत्र विकसित झाल्यामुळे या शेतीचा खर्च कमी होऊन उत्पादन वाढले असले तरी दिवसेंदिवस ही शेती करण्यासाठी जंगल मिळत नसल्याने या शेतीचा विस्तार थांबला आहे.

ठळक मुद्देहजारो कुटुंबांचा रोजगार हिरावणारतंत्र विकसित झाले मात्र झाडे घटली

प्रदीप बोडणे ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : टसर रेशीम (कोसा) शेती करण्याचे तंत्र विकसित झाल्यामुळे या शेतीचा खर्च कमी होऊन उत्पादन वाढले असले तरी दिवसेंदिवस ही शेती करण्यासाठी जंगल मिळत नसल्याने या शेतीचा विस्तार थांबला आहे. तसेच जुना जंगल नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने रेशीम शेतीच धोक्यात आली आहे.गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, कुरखेडा, देसाईगंज व गडचिरोली या चार तालुक्यांमध्ये जवळपास एक हजार हेक्टरवर रेशीम उत्पादनाची शेती केली जाते. रेशीम तयार करणाऱ्या किटकांचे संगोपन येन, आजन व तुती या झाडांवर केले जाते. गडचिरोली जिल्ह्यात या झाडांची संख्या पूर्वी मोठ्या प्रमाणात होती. रेशीम किड्याला हिरवा पाला पोषक राहत असल्याने दरवर्षी या झाडांच्या फांद्या तोडल्या जातात. त्यामुळे या झाडांची वाढ खुंटली आहे तर काही झाडे करपली आहेत. करपलेल्या झाडांच्या जागेवर नवीन झाडांची लागवड करणे आवश्यक असताना रेशीम उत्पादन करणाºया नागरिकांच्या संस्थांनी याकडे साफ दुर्लक्ष केले. त्याचबरोबर वनतस्करांकडूनही झाडांची तोड सुरूच आहे. परिणामी झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.मागील दहा वर्षात रेशीम शेतीमध्ये अनेक संशोधन होऊन शेती करण्याचे नवीन तंत्र उपलब्ध झाले आहे. शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी आरमोरी येथे टसर रिलिंग केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राच्या वतीने रेशीम शेतीसाठी आवश्यक असलेली नवीन यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली जात आहे. मात्र रेशीम उत्पादनात अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या झाडांची संख्या कमी होत चालल्याने रेशीम शेती धोक्यात येण्याची शक्यता आहे.या शेतीवर भोई समाजाच्या हजारो कुटुंबांचा प्रपंच चालत आहे. मात्र ही शेती बुडाल्यास हे सर्व कुटुंब उघड्यावर पडणार आहेत.

टॅग्स :agricultureशेती