शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
3
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
4
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
5
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
6
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
7
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
8
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
9
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
10
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
11
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
12
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
13
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
14
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
15
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
16
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
17
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
18
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
19
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
20
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...

अवकाळी पावसाचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2017 02:11 IST

मंगळवारी दुपारच्या सुमारास जिल्हाभरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. याचा फार मोठा फटका रबी पिकांना बसला आहे.

रबी पिकांचे नुकसान : जिल्हाभरात दमदार पाऊस गडचिरोली : मंगळवारी दुपारच्या सुमारास जिल्हाभरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. याचा फार मोठा फटका रबी पिकांना बसला आहे. ढगाळ वातावरण व पावसामुळे तापमानात घट झाल्याने नागरिकांना वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात तूर, मूग, उडीद, जवस, पोपट, कुरता, चना, वटाणा आदी पिकांचे रबी हंगामात उत्पादन घेतल्या जाते. रबी पिकांच्या काढणीचे काम पूर्ण झाले आहे. मळणीचे काम काही शेतकऱ्यांनी सुरू केले आहे. तर काही शेतकरी ढिग बनवून ठेवले आहेत. मंगळवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील वातावरण ढगाळ होते. हवामान खात्यानेही पाऊस येण्याची शक्यता वर्तविली होती. त्यामुळे शेतकरी वर्गाने आधीच तयारी करीत पिकांच्या ढिगांवर ताडपत्री, पॉलिथीन झाकून ठेवले. परिणामी पावसामुळे पिकांचे तुलनेत कमी नुकसान झाले आहे. तरीही ज्या शेतकऱ्यांनी ढिगांवर झाकले नव्हते, त्यांचे नुकसान निश्चित आहे. देसाईगंज, आरमोरी, चामोर्शी, लखमापूर बोरी, परिसरात दमदार पाऊस झाला. लखमापूर बोरी परिसरात जोराचे वादळ आल्याने अनेकांच्या घरावरील छत उडून गेले. रबी पिकांचे ढिग व तणसीचे ढिगही उडून गेले. त्यामळे ढिगात पावसाचे पाणी शिरले. गडचिरोली शहरात जवळपास ५.३० वाजताच्या सुमारास पाऊस झाला. वेळेवर आलेल्या पावसामुळे शहरातील दुकानदार, पादचारी, वाहनधारक यांची तारंबळ उडाली. आणखी ९ तारखेपर्यंत पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे पावसाचा धोका कायम आहे. (नगर प्रतिनिधी)