शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

नवरगाव येथे तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: March 16, 2015 01:20 IST

तालुक्यातील नवरगाव येथील संपूर्ण जलस्त्रोत आटल्याने गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

कुरखेडा : तालुक्यातील नवरगाव येथील संपूर्ण जलस्त्रोत आटल्याने गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. येथील तीन हातपंपही नादुरूस्त असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. गावात पाण्याचे दुर्भिक्ष असतांनाही प्रशासन मात्र निद्रावस्थेत आहे. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या त्वरित न सोडविल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. आंधळी गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नवगावात जवळपास ५०० लोकसंख्या आहे. पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्याकरिता येथे चार सार्वजनिक विहिरी व पाच हातपंप आहेत. मात्र मागील दोन महिन्यांपासून तीन हातपंप नादुरूस्त अवस्थेत आहेत. शिवाय येथील चार विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी मिळविण्याकरिता कसरत करावी लागत आहे. गावाबाहेर तसेच आंधळी मार्गावरील जि. प. शाळेत हातपंप आहे. परंतु येथे पहाटेपासूनच पिण्याच्या पाण्याकरिता झुंबळ उडत असते. दोन्ही बोरवेल गावाबाहेर असल्याने पिण्याच्या पाण्याकरिता नागरिक जातात. परिणामी त्यांना सकाळपासूनच पाण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते. यात अनेकांचा वेळही वाया जातो. त्यामुळे गावातील महिलांमध्ये ग्रा. पं. प्रशासनाप्रती तीव्र संताप व्यक्त होत आहे. पाणी टंचाई निवारणासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही, असा आरोप ग्रामस्थ दुधराम कवाडकर, तानू उईके, तानाजी जांभुळकर, तुळशिराम मानकर, गुणाजी जांभुळकर, योगेश ठलाल व अन्य ग्रामस्थांनी केला आहे. गावातील पाणीटंचाईची समस्या त्वरित न सोडविल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. या संदर्भात पं. स. सदस्य चांगदेव फाये यांची विचारणा केली असता, नवरगावची समस्या लक्षात घेता येथे पाईपलाईनचा विस्तार करण्यात आला आहे. मात्र तांत्रिक अडचणींमुळे योजना कार्यान्वित झाली नाही, पाणीटंचाईचा प्रश्न सोडवू, असे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)