शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
3
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
4
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
5
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
6
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
7
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
8
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
9
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
10
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
11
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
12
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
13
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
14
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  
15
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश
16
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
17
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
18
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
19
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
20
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!

मलकापुरात भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: April 15, 2017 01:42 IST

तालुक्यातील अडपल्ली माल ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मलकापूर येथे मागील आठवडाभरापासून पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे.

हातपंपातील जलपातळी खालावली : सौर ऊर्जेची पाणी योजनाही बंद अवस्थेत मुलचेरा : तालुक्यातील अडपल्ली माल ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मलकापूर येथे मागील आठवडाभरापासून पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. गावातील दोन हातपंपातील जलपातळी खालावली असून येथील सौरऊर्जेवरील नळयोजनाही बंद अवस्थेत आहे. अडपल्ली गट ग्रामपंचायत अंतर्गत सहा गावांचा समावेश होतो. या गावांपैैकी मलकापूर गाव आहे. या गावाची लोकसंख्या अडीच हजारावर आहे. लोकसंख्येच्या मानाने येथे केवळ दोन हातपंप आहेत. तसेच २००८ मध्ये जलस्वराज्य योजनेतून ६८ हजार रूपयांचा खर्च करून सौरऊर्जेवरील नळ योजना कार्यान्वित करण्यात आली होती. या योजनेंतर्गत गावात पाण्याची टाकी व पाईपही टाकण्यात आले. काही दिवस सुरळीत पाणी पुरवठा झाला. मात्र काही दिवसांतच नळ योजना बंद पडली. अडीच हजारावर लोकसंख्या असतानाही गावात केवळ दोन हातपंप आहेत. सध्या या हातपंपातील जलस्तर घटलेला आहे. त्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पहाटेपासूनच नळावर गर्दी करावी लागते. सौर ऊर्जेवरील नळ योजनेंतर्गत ८०० लोकांना कनेक्शन देण्यात आले आहे. त्यामुळे या नळ योजनेवर गावातील नागरिक अवलंबून आहेत. परंतु नळ योजना बंद असल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. गावातील बंद पडलेली सौर ऊर्जेवरील नळ योजना तत्काळ सुरू करावी, अशी मागणी रमेश कन्नाके, पत्रू सिडाम, देवेंद्रसिंह, कालिदास भोयर, बंडू सिडाम, राजू दुगे यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी) दोन वर्षांपासून मोटारची दुरूस्ती नाही मलकापूर येथे सौर ऊर्जेवरील नळ योजनेच्या पाणी टाकीलगत मोटार बसविण्यात आली. परंतु अल्पावधीतच मोटार नादुरूस्त झाली. त्यामुळे सदर मोटार दुरूस्तीसाठी पुणे येथे पाठविण्यात आली. दोन वर्षांपासून मोटारची दुरूस्ती अद्यापही झाली नाही. या संदर्भात अडपल्ली मालचे सरपंच व ग्राम सचिवांनी सांगितले की, सौर ऊर्जा पाणी योजनेची मोटार खराब झाल्याने सदर मोटार दुरूस्तीसाठी पाठविण्यात आली आहे. परंतु दोन वर्षांपासून अद्यापही मोटारची दुरूस्ती का झाली नाही, असा सवाल येथील नागरिकांनी स्थानिक प्रशासनाला केला आहे. प्रशासनाने लक्ष घालून सौर ऊर्जेवरील नळ योजना तत्काळ सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.