शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

वाढत्या उष्णतामानामुळे रस्तेही झाले सुनसान

By admin | Updated: April 24, 2016 01:26 IST

गडचिरोली जिल्ह्याचे तापमान ४६ अंशाच्या आसपास गेलेले आहे. चालू महिन्यात उष्माघातामुळे जिल्ह्यात कुरखेडा व वाकडी येथे दोन इसमाचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात उष्माघाताचे दोन बळी : स्वत:ची काळजी घ्या, आरोग्य प्रशासनाची सूचनागडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे तापमान ४६ अंशाच्या आसपास गेलेले आहे. चालू महिन्यात उष्माघातामुळे जिल्ह्यात कुरखेडा व वाकडी येथे दोन इसमाचा मृत्यू झाला. वाढत्या उष्णतामानामुळे रस्ते दुपारी १२ वाजतानंतर सुनसान होऊन जातात. वाढत्या उष्णतामानापासून नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, अशा सूचना आरोग्य प्रशासनाने केल्या आहे. यावर्षी उन्हाळा अतिशय तीव्र स्वरूपाचा राहणार असल्याचे हवामान खाते व तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यंदा एप्रिल महिन्यात तापमानाने ४४ अंशाच्या वर पारा गाठला असून या उष्णतामानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कुलरही काम करीत नसल्याचे अनेकजण सांगतात. जिल्ह्यात याच महिन्यात उष्माघाताने दोन जणांचा जीवही गमावला गेला आहे. त्यामुळे वाढत्या उष्णतामानात नागरिकांनी स्वत:ची काळजी स्वत:च घ्यावी, असे प्रशासनाने सूचविले आहे. यामध्ये आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७ अंश सेल्सियस असते, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात, घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७ अंश सेल्सियस तापमान कायम राखत, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहणे अत्यंत गरजेचे आणि अत्यावश्यक आहे. तसेच पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामे करते, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणे टाळते. जेव्हा बाहेरचे तापमान ४५ अंशाच्या पुढे जाते तेव्हा शरीरातली कूलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचे तापमान ३७ अंशाच्या पुढे जाऊ लागते. शरीराचं तापमान जेव्हा ४२ अंश डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचते, तेव्हा रक्त तापू लागते आणि रक्तातले प्रोटिन अक्षरश: शिजू लागते. स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायूही निकामी होतात. रक्तातले पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होते, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होते, महत्त्वाच्या अवयवांना (विशेषत: मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो. माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो.उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित राहावे व आपल्या शरीराचे तापमान ३७ अंशच कसे राहिल याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)