शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

धान उत्पादनात हेक्टरी तीन क्विंटलची घट

By admin | Updated: November 13, 2014 23:01 IST

उशीरा झालेली रोवणी, अपुरा पाऊस व धानपिकावर विविध रोगांचा झालेला प्रादुर्भाव यामुळे यावर्षी धानाच्या उत्पादनात मागील वर्षीच्या तुलनेत हेक्टरी तीन क्विंटलची घट होईल,

शेतकरी हवालदिल : नजरअंदाज पाहणीचा निष्कर्षगडचिरोली : उशीरा झालेली रोवणी, अपुरा पाऊस व धानपिकावर विविध रोगांचा झालेला प्रादुर्भाव यामुळे यावर्षी धानाच्या उत्पादनात मागील वर्षीच्या तुलनेत हेक्टरी तीन क्विंटलची घट होईल, असा निष्कर्ष कृषी विभागाने नुकत्याच केलेल्या नजर अंदाज पाहणीवरून काढला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जमीन व वातावरण धान उत्पादनासाठी पोषक असल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. एकूण शेती उत्पादनाच्या धानपिकाचा वाटा सुमारे ८० टक्केहून अधिक आहे. २०१४-१५ च्या खरीप हंगामात कृषी विभागाने १ लाख ५१ हजार ८१० हेक्टरवर धानपिकाची लागवड करण्याचे नियोजन केले होते. मात्र प्रत्यक्षात १ लाख ४५ हजार १३५ हेक्टरवर धानपिकाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये १ लाख २ हजार ५२५ हेक्टरवर धानपिकाची रोवणी तर ४२ हजार ६१० हेक्टरवर आवत्या पद्धतीने धानपिकाची लागवड करण्यात आली. मागील वर्षीच्या हंगामात हेक्टरी १ हजार ५४१ क्विंटल तांदळाचे उत्पादन झाले होते. वेळेवर शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे, कीटकनाशके उपलब्ध करून दिले जाणार असल्याने कृषी विभागाने हेक्टरी १ हजार ६५० क्विंटल तांदळाचे उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार कृषी विभागाने योग्य नियोजनही केले होते. कृषी विभागाचे व शेतकऱ्यांचे नियोजन योग्य असले तरी पावसाने मात्र सुरूवातीपासूनच धक्के देण्यास सुरूवात केली. पहिला पाऊस तब्बल १५ दिवसांनी उशीरा पडला. त्यानंतर पावसाने एक महिना दडी मारली. पहिल्या पावसात काही शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले. त्यांची पऱ्हे पावसाअभावी करपली. तर काही शेतकरी मात्र पऱ्हे टाकण्यासाठी पावसाची वाटच पाहत होते. पऱ्हांमुळे धानाची रोवणी तब्बल दीड महिना उशीराने झाली. याचा साहजीक परिणाम धानाच्या उत्पादनावर पडला. त्यानंतरही पाऊस फार जोर धरू शकला नाही. तलाव व बोड्यांमध्ये अर्धाच जलसाठा असतांना पावसाने कायमची दडी मारली. धानपीक गर्भात असतांनाच तलाव व बोडी पूर्णपणे आटल्याने धानपीक करपायला लागले. आटापीटा करूनही अनेक शेतकऱ्यांच्या हातातून धानपीक गेले. काही शेतकऱ्यांनी सिंचनाची पर्यायी व्यवस्था केल्यानंतर जवळपास अर्धे उत्पादन त्यांच्या हाती लागले. तर काही भागात मावा, तुडतुडा या रोगांनी धानपिकावर हल्ला चढविला. शर्तीचे प्रयत्न करूनही रोगांपासून धानपिकाला वाचविता आले नाही. कृषी विभागाने नुकतीच नजर अंदाज पाहणी केली आहे. या पाहणीवरून या पाहणीवरून यावर्षी जिरायती धानाचे उत्पादन हेक्टरी १३ क्विंटल तांदूळ तर बागायती धानाचे उत्पादन हेक्टरी १७ क्विंटल तांदूळ एवढे होणार आहे. दोघांचीही सरासरी पकडल्यास हेक्टरी १४ क्विंटल तांदळाचे उत्पादन होणार आहे. मागील वर्षी धानाचे उत्पादन सरासरी १५ क्विंटल ४१ किलो तांदूळ झाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी हेक्टरी दीड क्विंटल तांदळात घट होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. धान आणि तांदळाचे प्रमाण १०० मागे ५० ते ५५ असे राहत असल्याने धानाच्या उत्पादनात हेक्टरी ३ क्विंटल होण्याची शक्यता वर्तविली आहे. सोयाबीन पिकानंतर धानपिकानेही साथ दिली नसल्याने शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे, असा गहण प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. काही भागात दुष्काळी परिस्थिती असल्याने शासनाने दुष्काळ जाहीर करावा, अशीही मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.