शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
2
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
3
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
4
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
5
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
8
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
9
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
10
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
11
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
12
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
13
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
14
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
15
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
16
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
17
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
18
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
19
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
20
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!

धान उत्पादनात हेक्टरी तीन क्विंटलची घट

By admin | Updated: November 13, 2014 23:01 IST

उशीरा झालेली रोवणी, अपुरा पाऊस व धानपिकावर विविध रोगांचा झालेला प्रादुर्भाव यामुळे यावर्षी धानाच्या उत्पादनात मागील वर्षीच्या तुलनेत हेक्टरी तीन क्विंटलची घट होईल,

शेतकरी हवालदिल : नजरअंदाज पाहणीचा निष्कर्षगडचिरोली : उशीरा झालेली रोवणी, अपुरा पाऊस व धानपिकावर विविध रोगांचा झालेला प्रादुर्भाव यामुळे यावर्षी धानाच्या उत्पादनात मागील वर्षीच्या तुलनेत हेक्टरी तीन क्विंटलची घट होईल, असा निष्कर्ष कृषी विभागाने नुकत्याच केलेल्या नजर अंदाज पाहणीवरून काढला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जमीन व वातावरण धान उत्पादनासाठी पोषक असल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. एकूण शेती उत्पादनाच्या धानपिकाचा वाटा सुमारे ८० टक्केहून अधिक आहे. २०१४-१५ च्या खरीप हंगामात कृषी विभागाने १ लाख ५१ हजार ८१० हेक्टरवर धानपिकाची लागवड करण्याचे नियोजन केले होते. मात्र प्रत्यक्षात १ लाख ४५ हजार १३५ हेक्टरवर धानपिकाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये १ लाख २ हजार ५२५ हेक्टरवर धानपिकाची रोवणी तर ४२ हजार ६१० हेक्टरवर आवत्या पद्धतीने धानपिकाची लागवड करण्यात आली. मागील वर्षीच्या हंगामात हेक्टरी १ हजार ५४१ क्विंटल तांदळाचे उत्पादन झाले होते. वेळेवर शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे, कीटकनाशके उपलब्ध करून दिले जाणार असल्याने कृषी विभागाने हेक्टरी १ हजार ६५० क्विंटल तांदळाचे उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार कृषी विभागाने योग्य नियोजनही केले होते. कृषी विभागाचे व शेतकऱ्यांचे नियोजन योग्य असले तरी पावसाने मात्र सुरूवातीपासूनच धक्के देण्यास सुरूवात केली. पहिला पाऊस तब्बल १५ दिवसांनी उशीरा पडला. त्यानंतर पावसाने एक महिना दडी मारली. पहिल्या पावसात काही शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले. त्यांची पऱ्हे पावसाअभावी करपली. तर काही शेतकरी मात्र पऱ्हे टाकण्यासाठी पावसाची वाटच पाहत होते. पऱ्हांमुळे धानाची रोवणी तब्बल दीड महिना उशीराने झाली. याचा साहजीक परिणाम धानाच्या उत्पादनावर पडला. त्यानंतरही पाऊस फार जोर धरू शकला नाही. तलाव व बोड्यांमध्ये अर्धाच जलसाठा असतांना पावसाने कायमची दडी मारली. धानपीक गर्भात असतांनाच तलाव व बोडी पूर्णपणे आटल्याने धानपीक करपायला लागले. आटापीटा करूनही अनेक शेतकऱ्यांच्या हातातून धानपीक गेले. काही शेतकऱ्यांनी सिंचनाची पर्यायी व्यवस्था केल्यानंतर जवळपास अर्धे उत्पादन त्यांच्या हाती लागले. तर काही भागात मावा, तुडतुडा या रोगांनी धानपिकावर हल्ला चढविला. शर्तीचे प्रयत्न करूनही रोगांपासून धानपिकाला वाचविता आले नाही. कृषी विभागाने नुकतीच नजर अंदाज पाहणी केली आहे. या पाहणीवरून या पाहणीवरून यावर्षी जिरायती धानाचे उत्पादन हेक्टरी १३ क्विंटल तांदूळ तर बागायती धानाचे उत्पादन हेक्टरी १७ क्विंटल तांदूळ एवढे होणार आहे. दोघांचीही सरासरी पकडल्यास हेक्टरी १४ क्विंटल तांदळाचे उत्पादन होणार आहे. मागील वर्षी धानाचे उत्पादन सरासरी १५ क्विंटल ४१ किलो तांदूळ झाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी हेक्टरी दीड क्विंटल तांदळात घट होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. धान आणि तांदळाचे प्रमाण १०० मागे ५० ते ५५ असे राहत असल्याने धानाच्या उत्पादनात हेक्टरी ३ क्विंटल होण्याची शक्यता वर्तविली आहे. सोयाबीन पिकानंतर धानपिकानेही साथ दिली नसल्याने शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे, असा गहण प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. काही भागात दुष्काळी परिस्थिती असल्याने शासनाने दुष्काळ जाहीर करावा, अशीही मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.