शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

खानसामांअभावी सिरोंचातील विश्रामगृह पडले ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 22:27 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील विश्रामगृहातील खानसामा राज्य विधीमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनानिमित्त तेथे कर्तव्यावर गेल्यामुळे सिरोंचातील विश्रामगृह ओस पडले आहे.

ठळक मुद्देबंदचा फलक कायमच : अधिवेशनावरून अद्यापही परतले नाही

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील विश्रामगृहातील खानसामा राज्य विधीमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनानिमित्त तेथे कर्तव्यावर गेल्यामुळे सिरोंचातील विश्रामगृह ओस पडले आहे. नागपुरात गेलेले संबंधित खानसामा सिरोंचा येथे न परतल्याने सिरोंचातील विश्रामगृह बंदच असून सार्वजनिक विभागाने लावलेला बंदचा फलक अद्यापही दर्शनी भागावर कायम आहे.पुढील आदेशापर्यंत विश्रामगृह बंद ठेवण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी फलकातून केले आहे. सिरोंचा येथील साबांविचे हे विश्रामगृह ब्रिटीशकालीन असून ते १०० वर्षापूर्वीपासूनचे सुस्थितीत आहे. सिरोंचा येथे कालेश्वर दर्शनासाठी तसेच इतर कामासाठी विविध नागरिक व पर्यटक मोठ्या संख्येने येतात. सिरोंचा येथे इतरत्र निवासाची कोणतीही व्यवस्था नसल्याने पर्यटक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाकडेच सर्वप्रथम वळतात. मात्र खानसामाअभावी हे विश्रामगृह गेल्या १५ दिवसांपासून बंद असल्याने पर्यटकांची प्रचंड पंचाईत होत आहे.खासगी विश्रामगृहापेक्षा या शासकीय विश्रागृहाचे भाडे कमी राहत असल्याने पर्यटकांची पसंती याच विश्रामगृहाला अधिक असते. शासकीय विश्रामगृहालगत बालाजी मंदिर असून समोरच्या भागात बगिचा आहे. चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ आदीसह संपूर्ण विदर्भातून पर्यटक मोठ्या संख्येने येथे हिवाळ्यात येत असतात. मात्र विश्रामगृह बंद असल्याने अनेक पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.खानसामाअभावी सदर विश्रामगृह बंद ठेवण्यास जबाबदार असणाºया संबंधित विभाग प्रमुखाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.