शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

खानसामांअभावी सिरोंचातील विश्रामगृह पडले ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 22:27 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील विश्रामगृहातील खानसामा राज्य विधीमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनानिमित्त तेथे कर्तव्यावर गेल्यामुळे सिरोंचातील विश्रामगृह ओस पडले आहे.

ठळक मुद्देबंदचा फलक कायमच : अधिवेशनावरून अद्यापही परतले नाही

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील विश्रामगृहातील खानसामा राज्य विधीमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनानिमित्त तेथे कर्तव्यावर गेल्यामुळे सिरोंचातील विश्रामगृह ओस पडले आहे. नागपुरात गेलेले संबंधित खानसामा सिरोंचा येथे न परतल्याने सिरोंचातील विश्रामगृह बंदच असून सार्वजनिक विभागाने लावलेला बंदचा फलक अद्यापही दर्शनी भागावर कायम आहे.पुढील आदेशापर्यंत विश्रामगृह बंद ठेवण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी फलकातून केले आहे. सिरोंचा येथील साबांविचे हे विश्रामगृह ब्रिटीशकालीन असून ते १०० वर्षापूर्वीपासूनचे सुस्थितीत आहे. सिरोंचा येथे कालेश्वर दर्शनासाठी तसेच इतर कामासाठी विविध नागरिक व पर्यटक मोठ्या संख्येने येतात. सिरोंचा येथे इतरत्र निवासाची कोणतीही व्यवस्था नसल्याने पर्यटक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाकडेच सर्वप्रथम वळतात. मात्र खानसामाअभावी हे विश्रामगृह गेल्या १५ दिवसांपासून बंद असल्याने पर्यटकांची प्रचंड पंचाईत होत आहे.खासगी विश्रामगृहापेक्षा या शासकीय विश्रागृहाचे भाडे कमी राहत असल्याने पर्यटकांची पसंती याच विश्रामगृहाला अधिक असते. शासकीय विश्रामगृहालगत बालाजी मंदिर असून समोरच्या भागात बगिचा आहे. चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ आदीसह संपूर्ण विदर्भातून पर्यटक मोठ्या संख्येने येथे हिवाळ्यात येत असतात. मात्र विश्रामगृह बंद असल्याने अनेक पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.खानसामाअभावी सदर विश्रामगृह बंद ठेवण्यास जबाबदार असणाºया संबंधित विभाग प्रमुखाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.