शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
5
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
6
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
7
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
8
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
9
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
10
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
11
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
12
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
13
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
14
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
15
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
16
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
17
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
18
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
19
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
20
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका

देसाईगंजमध्ये गरजेपेक्षा अपुरा पाणीपुरवठा

By admin | Updated: May 10, 2014 00:11 IST

प्रती व्यक्ती प्रती दिन १३५ लिटर पाण्याची आवश्यकता आहे. या शासनाच्या नियमाप्रमाणे देसाईगंज शहरातील ४० हजार लोकसंख्येला ...

देसाईगंज : प्रती व्यक्ती प्रती दिन १३५ लिटर पाण्याची आवश्यकता आहे. या शासनाच्या नियमाप्रमाणे देसाईगंज शहरातील ४० हजार लोकसंख्येला ५४ लाख लिटर पाण्याची आवश्यकता असताना केवळ ११ लाख ५० हजार लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. शासनाच्या नियमावर बोट ठेवल्यास देसाईगंज शहराला आणखी ४२ लाख ५० हजार लिटर पाण्याची गरज आहे. देसाईगंज येथे १९६१ मध्ये नगर परिषदेची स्थापना झाल्यानंतर १९६४ मध्ये ५ लाख लिटर पाण्याची क्षमता असलेली नळ योजना बांधण्यात आली. त्यावेळी शहराची लोकसंख्या केवळ ७ हजार ऐवढी होती. देसाईगंज हे जिल्ह्यातील मध्यवर्ती व औद्योगिक ठिकाण असल्याने या शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली. आज देसाईगंज शहराची लोकसंख्या ४० हजार एवढी आहे. प्रत्येक व्यक्तीला दिवसाला १३५ लिटर पाणी मिळावे, असा शासनाचा नियम आहे. त्यानुसार देसाईगंज शहराला ५४ लाख लिटर पाण्याची गरज असताना प्रत्यक्षात केवळ ११ लाख ५० हजार लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. अजुनही ४२ लाख ५० हजार लिटरची टंचाई भासत आहे. आकडेवारीकडे नजर टाकल्यास लोकसंख्येच्या तुलनेत केवळ २५ टक्के पाण्याचा पुरवठा होत असल्याचे दिसून येते. विद्यमान पाणी पुरवठा व्यवस्थेत केवळ ८ हजार ५१८ नागरिकांच्या पाण्याची गरज पूर्ण करण्याची क्षमता आहे. मात्र याच पाण्यात ४० हजार लोकसंख्येला आपली गरज पूर्ण करावी लागत आहे. देसाईगंजमध्ये १० लाख ५० हजार लिटर पाणी क्षमता असलेल्या भगतसिंग वार्डामध्ये दोन पाण्याच्या टाक्या व जुनी वडसा परिसरात १ लाख लिटर क्षमतेची एक पाण्याची टाकी आहे. हेटी वार्ड येथे ५० हजार लिटर पाणी क्षमतेची टाकी मोळकडीस आली आहे. शहरात एकूण ३ हजार ७०४ नळ कनेक्शन आहेत. यामध्ये ३ हजार ५८२ कनेक्शन घरगुती तर १२२ कनेक्शन व्यावसायीक आहेत. नगर परिषद घरगुती नळधारकांकडून १२०० रूपये प्रती वर्ष कर आकारते. या माध्यमातून नगर परिषदेला ४४ लाख ४४ हजार ८०० रूपये एवढा पाणीपट्टी कर गोळा होतो. पाण्याशिवाय व्यक्ती जीवंत राहू शकत नाही. त्यामुळेच पाण्याला जीवनाची उपमा दिली जाते. नगर परिषद प्रशासनाला शासनाकडून कोट्यवधी रूपयाचा निधी प्राप्त होते. सदर निधी अनावश्यक कामांवर खर्च केल्या जातो. त्यापेक्षा पाणी पुरवठा योजनेवर खर्च केल्यास नागरिकांची तहाण भागण्यास मदत होईल. उन्हाळ्यामध्ये पाण्याचा वापर जास्त व पुरवठा कमी अशी परिस्थिती उद्भवत असल्याने देसाईगंज शहरात पाण्यासाठी हाहाकार माजतो. पुरेशा प्रमाणत पाणी पुरवठा होण्यासाठी नळ योजना बांधण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)