शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे आष्टीतील युवकाचा मृत्यू

By admin | Updated: June 26, 2015 00:07 IST

येथील धनराज विठ्ठल बैनलवार (२३) याची प्रकृती बिघडल्याने त्याला बुधवारी रात्री २.३० वाजताच्या सुमारास आष्टी ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले.

आष्टी : येथील धनराज विठ्ठल बैनलवार (२३) याची प्रकृती बिघडल्याने त्याला बुधवारी रात्री २.३० वाजताच्या सुमारास आष्टी ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले. मात्र येथील डॉक्टरांनी रात्रभर त्याच्यावर कोणतेही उपचार केले नाही व सकाळी ७ वाजता चंद्रपूर येथे हलविण्यास सांगितले. परिणामी सदर युवकाचा मृत्यू झाला असून यासाठी जबाबदार असलेल्या डॉक्टर उईके यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी धनराजच्या कुटुंबियांनी केली आहे. धनराज बैनलवार यांचा सलूनचा व्यवसाय बुधवारी रात्रीचे जेवन केल्यानंतर तो झोपला असताना रात्री २ वाजताच्या सुमारास त्याच्या गळ्यात अचानक दुखायला सुरूवात झाली. ही बाब त्यांनी कुटुंबियांना सांगितल्यानंतर तत्काळ त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रात्रपाळीवर असलेले डॉ. उईके हे अनुपस्थितीत होते. डॉ. उईके यांना या बद्दलची माहिती फोनवरून देण्यात आली. डॉक्टरवर करा कारवाईआष्टीतील घटना : मृतकाच्या नातलगांची मागणीआष्टी : आष्टी रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उईके यांनी फोनवरूनच रूग्णालयातील परिचर्येला रुग्णाला सलाईन लावून उपचार करण्यास सांगितले. स्वत: मात्र सकाळी ५ वाजता रूग्णालयात आले. तोपर्यंत धनराजची प्रकृती अत्यंत खालावली असल्याने त्याला चंद्रपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला. ग्रामीण रूग्णालयाच्या रूग्णवाहिकेने त्याला चंद्रपूर येथील एका खासगी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डॉ. उईके यांच्या दुर्लक्षामुळे धनराजचा मृत्यू झाला असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी धनराजच्या कुटुंबीयांनी केली आहे. मृत्यू झाल्याची माहिती कळताच आष्टी येथील नागरिकांनी रूग्णालयाच्या परिसरात गर्दी केली. डॉ. उईके यांनी धनराजला गुरूवारी सकाळी ५.३० वाजता रेफर केले असले तरी धनराजच्या वडिलांना दिलेल्या रेफर स्लीपमध्ये मात्र २.३० वाजताची नोंद केली आहे. (प्रतिनिधी)