आष्टी : येथील धनराज विठ्ठल बैनलवार (२३) याची प्रकृती बिघडल्याने त्याला बुधवारी रात्री २.३० वाजताच्या सुमारास आष्टी ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले. मात्र येथील डॉक्टरांनी रात्रभर त्याच्यावर कोणतेही उपचार केले नाही व सकाळी ७ वाजता चंद्रपूर येथे हलविण्यास सांगितले. परिणामी सदर युवकाचा मृत्यू झाला असून यासाठी जबाबदार असलेल्या डॉक्टर उईके यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी धनराजच्या कुटुंबियांनी केली आहे. धनराज बैनलवार यांचा सलूनचा व्यवसाय बुधवारी रात्रीचे जेवन केल्यानंतर तो झोपला असताना रात्री २ वाजताच्या सुमारास त्याच्या गळ्यात अचानक दुखायला सुरूवात झाली. ही बाब त्यांनी कुटुंबियांना सांगितल्यानंतर तत्काळ त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रात्रपाळीवर असलेले डॉ. उईके हे अनुपस्थितीत होते. डॉ. उईके यांना या बद्दलची माहिती फोनवरून देण्यात आली. डॉक्टरवर करा कारवाईआष्टीतील घटना : मृतकाच्या नातलगांची मागणीआष्टी : आष्टी रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उईके यांनी फोनवरूनच रूग्णालयातील परिचर्येला रुग्णाला सलाईन लावून उपचार करण्यास सांगितले. स्वत: मात्र सकाळी ५ वाजता रूग्णालयात आले. तोपर्यंत धनराजची प्रकृती अत्यंत खालावली असल्याने त्याला चंद्रपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला. ग्रामीण रूग्णालयाच्या रूग्णवाहिकेने त्याला चंद्रपूर येथील एका खासगी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डॉ. उईके यांच्या दुर्लक्षामुळे धनराजचा मृत्यू झाला असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी धनराजच्या कुटुंबीयांनी केली आहे. मृत्यू झाल्याची माहिती कळताच आष्टी येथील नागरिकांनी रूग्णालयाच्या परिसरात गर्दी केली. डॉ. उईके यांनी धनराजला गुरूवारी सकाळी ५.३० वाजता रेफर केले असले तरी धनराजच्या वडिलांना दिलेल्या रेफर स्लीपमध्ये मात्र २.३० वाजताची नोंद केली आहे. (प्रतिनिधी)
डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे आष्टीतील युवकाचा मृत्यू
By admin | Updated: June 26, 2015 00:07 IST