शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीने घरांच्या पडझडीची मदत रखडली

By admin | Updated: March 8, 2017 02:17 IST

पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आरमोरी तालुक्यातील २५२ च्या वर नागरिकांचे नुकसान झाले आहे.

निवेदन : आनंदराव गेडाम यांच्यातर्फे पाठपुरावा आरमोरी : पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आरमोरी तालुक्यातील २५२ च्या वर नागरिकांचे नुकसान झाले आहे. मात्र या आपातग्रस्तांना सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही अजूनही आर्थिक मदत मिळाली नाही. शासनस्तरावर पाठपुरावा करून आपातग्रस्तांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी माजी आ. आनंदराव गेडाम यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. मागील वर्षी आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा, पळसगाव, पाथरगोटा, कुऱ्हाडी, पिसेवडधा, कोरेगाव, डार्ली, नरचुली गावातील नागरिकांची घरे कोसळली होती. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचे शेतीचेही नुकसान झाले होते. याबाबतची माहिती महसूल विभागाला दिल्यानंतर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी याबाबतचे पंचनामे केले होते व आर्थिक मदत देण्याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठविला होता. मात्र सात महिन्यांचा कालावधी उलटूनही अजूनही आर्थिक मदत देण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. मार्चपूर्वी शासनाकडून आर्थिक मदत मिळाल्यास शेतकऱ्याने जे पीक कर्ज घेतले आहे, ते परत करण्यास मदत होईल. त्यामुळे मदतीची रक्कम तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी माजी आ. आनंदराव गेडाम यांच्यासह आनंदराव आकरे, दिलीप घोडाम उपस्थित होते.