शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
5
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
6
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
7
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
8
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
9
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
10
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
11
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
13
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
14
घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!
15
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
16
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
17
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
18
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
19
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
20
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ

जनमंचतर्फे गडचिरोलीत धरणे

By admin | Updated: October 31, 2015 02:12 IST

भारतीय शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सुधारणा करण्याच्या दिशेने स्वामीनाथन आयोगाने फार चांगल्या शिफारशी केल्या आहेत.

स्वामीनाथन आयोग लागू करा : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदनगडचिरोली : भारतीय शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सुधारणा करण्याच्या दिशेने स्वामीनाथन आयोगाने फार चांगल्या शिफारशी केल्या आहेत. या शिफारशी लागू करण्यात याव्या, या मागणीसाठी शुक्रवारी गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात जनमंचाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्याच्या अनेक तालुका मुख्यालयातही सदर आंदोलन झाले. गडचिरोली येथील आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे बांधकाम व नियोजन सभापती अतुल गण्यारपवार, ज्येष्ठ ओबीसी नेते अरूण मुनघाटे, नगरसेवक विजय गोरडवार, जगदीश म्हस्के, दादाजी चापले, काँग्रेसचे नेते पंकज गुड्डेवार, राजेश नाथानी, नगरसेवक संध्या उईके, राकेश गणवीर, रमेश भुरसे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत वाघरे आदींनी केले.भारतीय कृषी अनुसंधान संस्थेचे माजी संचालक व आंतरराष्ट्रीय किर्तीचे कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारने १८ नोव्हेंबर २००४ रोजी राष्ट्रीय कृषी आयोगाची स्थापना केली. या आयोगाने डिसेंबर २००४, आॅगस्ट २००५, डिसेंबर २००५ व एप्रिल २००६ मध्ये चार अहवाल सादर केले. पाचवा आणि शेवटचा अहवाल ४ आॅक्टोबर २००६ रोजी सादर केला. या अहवालामध्ये शेतकऱ्यांच्या दुरवस्थेविषयी विविध कारणे तसेच अवस्था सुधारण्यासाठी उपाययोजना सूचविण्यात आल्या. त्याच दिवशी ५ आॅक्टोबर २००६ ला केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सहावा वेतन आयोगाची स्थापना केली. २४ मार्च २००८ रोजी शिफारशी सादर झाल्या. २९ आॅगस्ट २००८ ला सहावा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा करण्यात आली. पुढची पायरी म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांकडून मागणी नसतानाही अडीच वर्ष आधीच सातवा वेतन आयोग जाहीर करून त्याच्या पगारात किमान ५० टक्क्यांनी वाढ करण्याचा घाट सरकारने घातला आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढत असताना स्वामीनाथन आयोगाचा अहवाल मागील ९ वर्षांपासून दडपून ठेवण्यात आला आहे.दुसरीकडे कर्मचाऱ्यांची मागणी नसतानाही त्यांना सातवा वेतन आयोग देण्याची तयारी राज्य सरकारने चालविली आहे. हा प्रचंड विरोधाभास असून शेतकऱ्यासाठी स्वामीनाथन आयोग लागू केला पाहिजे, अशी मागणी करणारे निवेदन जनमंचाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठविण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)