शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

जनमंचतर्फे गडचिरोलीत धरणे

By admin | Updated: October 31, 2015 02:12 IST

भारतीय शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सुधारणा करण्याच्या दिशेने स्वामीनाथन आयोगाने फार चांगल्या शिफारशी केल्या आहेत.

स्वामीनाथन आयोग लागू करा : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदनगडचिरोली : भारतीय शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सुधारणा करण्याच्या दिशेने स्वामीनाथन आयोगाने फार चांगल्या शिफारशी केल्या आहेत. या शिफारशी लागू करण्यात याव्या, या मागणीसाठी शुक्रवारी गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात जनमंचाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्याच्या अनेक तालुका मुख्यालयातही सदर आंदोलन झाले. गडचिरोली येथील आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे बांधकाम व नियोजन सभापती अतुल गण्यारपवार, ज्येष्ठ ओबीसी नेते अरूण मुनघाटे, नगरसेवक विजय गोरडवार, जगदीश म्हस्के, दादाजी चापले, काँग्रेसचे नेते पंकज गुड्डेवार, राजेश नाथानी, नगरसेवक संध्या उईके, राकेश गणवीर, रमेश भुरसे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत वाघरे आदींनी केले.भारतीय कृषी अनुसंधान संस्थेचे माजी संचालक व आंतरराष्ट्रीय किर्तीचे कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारने १८ नोव्हेंबर २००४ रोजी राष्ट्रीय कृषी आयोगाची स्थापना केली. या आयोगाने डिसेंबर २००४, आॅगस्ट २००५, डिसेंबर २००५ व एप्रिल २००६ मध्ये चार अहवाल सादर केले. पाचवा आणि शेवटचा अहवाल ४ आॅक्टोबर २००६ रोजी सादर केला. या अहवालामध्ये शेतकऱ्यांच्या दुरवस्थेविषयी विविध कारणे तसेच अवस्था सुधारण्यासाठी उपाययोजना सूचविण्यात आल्या. त्याच दिवशी ५ आॅक्टोबर २००६ ला केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सहावा वेतन आयोगाची स्थापना केली. २४ मार्च २००८ रोजी शिफारशी सादर झाल्या. २९ आॅगस्ट २००८ ला सहावा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा करण्यात आली. पुढची पायरी म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांकडून मागणी नसतानाही अडीच वर्ष आधीच सातवा वेतन आयोग जाहीर करून त्याच्या पगारात किमान ५० टक्क्यांनी वाढ करण्याचा घाट सरकारने घातला आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढत असताना स्वामीनाथन आयोगाचा अहवाल मागील ९ वर्षांपासून दडपून ठेवण्यात आला आहे.दुसरीकडे कर्मचाऱ्यांची मागणी नसतानाही त्यांना सातवा वेतन आयोग देण्याची तयारी राज्य सरकारने चालविली आहे. हा प्रचंड विरोधाभास असून शेतकऱ्यासाठी स्वामीनाथन आयोग लागू केला पाहिजे, अशी मागणी करणारे निवेदन जनमंचाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठविण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)