शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

पशुधन घटल्याने जनावरांविना उरले कोंडवाडे

By admin | Updated: March 26, 2015 01:33 IST

मोकाट जनावरे गाव शिवारातील शेतीमधील पिकांची नासाडी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक हानी सहन करावी लागते.

गडचिरोली : मोकाट जनावरे गाव शिवारातील शेतीमधील पिकांची नासाडी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक हानी सहन करावी लागते. ही समस्या दूर करण्यासाठी पूर्वी गावागावांत ग्रामपंचायतीअंतर्गत कोंडवाड्यांची निर्मिती करण्यात आली होती. मात्र आता गावागावातील पशुधन कमी होत असल्याने गावात उभारण्यात आलेल्या कोंडवाड्याच्या इमारती आता ओस पडल्या आहेत. पूर्वी ग्रामीण भागात शेतीसोबतच पशुपालन व्यवसाय केला जात होता. शेतीतीतच चाऱ्याची निर्मिती होत असल्याने पशुपालनालाही भरभराटीचे दिवस होते. गावातच खंडीने जनावरे राहत होते. गाव गोहण (गावातील सर्व जनावरे एकत्र करून ते चरण्यासाठी जंगलात नेणे) राहत होते. अनेकदा ही जनावरे पिकांचे नुकसान करीत त्यामुळे अशा जनावरांना कोंडण्यासाठी ग्रामपंचायतमार्फत कोंडवाडे उभारण्यात आले आहे. याच्या प्रशस्त इमारती अजुनही गावांमध्ये आहे. गडचिरोली जिल्ह्यात ५० ते ६० गावांमध्ये आजही या इमारती उभ्या आहेत. पिकांची नासधूस करणाऱ्या पशूंना कोंडवाड्यात कोंडल्यावर मालकांना दंड ठोठावण्यात येत असे़ याचा ग्रामपंचायतीला सुद्धा आर्थिक फायदा होत होता. वार्षिक उत्पन्नात यामुळे भर पडत होती. सध्या पशुपालन व्यवसायासोबतच गावोगावच्या कोंडवाड्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. काही गावात केवळ फलकच राहिले आहेत. तर काही कोंडवाडे शिल्लक असून तेथे कोणतेही जनावर वर्षभरात कोंडलेही जात नाही. नासधूस करणाऱ्या प्राण्यांना कोंडवाड्यात कोंडल्यावर येणाऱ्या खर्चाचा काही भाग पशुचारा म्हणून ग्रामपंचायतीला मिळत असे. सध्या या कोंडवाड्याची अवस्था दयनीय झाली आहे. (प्रतिनिधी)