शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

नावेने धोकादायक प्रवास सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 00:47 IST

तेलंगणा राज्याच्या चिनूर व मंचेरियालकडे जाण्यासाठी सिरोंचा तालुक्यातील अनेक नागरिक शॉर्टकट व सोयीचा मार्ग म्हणून प्राणहिता नदीपात्रातून नावेने प्रवास करतात. पावसाळ्यातही असा धोकादायक प्रवास होत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देअनेक जीव गेले : प्राणहिता नदीवर पूल होऊनही नावेने केला जात आहे प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तेलंगणा राज्याच्या चिनूर व मंचेरियालकडे जाण्यासाठी सिरोंचा तालुक्यातील अनेक नागरिक शॉर्टकट व सोयीचा मार्ग म्हणून प्राणहिता नदीपात्रातून नावेने प्रवास करतात. पावसाळ्यातही असा धोकादायक प्रवास होत असल्याचे दिसून येत आहे.महाराष्टÑ व तेलंगणा या दोन राज्यांना जोडणारा मोठा पूल गोदावरी नदीवर बांधण्यात आला व या पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. महाराष्टÑ व तेलंगणा या दोन्ही राज्याच्या बसगाड्या गोदावरी नदीच्या पुलावरून आवागमन करीत आहेत. उन्हाळा व हिवाळ्यात सिरोंचा-कालेश्वर-पलगुला नजीक गोदावरी नदीपात्रात कच्चा रस्ता होता. त्यावेळी तेलंगणातील चिन्नूर, मंचेरियलकडे लोक बसने जात असायचे. मात्र आता पावसाळ्यात नदी दुथळी भरून वाहत असल्याने येथून रस्ता राहत नाही. त्यामुळे पावसाळ्यात बसने जायचे असेल तर महादेवपूरवरून बसने मंचेरियलकडे जाता येते. मात्र हा ६० किमीचा फेरा होतो. या मार्गे प्रवास केल्यास तिकीटापोटी प्रवाशांवर आर्थिक भूर्दंडही पडत असते. त्यामुळे बरेच नागरिक बसच्या मार्गाने न जाता सिरोंचाजवळील प्राणहिता नदीपात्रातून नावेने प्रवास करतात. तेलंगणाच्या सिमेवरील अर्जुनगट्टा गावातून तेलंगणाच्या बसने पुढे अनेक लोक जातात. सिरोंचा-चेन्नूर हे ३० किमीचे अंतर आहे. तसेच चेन्नूर ते मंचेरियल हे ३५ किमीचे अंतर आहे.सिरोंचा - चेन्नूरदरम्यान रापनपेल्ली, बक्कलचेलका, देवलाडा, रामपूर, पारपेल्ली, येरोपपेट्टा, चिंतलपल्ली आदी गावे पडतात. या सर्व गावातील रहिवासी नागरिक नावेचा प्रवास करून सिरोंचा मुख्यालयी पोहोचतात. प्राणहिता नदीवर धर्मपुरी गावाजवळ निर्माणाधिन पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर प्रवाशांना नावेचा प्रवास पूर्णत: बंद होणार आहे.सध्या सिरोंचावरून मंचेरियलला बसने जायचे असल्यास सिरोंचा-कालेश्वर-महादेवपूर, काठाराम, मंचनी, गोदावरी, खनी येथून मंचेरियलला पोहोचता येते. मात्र या मार्गे ६० किलोमीटर अंतराचा अधिकचा फेरा मारावा लागतो. सदर मार्गे प्रवास केल्यास एकूण १२५ किमीचे अंतर गाठावे लागते. सिरोंचा नजीकच्या प्राणहिता नदीवरून अर्जूनगुट्टावरून बसने ६५ किमीचे अंतर गाठावे लागते. सदर अधिकचे अंतर कापणे आर्थिकदृष्ट्या या भागातील नागरिकांना परवडत नसल्याने सिरोंचा तालुक्यातील व सिरोंचा पलीकडचे तेलंगणा राज्यातील अनेक लोक नदीपात्रातून नावेने प्रवास करतात.