शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

पूल बांधकामाचा दर्जा सुमार

By admin | Updated: May 24, 2017 00:34 IST

आरमोरी तालुक्यातील शंकरनगर-सालमारा मार्गावरील मोठ्या नाल्यावर सिमेंट काँक्रिटचे पूल बांधकाम झाले आहे. या पूल बांधकामात सिमेंटच्या पायल्या लावण्यात आल्या.

शंकरनगर-सालमारा मार्ग : पावसाळ्यात नाल्याचे पाणी शंकरनगरात शिरणारलोकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील शंकरनगर-सालमारा मार्गावरील मोठ्या नाल्यावर सिमेंट काँक्रिटचे पूल बांधकाम झाले आहे. या पूल बांधकामात सिमेंटच्या पायल्या लावण्यात आल्या. मात्र बांधकामाचा दर्जा सुमार असल्याने पावसाळ्यात या नाल्याचे पाणी पायलीतून न जाता शंकरनगर गावात शिरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शंकरनगरलगत असलेल्या सालमारा मार्गावरील मोठ्या नाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग आरमोरी या यंत्रणेमार्फत लाखो रूपये खर्च करून सिमेंट पायल्यांच्या सहाय्याने पूल बांधकाम करण्यात आले. नाल्याची खोली व पाण्याचा प्रवाह किती असते, याचा कुठलाही अंदाज न घेता हे काम आटोपून घेण्यात आले. पूल बांधकामापूर्वी येथे कुठल्याही प्रकारचे सर्वेक्षण करण्यात आले नाही. पूल बांधकामादरम्यान साईडवॉलसाठी निकृष्ट दर्जाची गिट्टी वापरण्यात आली. तसेच माती मिश्रीत रेतीचा वापर करून सिमेंट कमी प्रमाणात वापरण्यात आला. सिमेंट काँक्रिटचे बेड तयार न करता, माती टाकून त्यावर सिमेंट पायल्या बसविण्यात आल्या. पायल्यांवर माती टाकून सिमेंट काँक्रिटचे काम थातूर-मातूर करण्यात आले. सदर काम सुरू असताना एकदाही संबंधित अभियंत्यांनी प्रत्यक्ष भेट दिली नाही. त्यामुळे कंत्राटदाराने आपल्या मनमर्जीने कमी पैशात सदर पुलाचे बांधकाम पूर्ण करून घेतले. या ठिकाणी तयार करण्यात आलेला पूल आहे की रपटा हे स्पष्ट सांगण्यास कुणीही तयार नाही.तात्पुरती व्यवस्था झाली असली तरी नाल्याचे संपूर्ण पाणी या पायल्यांतून जाण्याची शक्यता कमी आहे. वाढीव पाणी गावात जाऊ शकते. शिक्षण घेणाऱ्या मुला- मुलींना पावसाळ्यात या पुलामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे काम करणाऱ्या अभियंता व कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शंकरनगर येथील नागरिकांनी केली आहे. शंकरपूर- सालमारा नाल्यावरील पुलाच्या बांधकामाने शंकरनगर येथील शेतजमिन पाण्याखाली येणार याची १०० टक्के शाश्वती आहे. सदर बांधकाम संबंधित गावाच्या कोणत्याच पदाधिकाऱ्याला विश्वासात न घेता तसेच खरी अडचण लक्षात घेऊन संबंधित कंत्राटदार यांच्या उदरनिर्वाहासाठी शासनाने करून घेतले असून हे काम निकृष्ट दर्जाचे आहे.- सुजित मिस्त्री, सरपंच, शंकरनगर.