शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

सात वर्षांपासून नालीतील गाळ उपशाला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:00 IST

रस्त्याच्या कडेने सांडपाणी वाहत असल्याने रस्ता ओलांडतांना नागरिकांना त्रास होत आहे. ग्राम पंचायततर्फे दरवर्षी नालीतील गाळाचा उपसा करणे आवश्यक आहे. परंतु तीन ते चार वर्षानंतर उपसा केला जातो. मात्र पोलीस कॉलनीतील गाळाचा उपसा सात वर्षापासून झाला नाही. पावसाळा सुरू होण्यापूर्वी गाळाचा उपसा करणे आवश्यक होते.

ठळक मुद्देराजाराम येथील प्रकार : तुंबल्याने सांडपाणी वाहते रस्त्यावर; रोगराई पसरण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : अहेरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या राजाराम येथील पोलीस कॉलनीमधील नाल्यांमधील गाळाचा उपसा गेल्या सहा ते सात वर्षांपासून न झाल्याने नाल्या गाळाने तुंबल्या आहेत. परिणामी सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. परंतु या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.राजाराम येथील पोलीस कॉलनीमध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पाहावयास मिळते. पावसाळा सुरू झाला असल्याने दुर्गंधीही वाढली. बहुतांश नाल्यांमध्ये प्लास्टिक बॉटल्स, कॅरिबॅग, काडीकचरा, दगड भरून आहेत. त्यामुळे सांडपाणी वाहत जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. रस्त्याच्या कडेने सांडपाणी वाहत असल्याने रस्ता ओलांडतांना नागरिकांना त्रास होत आहे. ग्राम पंचायततर्फे दरवर्षी नालीतील गाळाचा उपसा करणे आवश्यक आहे. परंतु तीन ते चार वर्षानंतर उपसा केला जातो. मात्र पोलीस कॉलनीतील गाळाचा उपसा सात वर्षापासून झाला नाही. पावसाळा सुरू होण्यापूर्वी गाळाचा उपसा करणे आवश्यक होते. परंतु याकडे ग्राम पंचायतीने दुर्लक्ष केल्याने उपसा झाला नाही. केंद्र व राज्य शासनातर्फे दरवर्षी स्वच्छता व आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जागृती केली जाते. यासाठी विशेष निधीही दिला जातो. अनेक ग्राम पंचायती वर्षभर स्वच्छता मोहीम राबवितात. परंतु राजाराम ग्रा. पं. याकडे दुर्लक्ष करीत आहे.ग्राम पंचायतीला कुलूप ठोकण्याचा इशाराराजाराम ग्राम पंचायत अंतर्गत गावातील नाल्यांमधील गाळाचा उपसा दरवर्षी केला जात नाही. संपूर्ण गावातील गाळाचा उपसा तीन ते चार वर्षानंतर केला जातो. पोलीस कॉलनीतील गाळ उपसा सात वर्षापासून झाला नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. सचिव व प्रशासक गाळाचा उपसा करण्याकडे कानाडोळा करीत आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने दुर्गंधीमुळे आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे वारंवार सूचना देऊनही ग्राम पंचायतीला जाग आली नाही. त्यामुळे येत्या दहा दिवसांत नाल्यांमधील गाळाचा उपसा करून त्याची विल्हेवाट न लावल्यास ग्राम पंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा राजाराम वासीयांनी दिला आहे.राजाराम ग्राम पंचायतीने नाल्यांमधील गाळा उपसा करण्याकडे दुर्लक्ष केले. मात्र मार्च महिन्यापासून सरपंच पद रिक्त झाल्यानंतर पं. स. च्या विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नेमणूक झाली. ग्राम सचिव व प्रशासक यांना गाळ उपसा करण्याबाबत सूचना दिली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत गाळ उपशाचे काम सुरू होईल.- भास्कर तलांडे, सभापतीपं. स. अहेरी

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण