शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षांपासून नालीतील गाळ उपशाला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:00 IST

रस्त्याच्या कडेने सांडपाणी वाहत असल्याने रस्ता ओलांडतांना नागरिकांना त्रास होत आहे. ग्राम पंचायततर्फे दरवर्षी नालीतील गाळाचा उपसा करणे आवश्यक आहे. परंतु तीन ते चार वर्षानंतर उपसा केला जातो. मात्र पोलीस कॉलनीतील गाळाचा उपसा सात वर्षापासून झाला नाही. पावसाळा सुरू होण्यापूर्वी गाळाचा उपसा करणे आवश्यक होते.

ठळक मुद्देराजाराम येथील प्रकार : तुंबल्याने सांडपाणी वाहते रस्त्यावर; रोगराई पसरण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : अहेरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या राजाराम येथील पोलीस कॉलनीमधील नाल्यांमधील गाळाचा उपसा गेल्या सहा ते सात वर्षांपासून न झाल्याने नाल्या गाळाने तुंबल्या आहेत. परिणामी सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. परंतु या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.राजाराम येथील पोलीस कॉलनीमध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पाहावयास मिळते. पावसाळा सुरू झाला असल्याने दुर्गंधीही वाढली. बहुतांश नाल्यांमध्ये प्लास्टिक बॉटल्स, कॅरिबॅग, काडीकचरा, दगड भरून आहेत. त्यामुळे सांडपाणी वाहत जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. रस्त्याच्या कडेने सांडपाणी वाहत असल्याने रस्ता ओलांडतांना नागरिकांना त्रास होत आहे. ग्राम पंचायततर्फे दरवर्षी नालीतील गाळाचा उपसा करणे आवश्यक आहे. परंतु तीन ते चार वर्षानंतर उपसा केला जातो. मात्र पोलीस कॉलनीतील गाळाचा उपसा सात वर्षापासून झाला नाही. पावसाळा सुरू होण्यापूर्वी गाळाचा उपसा करणे आवश्यक होते. परंतु याकडे ग्राम पंचायतीने दुर्लक्ष केल्याने उपसा झाला नाही. केंद्र व राज्य शासनातर्फे दरवर्षी स्वच्छता व आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जागृती केली जाते. यासाठी विशेष निधीही दिला जातो. अनेक ग्राम पंचायती वर्षभर स्वच्छता मोहीम राबवितात. परंतु राजाराम ग्रा. पं. याकडे दुर्लक्ष करीत आहे.ग्राम पंचायतीला कुलूप ठोकण्याचा इशाराराजाराम ग्राम पंचायत अंतर्गत गावातील नाल्यांमधील गाळाचा उपसा दरवर्षी केला जात नाही. संपूर्ण गावातील गाळाचा उपसा तीन ते चार वर्षानंतर केला जातो. पोलीस कॉलनीतील गाळ उपसा सात वर्षापासून झाला नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. सचिव व प्रशासक गाळाचा उपसा करण्याकडे कानाडोळा करीत आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने दुर्गंधीमुळे आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे वारंवार सूचना देऊनही ग्राम पंचायतीला जाग आली नाही. त्यामुळे येत्या दहा दिवसांत नाल्यांमधील गाळाचा उपसा करून त्याची विल्हेवाट न लावल्यास ग्राम पंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा राजाराम वासीयांनी दिला आहे.राजाराम ग्राम पंचायतीने नाल्यांमधील गाळा उपसा करण्याकडे दुर्लक्ष केले. मात्र मार्च महिन्यापासून सरपंच पद रिक्त झाल्यानंतर पं. स. च्या विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नेमणूक झाली. ग्राम सचिव व प्रशासक यांना गाळ उपसा करण्याबाबत सूचना दिली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत गाळ उपशाचे काम सुरू होईल.- भास्कर तलांडे, सभापतीपं. स. अहेरी

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण