शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

नाली उपसा बंद

By admin | Updated: April 3, 2015 01:17 IST

२०१४-१५ या वर्षात नाली उपसा करण्याच्या कंत्राटाची मुदत १ एप्रिल रोजी संपूनही नगर परिषदेने दुसऱ्या

गडचिरोली : २०१४-१५ या वर्षात नाली उपसा करण्याच्या कंत्राटाची मुदत १ एप्रिल रोजी संपूनही नगर परिषदेने दुसऱ्या कंत्राटदाराची नेमणूक करण्यास विलंब लावला आहे. नवीन कंत्राटदारांची नेमणूक होण्यात आणखी किमान १५ दिवसांचा कालावधी लागणार असून तेव्हापर्यंत शहरातील नाल्या उपसणे बंद राहणार आहे. परिणामी शहरातील नाल्या तुंबून अस्वच्छतेची प्रचंड समस्या शहरात निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संपूर्ण शहरात १४१.४० किमी लांबीच्या नाल्या बांधण्यात आल्या आहेत. शहरातील सांडपाण्याचा निचरा करण्याचे महत्त्वाचे काम नाल्यांच्या मार्फतीने केले जाते. त्यामुळे या नाल्यांचा वेळोवेळी उपसा होणे अत्यंत गरजेचे आहे. नगर परिषदेने मागील काही वर्षांपासून नाली उपसण्याचे कंत्राट देण्याचे धोरण अवलंबिले आहे. मागील वर्षी नाली उपसण्याचा कंत्राट ७२ लाख रूपयाने देण्यात आले होते. या निधीतून कंत्राटदाराने ६० मजुरांची नेमणूक केली होती. या मजुरांच्यामार्फतीने शहरातील नाली उपसण्याचे काम केले जात होते. सदर कंत्राट केवळ एका वर्षासाठी देण्यात आला होता व या कंत्राटाची मुदत १ एप्रिल रोजी समाप्त झाली. ही बाब नगर परिषद प्रशासनाला माहीत होती. त्यामुळे महिनाभरापूर्वी कामाच्या निविदा काढून १ एप्रिलपूर्वीच दुसरा कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होते. मात्र ही प्रक्रिया अजूनही पूर्ण झाली नाही. नगर परिषदेच्यामार्फतीने फेरनिविदा काढण्यात आल्या आहेत. फेरनिविदेमध्ये कंत्राटदार मिळाल्यास प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यास आणखी १५ ते २० दिवसांचा विलंब लागणार आहे. तोपर्यंत नाली उपसण्याचे काम थांबणार असल्याने शहरात प्रचंड कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होण्याची शक्यता आहे. ६० मजूर काम करीत असतानाही काही वार्डातील नाल्या तुंबल्या असल्याची ओरड होत होती. २० दिवस नाली उपसा ठप्प राहणार असल्याने संपूर्ण नाल्या कचऱ्याने तुंबून आरोग्याची समस्या गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (नगर प्रतिनिधी)आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर१५ ते २० दिवस नालीचा उपसा न झाल्यास शहरातील संपूर्ण नाल्या कचऱ्याने तुडूंब भरणार आहेत. परिणामी सांडपाण्यासह वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन नालीमध्येच पाण्याचे डबके निर्माण होणार आहेत. या पाण्यात डासांची पैदास वाढल्याने आरोग्याची गंभीर समस्या निर्माण होणार आहे. काही नाल्यांमधील सांडपाणी नागरिकांच्या दारावरही येण्याची शक्यता आहे.