शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

नाली उपसा बंद

By admin | Updated: April 3, 2015 01:17 IST

२०१४-१५ या वर्षात नाली उपसा करण्याच्या कंत्राटाची मुदत १ एप्रिल रोजी संपूनही नगर परिषदेने दुसऱ्या

गडचिरोली : २०१४-१५ या वर्षात नाली उपसा करण्याच्या कंत्राटाची मुदत १ एप्रिल रोजी संपूनही नगर परिषदेने दुसऱ्या कंत्राटदाराची नेमणूक करण्यास विलंब लावला आहे. नवीन कंत्राटदारांची नेमणूक होण्यात आणखी किमान १५ दिवसांचा कालावधी लागणार असून तेव्हापर्यंत शहरातील नाल्या उपसणे बंद राहणार आहे. परिणामी शहरातील नाल्या तुंबून अस्वच्छतेची प्रचंड समस्या शहरात निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संपूर्ण शहरात १४१.४० किमी लांबीच्या नाल्या बांधण्यात आल्या आहेत. शहरातील सांडपाण्याचा निचरा करण्याचे महत्त्वाचे काम नाल्यांच्या मार्फतीने केले जाते. त्यामुळे या नाल्यांचा वेळोवेळी उपसा होणे अत्यंत गरजेचे आहे. नगर परिषदेने मागील काही वर्षांपासून नाली उपसण्याचे कंत्राट देण्याचे धोरण अवलंबिले आहे. मागील वर्षी नाली उपसण्याचा कंत्राट ७२ लाख रूपयाने देण्यात आले होते. या निधीतून कंत्राटदाराने ६० मजुरांची नेमणूक केली होती. या मजुरांच्यामार्फतीने शहरातील नाली उपसण्याचे काम केले जात होते. सदर कंत्राट केवळ एका वर्षासाठी देण्यात आला होता व या कंत्राटाची मुदत १ एप्रिल रोजी समाप्त झाली. ही बाब नगर परिषद प्रशासनाला माहीत होती. त्यामुळे महिनाभरापूर्वी कामाच्या निविदा काढून १ एप्रिलपूर्वीच दुसरा कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होते. मात्र ही प्रक्रिया अजूनही पूर्ण झाली नाही. नगर परिषदेच्यामार्फतीने फेरनिविदा काढण्यात आल्या आहेत. फेरनिविदेमध्ये कंत्राटदार मिळाल्यास प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यास आणखी १५ ते २० दिवसांचा विलंब लागणार आहे. तोपर्यंत नाली उपसण्याचे काम थांबणार असल्याने शहरात प्रचंड कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होण्याची शक्यता आहे. ६० मजूर काम करीत असतानाही काही वार्डातील नाल्या तुंबल्या असल्याची ओरड होत होती. २० दिवस नाली उपसा ठप्प राहणार असल्याने संपूर्ण नाल्या कचऱ्याने तुंबून आरोग्याची समस्या गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (नगर प्रतिनिधी)आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर१५ ते २० दिवस नालीचा उपसा न झाल्यास शहरातील संपूर्ण नाल्या कचऱ्याने तुडूंब भरणार आहेत. परिणामी सांडपाण्यासह वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन नालीमध्येच पाण्याचे डबके निर्माण होणार आहेत. या पाण्यात डासांची पैदास वाढल्याने आरोग्याची गंभीर समस्या निर्माण होणार आहे. काही नाल्यांमधील सांडपाणी नागरिकांच्या दारावरही येण्याची शक्यता आहे.