शहरं
Join us  
Trending Stories
1
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
2
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
3
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
4
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
5
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्य तयार
6
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
7
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
8
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
9
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
10
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
11
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
12
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
13
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
14
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
15
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
16
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
17
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
18
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
19
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
20
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी

नाली उपसा बंद

By admin | Updated: April 3, 2015 01:17 IST

२०१४-१५ या वर्षात नाली उपसा करण्याच्या कंत्राटाची मुदत १ एप्रिल रोजी संपूनही नगर परिषदेने दुसऱ्या

गडचिरोली : २०१४-१५ या वर्षात नाली उपसा करण्याच्या कंत्राटाची मुदत १ एप्रिल रोजी संपूनही नगर परिषदेने दुसऱ्या कंत्राटदाराची नेमणूक करण्यास विलंब लावला आहे. नवीन कंत्राटदारांची नेमणूक होण्यात आणखी किमान १५ दिवसांचा कालावधी लागणार असून तेव्हापर्यंत शहरातील नाल्या उपसणे बंद राहणार आहे. परिणामी शहरातील नाल्या तुंबून अस्वच्छतेची प्रचंड समस्या शहरात निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संपूर्ण शहरात १४१.४० किमी लांबीच्या नाल्या बांधण्यात आल्या आहेत. शहरातील सांडपाण्याचा निचरा करण्याचे महत्त्वाचे काम नाल्यांच्या मार्फतीने केले जाते. त्यामुळे या नाल्यांचा वेळोवेळी उपसा होणे अत्यंत गरजेचे आहे. नगर परिषदेने मागील काही वर्षांपासून नाली उपसण्याचे कंत्राट देण्याचे धोरण अवलंबिले आहे. मागील वर्षी नाली उपसण्याचा कंत्राट ७२ लाख रूपयाने देण्यात आले होते. या निधीतून कंत्राटदाराने ६० मजुरांची नेमणूक केली होती. या मजुरांच्यामार्फतीने शहरातील नाली उपसण्याचे काम केले जात होते. सदर कंत्राट केवळ एका वर्षासाठी देण्यात आला होता व या कंत्राटाची मुदत १ एप्रिल रोजी समाप्त झाली. ही बाब नगर परिषद प्रशासनाला माहीत होती. त्यामुळे महिनाभरापूर्वी कामाच्या निविदा काढून १ एप्रिलपूर्वीच दुसरा कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होते. मात्र ही प्रक्रिया अजूनही पूर्ण झाली नाही. नगर परिषदेच्यामार्फतीने फेरनिविदा काढण्यात आल्या आहेत. फेरनिविदेमध्ये कंत्राटदार मिळाल्यास प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यास आणखी १५ ते २० दिवसांचा विलंब लागणार आहे. तोपर्यंत नाली उपसण्याचे काम थांबणार असल्याने शहरात प्रचंड कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होण्याची शक्यता आहे. ६० मजूर काम करीत असतानाही काही वार्डातील नाल्या तुंबल्या असल्याची ओरड होत होती. २० दिवस नाली उपसा ठप्प राहणार असल्याने संपूर्ण नाल्या कचऱ्याने तुंबून आरोग्याची समस्या गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (नगर प्रतिनिधी)आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर१५ ते २० दिवस नालीचा उपसा न झाल्यास शहरातील संपूर्ण नाल्या कचऱ्याने तुडूंब भरणार आहेत. परिणामी सांडपाण्यासह वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन नालीमध्येच पाण्याचे डबके निर्माण होणार आहेत. या पाण्यात डासांची पैदास वाढल्याने आरोग्याची गंभीर समस्या निर्माण होणार आहे. काही नाल्यांमधील सांडपाणी नागरिकांच्या दारावरही येण्याची शक्यता आहे.