शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

४५ ग्रामपंचायतींत राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पॅनलचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:37 IST

अहेरी : यंदाच्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलने एकहाती सत्ता मिळविली ...

अहेरी : यंदाच्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलने एकहाती सत्ता मिळविली आहे, असा दावा राष्ट्रीय कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी केला आहे. सहा ठिकाणच्या ग्रामपंचायतींत अटीतटीची परिस्थिती असली तरी, राष्ट्रवादी काँग्रेस पॅनल घोडदौड करणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

आमदार धर्मरावबाबा अत्राम यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते ऋतुराज हलगेकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी परिश्रम करून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यश मिळविले.

अहेरी तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींपैकी १२ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलने झेंडा फडकाविला असून आलापल्ली व नागेपल्ली ग्रामपंचायतीत अटीतटीची परिस्थिती निर्माण झाली असून, या दाेन्ही ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचेचे नागेपल्ली ग्रामपंचायतीत अटीतटीचे सावट असून या दोन्ही ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच पारडे जड दिसत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसे झाल्यास अहेरी तालुक्यात १६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कब्जा असणार आहे.

सिरोंचा तालुक्यात २७ ग्रामपंचायतींपैकी १३ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलने निर्विवाद सत्ता प्राप्त केली असून, दोन ठिकाणच्या ग्रामपंचायतींमध्ये अटीतटीची परिस्थिती आहे.

भामरागड तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींची निवडणूक होती. या दोन्ही ठिकाणांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकहाती सत्ता मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा रोवला आहे. दुसऱ्या कोणत्याही पक्षाला सत्तेत बसण्यासाठी साधे खाते उघडू दिले नाही, हे येथे उल्लेखनीय आहे.

मूलचेरा तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींपैकी नऊ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलने सत्ता मिळविली असून एका ठिकाणी अटीतटीची परिस्थिती आहे.

एटापल्ली तालुक्यात एकूण १४ ग्रामपंचायतींपैकी नऊ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पॅनेलने वर्चस्व मिळविले आहे.

अहेरी विधानसभा क्षेत्रात ८५ ग्रामपंचायतींपैकी ४५ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकहाती वर्चस्व मिळविले आहे. सहा ग्रामपंचायतींच्या ठिकाणी अटीतटीची परिस्थिती असली तरी या ग्रामपंचायतींवरही राष्ट्रीय कॉग्रेेस आपला झेंडा फडकवेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.