शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

४५ ग्रामपंचायतींत राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पॅनलचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:37 IST

अहेरी : यंदाच्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलने एकहाती सत्ता मिळविली ...

अहेरी : यंदाच्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलने एकहाती सत्ता मिळविली आहे, असा दावा राष्ट्रीय कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी केला आहे. सहा ठिकाणच्या ग्रामपंचायतींत अटीतटीची परिस्थिती असली तरी, राष्ट्रवादी काँग्रेस पॅनल घोडदौड करणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

आमदार धर्मरावबाबा अत्राम यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते ऋतुराज हलगेकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी परिश्रम करून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यश मिळविले.

अहेरी तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींपैकी १२ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलने झेंडा फडकाविला असून आलापल्ली व नागेपल्ली ग्रामपंचायतीत अटीतटीची परिस्थिती निर्माण झाली असून, या दाेन्ही ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचेचे नागेपल्ली ग्रामपंचायतीत अटीतटीचे सावट असून या दोन्ही ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच पारडे जड दिसत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसे झाल्यास अहेरी तालुक्यात १६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कब्जा असणार आहे.

सिरोंचा तालुक्यात २७ ग्रामपंचायतींपैकी १३ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलने निर्विवाद सत्ता प्राप्त केली असून, दोन ठिकाणच्या ग्रामपंचायतींमध्ये अटीतटीची परिस्थिती आहे.

भामरागड तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींची निवडणूक होती. या दोन्ही ठिकाणांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकहाती सत्ता मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा रोवला आहे. दुसऱ्या कोणत्याही पक्षाला सत्तेत बसण्यासाठी साधे खाते उघडू दिले नाही, हे येथे उल्लेखनीय आहे.

मूलचेरा तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींपैकी नऊ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलने सत्ता मिळविली असून एका ठिकाणी अटीतटीची परिस्थिती आहे.

एटापल्ली तालुक्यात एकूण १४ ग्रामपंचायतींपैकी नऊ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पॅनेलने वर्चस्व मिळविले आहे.

अहेरी विधानसभा क्षेत्रात ८५ ग्रामपंचायतींपैकी ४५ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकहाती वर्चस्व मिळविले आहे. सहा ग्रामपंचायतींच्या ठिकाणी अटीतटीची परिस्थिती असली तरी या ग्रामपंचायतींवरही राष्ट्रीय कॉग्रेेस आपला झेंडा फडकवेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.