शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
4
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
5
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
6
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
7
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
8
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
9
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
10
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
11
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
12
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
13
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
14
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
15
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
16
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
17
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
18
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
19
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
20
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश

पाणीपुरी खाताय की टायफाॅइडला निमंत्रण देताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:37 IST

गडचिराेली : पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर टायफॉइड हा आजार होतो. या आजाराचा प्रसार दूषित अन्न किंवा पाण्यामुळे होतो. अस्वच्छ वातावरणात ...

गडचिराेली : पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर टायफॉइड हा आजार होतो. या आजाराचा प्रसार दूषित अन्न किंवा पाण्यामुळे होतो. अस्वच्छ वातावरणात एस. टायफी हा जीवाणू विकसित होतो आणि उघड्या अन्नाला किंवा पाण्याला तो दूषित करतो. दूषित अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे किंवा पाणी प्यायल्यामुळे जीवाणूचा प्रादुर्भाव होऊन टायफॉइडची लागण होते. त्यामुळे पावसाच्या दिवसामध्ये उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. विशेषत: पाणीपुरी खाताना त्यात वापरणारे पाणी, स्वच्छता यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

टायफाॅइड हा आजार साल्माेनेला टायफी या जीवाणूपासून हाेताे. सदर जीवाणू (बॅक्टेरिया) टायफाॅइड झालेल्या रुग्णांच्या रक्तात आणि आतड्यांमध्ये असताे. टायफाॅइड तापाला विषमज्वर असेही म्हणतात. टायफाॅइड रुग्ण तसेच टायफाॅइड आजारातून नुकतेच बरे झालेले व्यक्ती यांच्या मलमूत्राद्वारे हे जीवाणू पसरत असतात.

बाॅक्स...

जिल्हा फणफणतोय

मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्यामुळे त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये नागरिकांना ताप, सर्दी, डोकेदुखीसारखे आजार होत आहेत. त्यामुळे खासगी तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे.

बाॅक्स....

आजाराची लक्षणे

ताप येतो. तो कमी-अधिक होतो. काहींना उलट्या किंवा जुलाबही होतात. पोट दुखणे, खोकला, अतिसार, डाेकेदुखी, अंगदुखी, थकवा येताे, अशक्तपणा वाढते, भूक मंदावते आदी लक्षणे टायफाॅइड या आजारावर दिसत असतात. अशी लक्षणे दिसताच वेळीच डाॅक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.

बाॅक्स...

ही घ्या काळजी

अस्वच्छ वातावरणातील अन्नपदार्थांचे सेवन करू नये.

कुठलेही पाणी पिणे टाळावे. अन्नपदार्थ गरम करून खावेत.

दिवसातून तीनवेळा जेवण करावे.

घरामध्ये अन्न झाकून ठेवावे.

पाणी उकळून थंड करून प्यावे.

पावसाळ्यात कच्च्या भाज्या, जास्त पिकलेली फळे खाऊ नये.

नारळपाणी, ज्युस, लस्सी, ग्लुकोज पाणी आदी पदार्थ घ्यावे.

बाॅक्स...

टायफाॅइड आजार हाेण्याची कारणे

पावसाळ्यातील दूषित पाण्याच्या संपर्कातून टायफाॅइड आजाराची लागण हाेण्याची शक्यता अधिक असते. मलमूत्राद्वारे दूषित पाण्यातून, माशा बसलेल्या अन्नातून, अस्वच्छ हातांद्वारे हे जीवाणू निराेगी व्यक्तींच्या ताेंडातून शरीरात प्रवेश करतात. आतड्यात जाऊन त्या विषाणूंची संख्या वाढते. त्यानंतर जीवाणू आपला विषारी प्रभाव दाखवू लागतात. त्यामुळे फूड पॉयझनिंग झाले असता, मळमळ वाटते, उलट्या हाेतात.