शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरी खाताय की टायफाॅइडला निमंत्रण देताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:37 IST

गडचिराेली : पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर टायफॉइड हा आजार होतो. या आजाराचा प्रसार दूषित अन्न किंवा पाण्यामुळे होतो. अस्वच्छ वातावरणात ...

गडचिराेली : पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर टायफॉइड हा आजार होतो. या आजाराचा प्रसार दूषित अन्न किंवा पाण्यामुळे होतो. अस्वच्छ वातावरणात एस. टायफी हा जीवाणू विकसित होतो आणि उघड्या अन्नाला किंवा पाण्याला तो दूषित करतो. दूषित अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे किंवा पाणी प्यायल्यामुळे जीवाणूचा प्रादुर्भाव होऊन टायफॉइडची लागण होते. त्यामुळे पावसाच्या दिवसामध्ये उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. विशेषत: पाणीपुरी खाताना त्यात वापरणारे पाणी, स्वच्छता यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

टायफाॅइड हा आजार साल्माेनेला टायफी या जीवाणूपासून हाेताे. सदर जीवाणू (बॅक्टेरिया) टायफाॅइड झालेल्या रुग्णांच्या रक्तात आणि आतड्यांमध्ये असताे. टायफाॅइड तापाला विषमज्वर असेही म्हणतात. टायफाॅइड रुग्ण तसेच टायफाॅइड आजारातून नुकतेच बरे झालेले व्यक्ती यांच्या मलमूत्राद्वारे हे जीवाणू पसरत असतात.

बाॅक्स...

जिल्हा फणफणतोय

मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्यामुळे त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये नागरिकांना ताप, सर्दी, डोकेदुखीसारखे आजार होत आहेत. त्यामुळे खासगी तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे.

बाॅक्स....

आजाराची लक्षणे

ताप येतो. तो कमी-अधिक होतो. काहींना उलट्या किंवा जुलाबही होतात. पोट दुखणे, खोकला, अतिसार, डाेकेदुखी, अंगदुखी, थकवा येताे, अशक्तपणा वाढते, भूक मंदावते आदी लक्षणे टायफाॅइड या आजारावर दिसत असतात. अशी लक्षणे दिसताच वेळीच डाॅक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.

बाॅक्स...

ही घ्या काळजी

अस्वच्छ वातावरणातील अन्नपदार्थांचे सेवन करू नये.

कुठलेही पाणी पिणे टाळावे. अन्नपदार्थ गरम करून खावेत.

दिवसातून तीनवेळा जेवण करावे.

घरामध्ये अन्न झाकून ठेवावे.

पाणी उकळून थंड करून प्यावे.

पावसाळ्यात कच्च्या भाज्या, जास्त पिकलेली फळे खाऊ नये.

नारळपाणी, ज्युस, लस्सी, ग्लुकोज पाणी आदी पदार्थ घ्यावे.

बाॅक्स...

टायफाॅइड आजार हाेण्याची कारणे

पावसाळ्यातील दूषित पाण्याच्या संपर्कातून टायफाॅइड आजाराची लागण हाेण्याची शक्यता अधिक असते. मलमूत्राद्वारे दूषित पाण्यातून, माशा बसलेल्या अन्नातून, अस्वच्छ हातांद्वारे हे जीवाणू निराेगी व्यक्तींच्या ताेंडातून शरीरात प्रवेश करतात. आतड्यात जाऊन त्या विषाणूंची संख्या वाढते. त्यानंतर जीवाणू आपला विषारी प्रभाव दाखवू लागतात. त्यामुळे फूड पॉयझनिंग झाले असता, मळमळ वाटते, उलट्या हाेतात.