शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

पाणीपुरी खाताय की टायफाॅइडला निमंत्रण देताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:37 IST

गडचिराेली : पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर टायफॉइड हा आजार होतो. या आजाराचा प्रसार दूषित अन्न किंवा पाण्यामुळे होतो. अस्वच्छ वातावरणात ...

गडचिराेली : पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर टायफॉइड हा आजार होतो. या आजाराचा प्रसार दूषित अन्न किंवा पाण्यामुळे होतो. अस्वच्छ वातावरणात एस. टायफी हा जीवाणू विकसित होतो आणि उघड्या अन्नाला किंवा पाण्याला तो दूषित करतो. दूषित अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे किंवा पाणी प्यायल्यामुळे जीवाणूचा प्रादुर्भाव होऊन टायफॉइडची लागण होते. त्यामुळे पावसाच्या दिवसामध्ये उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. विशेषत: पाणीपुरी खाताना त्यात वापरणारे पाणी, स्वच्छता यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

टायफाॅइड हा आजार साल्माेनेला टायफी या जीवाणूपासून हाेताे. सदर जीवाणू (बॅक्टेरिया) टायफाॅइड झालेल्या रुग्णांच्या रक्तात आणि आतड्यांमध्ये असताे. टायफाॅइड तापाला विषमज्वर असेही म्हणतात. टायफाॅइड रुग्ण तसेच टायफाॅइड आजारातून नुकतेच बरे झालेले व्यक्ती यांच्या मलमूत्राद्वारे हे जीवाणू पसरत असतात.

बाॅक्स...

जिल्हा फणफणतोय

मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्यामुळे त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये नागरिकांना ताप, सर्दी, डोकेदुखीसारखे आजार होत आहेत. त्यामुळे खासगी तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे.

बाॅक्स....

आजाराची लक्षणे

ताप येतो. तो कमी-अधिक होतो. काहींना उलट्या किंवा जुलाबही होतात. पोट दुखणे, खोकला, अतिसार, डाेकेदुखी, अंगदुखी, थकवा येताे, अशक्तपणा वाढते, भूक मंदावते आदी लक्षणे टायफाॅइड या आजारावर दिसत असतात. अशी लक्षणे दिसताच वेळीच डाॅक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.

बाॅक्स...

ही घ्या काळजी

अस्वच्छ वातावरणातील अन्नपदार्थांचे सेवन करू नये.

कुठलेही पाणी पिणे टाळावे. अन्नपदार्थ गरम करून खावेत.

दिवसातून तीनवेळा जेवण करावे.

घरामध्ये अन्न झाकून ठेवावे.

पाणी उकळून थंड करून प्यावे.

पावसाळ्यात कच्च्या भाज्या, जास्त पिकलेली फळे खाऊ नये.

नारळपाणी, ज्युस, लस्सी, ग्लुकोज पाणी आदी पदार्थ घ्यावे.

बाॅक्स...

टायफाॅइड आजार हाेण्याची कारणे

पावसाळ्यातील दूषित पाण्याच्या संपर्कातून टायफाॅइड आजाराची लागण हाेण्याची शक्यता अधिक असते. मलमूत्राद्वारे दूषित पाण्यातून, माशा बसलेल्या अन्नातून, अस्वच्छ हातांद्वारे हे जीवाणू निराेगी व्यक्तींच्या ताेंडातून शरीरात प्रवेश करतात. आतड्यात जाऊन त्या विषाणूंची संख्या वाढते. त्यानंतर जीवाणू आपला विषारी प्रभाव दाखवू लागतात. त्यामुळे फूड पॉयझनिंग झाले असता, मळमळ वाटते, उलट्या हाेतात.